शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

विन्हेरे रस्त्याच्या मोबदल्याचा प्रश्न ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2019 00:55 IST

मोबदला न मिळाल्यास काम न होऊ देण्याचा स्थानिक ग्रामस्थांचा प्रशासनाला इशारा

दासगाव : मुंबई-गोवा महामार्गाला पर्यायी मार्ग असलेल्या महाड विन्हेरे नातूनगर रस्त्याची दुरुस्ती करण्यास स्थानिक ग्रामस्थांनी हरकत घेतली आहे. जोपर्यंत आमचा मोबदला मिळत नाही तोपर्यंत रस्त्याचे काम करू दिले जाणार नाही, असा इशाराच या ग्रामस्थांनी दिला आहे. गेली काही वर्षे विन्हेरे परिसरातील ग्रामस्थ आपल्या मोबदल्यासाठी झटत आहेत.महाडमधून विन्हेरे मार्गे नातूनगर खेड असा एक मार्ग आहे. या मार्गावर शिरगाव, कुर्ले, रेवतळे फाटा, करंजाडी, विन्हेरे, फाळकेवाडी अशी गावे येतात. ऐन पावसाळ्यात कशेडी घाटात दरडी कोसळण्याच्या घटना घडल्यास किंवा गणेशोत्सवात होत असलेल्या वाहतूक कोंडीतून बाहेर पडण्यासाठी या मार्गाचा वापर होतो. सन १९८७ रोजी हा मार्ग मंजूर झाला होता, तर सन १९९७ रोजी या मार्गाचे काम करण्यात आले होते. सन २००५ मध्ये कशेडी घाट बंद राहिल्याने या मार्गाचा वापर झाला होता. यामुळे या मार्गाला पर्यायी मार्गाचा दर्जा देण्यात यावा अशी सूचना तत्कालीन कृषिमंत्री शरद पवार यांनी केली. या रस्त्याला तत्काळ पर्यायी मार्गाचा दर्जा देण्यात आला होता. यामुळे रस्त्यावरील गावांची आणि रस्त्यापासून लांब असलेल्या गावांमधील ग्रामस्थांना दळणवळण सुविधा उपलब्ध झाली. या मार्गाचे पर्यायी महामार्गाकरिता २००५मध्ये रस्ता रुंदीकरण झाले. यावेळी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी रुंदीकरणाच्या कामात बाधित झाल्या त्या लोकांना अद्याप मोबदला दिला गेलेला नाही. जवळपास ६० शेतकऱ्यांच्या जमिनी यामध्ये बाधित झाल्या आहेत. मोबदला मिळावा म्हणून अनेक दिवस या शेतकºयांचा लढा सुरू आहे.सध्या या मार्गाच्या दुरुस्तीचे काम सुरु आहे. या दुरुस्तीमध्ये स्थानिक ग्रामस्थ आणि शेतकºयांनी हरकत घेतली आहे. गेली अनेक वर्षे शेतकरी मोबदल्यासाठी फेºया मारत असल्याने शेतकºयांनी दुरुस्तीचे काम थांबवण्याची भूमिका घेतली आहे. याबाबत स्थानिक शेतकºयांनी महाड सार्वजनिक बांधकाम विभाग, महामार्ग बांधकाम विभाग, प्रांत कार्यालय या ठिकाणी पत्रव्यवहार केला आहे. या मार्गाच्या रुंदीकरणासाठी भूसंपादन करण्याबाबत कोणतीच कायदेशीर कारवाई झालेली नाही. शिवाय मोबदलाही दिला गेलेला नाही असे असताना या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मात्र निधी दिला जात असल्याने शेतकºयांनी नाराजी व्यक्त केली आहे. या मार्गाच्या दुरुस्तीचे काम केले जाऊ दिले जाणार, असा इशाराच स्थानिक शेतकरी प्रभाकर विन्हेरकर, पांडुरंग थरवळ, बबन मोरे, चंद्रकांत मोरे, विजय शिंदे आदींनी निवेदनाद्वारे दिला आहे.