शहरं
Join us  
Trending Stories
1
Sindhudurg: शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बेपत्ता, तिघांचे मृतदेह सापडले
2
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
5
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
6
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
7
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
10
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
11
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
13
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
14
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
15
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
16
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
17
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
18
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
19
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
20
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच

विन्हेरे रस्त्याच्या मोबदल्याचा प्रश्न ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2019 00:55 IST

मोबदला न मिळाल्यास काम न होऊ देण्याचा स्थानिक ग्रामस्थांचा प्रशासनाला इशारा

दासगाव : मुंबई-गोवा महामार्गाला पर्यायी मार्ग असलेल्या महाड विन्हेरे नातूनगर रस्त्याची दुरुस्ती करण्यास स्थानिक ग्रामस्थांनी हरकत घेतली आहे. जोपर्यंत आमचा मोबदला मिळत नाही तोपर्यंत रस्त्याचे काम करू दिले जाणार नाही, असा इशाराच या ग्रामस्थांनी दिला आहे. गेली काही वर्षे विन्हेरे परिसरातील ग्रामस्थ आपल्या मोबदल्यासाठी झटत आहेत.महाडमधून विन्हेरे मार्गे नातूनगर खेड असा एक मार्ग आहे. या मार्गावर शिरगाव, कुर्ले, रेवतळे फाटा, करंजाडी, विन्हेरे, फाळकेवाडी अशी गावे येतात. ऐन पावसाळ्यात कशेडी घाटात दरडी कोसळण्याच्या घटना घडल्यास किंवा गणेशोत्सवात होत असलेल्या वाहतूक कोंडीतून बाहेर पडण्यासाठी या मार्गाचा वापर होतो. सन १९८७ रोजी हा मार्ग मंजूर झाला होता, तर सन १९९७ रोजी या मार्गाचे काम करण्यात आले होते. सन २००५ मध्ये कशेडी घाट बंद राहिल्याने या मार्गाचा वापर झाला होता. यामुळे या मार्गाला पर्यायी मार्गाचा दर्जा देण्यात यावा अशी सूचना तत्कालीन कृषिमंत्री शरद पवार यांनी केली. या रस्त्याला तत्काळ पर्यायी मार्गाचा दर्जा देण्यात आला होता. यामुळे रस्त्यावरील गावांची आणि रस्त्यापासून लांब असलेल्या गावांमधील ग्रामस्थांना दळणवळण सुविधा उपलब्ध झाली. या मार्गाचे पर्यायी महामार्गाकरिता २००५मध्ये रस्ता रुंदीकरण झाले. यावेळी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी रुंदीकरणाच्या कामात बाधित झाल्या त्या लोकांना अद्याप मोबदला दिला गेलेला नाही. जवळपास ६० शेतकऱ्यांच्या जमिनी यामध्ये बाधित झाल्या आहेत. मोबदला मिळावा म्हणून अनेक दिवस या शेतकºयांचा लढा सुरू आहे.सध्या या मार्गाच्या दुरुस्तीचे काम सुरु आहे. या दुरुस्तीमध्ये स्थानिक ग्रामस्थ आणि शेतकºयांनी हरकत घेतली आहे. गेली अनेक वर्षे शेतकरी मोबदल्यासाठी फेºया मारत असल्याने शेतकºयांनी दुरुस्तीचे काम थांबवण्याची भूमिका घेतली आहे. याबाबत स्थानिक शेतकºयांनी महाड सार्वजनिक बांधकाम विभाग, महामार्ग बांधकाम विभाग, प्रांत कार्यालय या ठिकाणी पत्रव्यवहार केला आहे. या मार्गाच्या रुंदीकरणासाठी भूसंपादन करण्याबाबत कोणतीच कायदेशीर कारवाई झालेली नाही. शिवाय मोबदलाही दिला गेलेला नाही असे असताना या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मात्र निधी दिला जात असल्याने शेतकºयांनी नाराजी व्यक्त केली आहे. या मार्गाच्या दुरुस्तीचे काम केले जाऊ दिले जाणार, असा इशाराच स्थानिक शेतकरी प्रभाकर विन्हेरकर, पांडुरंग थरवळ, बबन मोरे, चंद्रकांत मोरे, विजय शिंदे आदींनी निवेदनाद्वारे दिला आहे.