शहरं
Join us  
Trending Stories
1
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
2
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
3
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
4
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
5
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
6
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
7
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
8
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
10
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
11
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
12
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
13
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
14
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
15
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
16
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
17
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
18
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
19
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
20
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप

विन्हेरे रस्त्याच्या मोबदल्याचा प्रश्न ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2019 00:55 IST

मोबदला न मिळाल्यास काम न होऊ देण्याचा स्थानिक ग्रामस्थांचा प्रशासनाला इशारा

दासगाव : मुंबई-गोवा महामार्गाला पर्यायी मार्ग असलेल्या महाड विन्हेरे नातूनगर रस्त्याची दुरुस्ती करण्यास स्थानिक ग्रामस्थांनी हरकत घेतली आहे. जोपर्यंत आमचा मोबदला मिळत नाही तोपर्यंत रस्त्याचे काम करू दिले जाणार नाही, असा इशाराच या ग्रामस्थांनी दिला आहे. गेली काही वर्षे विन्हेरे परिसरातील ग्रामस्थ आपल्या मोबदल्यासाठी झटत आहेत.महाडमधून विन्हेरे मार्गे नातूनगर खेड असा एक मार्ग आहे. या मार्गावर शिरगाव, कुर्ले, रेवतळे फाटा, करंजाडी, विन्हेरे, फाळकेवाडी अशी गावे येतात. ऐन पावसाळ्यात कशेडी घाटात दरडी कोसळण्याच्या घटना घडल्यास किंवा गणेशोत्सवात होत असलेल्या वाहतूक कोंडीतून बाहेर पडण्यासाठी या मार्गाचा वापर होतो. सन १९८७ रोजी हा मार्ग मंजूर झाला होता, तर सन १९९७ रोजी या मार्गाचे काम करण्यात आले होते. सन २००५ मध्ये कशेडी घाट बंद राहिल्याने या मार्गाचा वापर झाला होता. यामुळे या मार्गाला पर्यायी मार्गाचा दर्जा देण्यात यावा अशी सूचना तत्कालीन कृषिमंत्री शरद पवार यांनी केली. या रस्त्याला तत्काळ पर्यायी मार्गाचा दर्जा देण्यात आला होता. यामुळे रस्त्यावरील गावांची आणि रस्त्यापासून लांब असलेल्या गावांमधील ग्रामस्थांना दळणवळण सुविधा उपलब्ध झाली. या मार्गाचे पर्यायी महामार्गाकरिता २००५मध्ये रस्ता रुंदीकरण झाले. यावेळी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी रुंदीकरणाच्या कामात बाधित झाल्या त्या लोकांना अद्याप मोबदला दिला गेलेला नाही. जवळपास ६० शेतकऱ्यांच्या जमिनी यामध्ये बाधित झाल्या आहेत. मोबदला मिळावा म्हणून अनेक दिवस या शेतकºयांचा लढा सुरू आहे.सध्या या मार्गाच्या दुरुस्तीचे काम सुरु आहे. या दुरुस्तीमध्ये स्थानिक ग्रामस्थ आणि शेतकºयांनी हरकत घेतली आहे. गेली अनेक वर्षे शेतकरी मोबदल्यासाठी फेºया मारत असल्याने शेतकºयांनी दुरुस्तीचे काम थांबवण्याची भूमिका घेतली आहे. याबाबत स्थानिक शेतकºयांनी महाड सार्वजनिक बांधकाम विभाग, महामार्ग बांधकाम विभाग, प्रांत कार्यालय या ठिकाणी पत्रव्यवहार केला आहे. या मार्गाच्या रुंदीकरणासाठी भूसंपादन करण्याबाबत कोणतीच कायदेशीर कारवाई झालेली नाही. शिवाय मोबदलाही दिला गेलेला नाही असे असताना या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मात्र निधी दिला जात असल्याने शेतकºयांनी नाराजी व्यक्त केली आहे. या मार्गाच्या दुरुस्तीचे काम केले जाऊ दिले जाणार, असा इशाराच स्थानिक शेतकरी प्रभाकर विन्हेरकर, पांडुरंग थरवळ, बबन मोरे, चंद्रकांत मोरे, विजय शिंदे आदींनी निवेदनाद्वारे दिला आहे.