शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
2
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
3
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
4
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
5
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
6
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
7
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
8
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
9
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
10
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
11
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
12
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
13
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
14
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
15
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
16
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
17
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
18
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
19
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
20
Dance Bar Raid: उल्हासनगरातील चांदणी लेडीज सर्व्हिस बारवर पोलिसांची धाड, ९ महिलांसह १५ जणांना अटक

महाबळेश्वर घाटात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 04:17 IST

पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाटात शनिवारी घडलेल्या बस दुर्घटनेनंतर घाटमार्गाच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. घाटरस्त्याचे रुंदीकरण, सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजनांकडे आतापर्यंत दुर्लक्ष झाल्याचे सत्यही या अपघातामुळे समोर आले आहे.

- संदीप जाधवमहाड : पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाटात शनिवारी घडलेल्या बस दुर्घटनेनंतर घाटमार्गाच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. घाटरस्त्याचे रुंदीकरण, सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजनांकडे आतापर्यंत दुर्लक्ष झाल्याचे सत्यही या अपघातामुळे समोर आले आहे.दापोलीच्या कोकण कृषी महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांना सहलीसाठी महाबळेश्वरला घेऊन जाणारी बस आंबेनळी घाटातील दरीमध्ये कोसळून झालेल्या दुर्घटनेत ३० कर्मचारी मृत्युमुखी पडले. या दुर्घटनेमुळे दोन वर्षांपूर्वी महाडजवळ घडलेल्या सावित्री पूल दुर्घटनेच्या आठवणी रायगडवासीयांमध्ये पुन्हा एकदा जाग्या झाल्या आहेत. ३१ जुलै २०१६ रोजी मुंबई-गोवा महामार्गावरील सावित्री पूल दुर्घटनेत निष्पाप ४० प्रवाशांचे बळी गेले होते. त्यावेळी तब्बल महिनाभर नदीपात्रात मृतदेहांची शोधमोहीम सुरू होती.मुंबई-गोवा महामार्गावरील पोलादपूर ते पुणे- बंगळुरू महामार्गावरील सातारा जिल्ह्यातील दहीवडी (राज्यमार्ग क्र . १३९) हा मार्ग कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा दुवा समजला जातो. मात्र, घाटमार्गावर वारंवार घडणाºया अपघातांमुळे हा मार्ग अत्यंत धोकादायक बनला आहे. पोलादपूर, महाबळेश्वर, पाचगणी, वाई ते दहीवडीपर्यंतच्या नव्वद किमी मार्गाच्या चौपदरीकणाच्या कामाचा प्रस्ताव महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाकडे प्रलंबित असून त्याची युद्धपातळीवरून अंमलबजावणी होण्याची खरी गरज असल्याचे मत परिसरातील नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे. हा मार्ग अरुंद, धोकादायक, सुरक्षेचा दृष्टीने सोयीचा नसला तरी दुसरा योग्य पर्यायी मार्ग नसल्याने पर्यटक, तसेच महाड औद्योगिक क्षेत्रात पश्चिम महाराष्ट्रातून येणारी वाहने याच मार्गाचा वापर करतात. या मार्गावरून एमआयडीसी परिसरात कच्च्या मालाची वाहतूक करणाºया वाहनांचीही वर्दळ असते.पोलादपूर ते आंबेनळी हा (२४.२००) रस्ता सार्वजनिक बांधकाम, महाडच्या अखत्यारीत आहे तर त्यापुढील दहीवडीपर्यंतच्या मार्गाच्या देखभाल दुरु स्तीची जबाबदारी सातारा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. महाड विभागाने आपल्या अखत्यारीतील रस्त्याचे तीन महिन्यांपूर्वी डांबरीकरणाचे काम केले असले तरी अरु ंद मार्ग, तसेच धोकादायक वळणांमुळे हा घाटमार्ग प्रवाशांच्या जीवावर बेतला आहे.या मार्गावर आंबेनळी घाटासह पाचगणी ते वाई मार्गावरील पसरणी घाट देखील वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक आहे. पसरणी घाटातही वाहने दरीत कोसळण्याच्या दुर्घटना अनेकदा घडून प्रवाशांचे बळी गेले आहेत. मात्र, या रस्त्याच्या सुरक्षिततेकडे शासन गांभीर्याने पाहत नसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. वाहनांच्या अपघातांसह या मार्गावर दरडी कोसळण्याच्या घटना देखील पावसाळ्यात नियमितपणे घडतात, त्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी अनेकदा बंद ठेवला जातो. सुरक्षेच्या उपाययोजनांच्या अभावामुळे या मार्गावर प्रवाशांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. शनिवारी घडलेल्या बस दुर्घटनेनंतर तरी या मार्गाच्या रुंदीकरणासाठी वा सुरक्षिततेसाठी शासनाने जलदगतीने चालना द्यावी, अशी मागणी परिसरातील नागरिक तसेच वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.

टॅग्स :Raigadरायगड