शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
2
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
3
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
4
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
5
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
6
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
7
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
8
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
9
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
10
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
11
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
12
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
13
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
14
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
15
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
16
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
17
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
18
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
19
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
20
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल

पुलाच्या कामात घोळ

By admin | Updated: April 16, 2017 04:36 IST

मुंबई-गोवा महामार्गावर नव्याने बांधण्यात येत असलेल्या पुलाच्या कामात मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार होत असून, पुलाच्या दोन्ही बाजूंनी ३० फूट उंचीच्या भरावासाठी

- संदीप जाधव, महाड

मुंबई-गोवा महामार्गावर नव्याने बांधण्यात येत असलेल्या पुलाच्या कामात मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार होत असून, पुलाच्या दोन्ही बाजूंनी ३० फूट उंचीच्या भरावासाठी चक्क शेतातील मातीचा वापर केला जात आहे. या कामाची सखोल चौकशी करण्याची मागणी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस माजी आ. माणिक जगताप यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली. पुलाच्या दोन्ही बाजूंना टाकण्यात आलेला मातीचा भराव सावित्री नदीच्या प्रवाहात वाहून जाण्याचा धोका असून त्या ठिकाणी सावित्री पूल दुर्घटनेसारखीच दुसरी गंभीर घटना घडण्याची शक्यता असल्याचेही जगताप यांनी स्पष्ट केले.महामार्गावर महाडजवळील सावित्री नदीवरील पूल गेल्यावर्षी २ आॅगस्ट रोजी रात्री कोसळून दोन एसटी बससह एक तवेरा जीप नदीच्या प्रवाहात वाहून गेलीहोती. यादुर्घटनेत ४० प्रवाशांचे बळी गेले होते. महाराष्ट्रातही या घटनेमुळे हाहाकार माजला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या महामार्ग विभागाकडून नवीन पूल बांधण्याचे काम हाती घेण्यात आलेले असून, हे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पावसाळ्यापूर्वी हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचा महामार्ग विभागाचा प्रयत्न असला, तरी पुलाच्या दोन्ही बाजूंकडून उभारण्यात आलेल्या आरसीसी संरक्षक भिंतीच्या आत ३० फुटांहून अधिक उंचीचा भराव टाकण्याचे काम सध्या सुरू आहे.भरावासाठी कठीण मुरु म व रबल सोलिंग ऐवजी शेतातील मातीचा हजारो ब्रासचा भराव टाकण्यात येत असल्याची बाब महामार्ग विभागाच्या अभियंत्याच्या प्रत्यक्ष जागेवर जाऊन निदर्शनास आणून दिली. पुलाच्या दोन्ही बाजूंकडे टाकण्यात येत असलेला हा भराव अतिवृष्टीत नदीच्या जोरदार प्रवाहाबरोबर वाहून जाण्याचा धोका असल्याचेही माणिक जगताप यांनी या अभियंत्याच्या लक्षात आणून दिले. प्रत्यक्षात या पुलाच्या कामाच्या अंदाजपत्रकात कठीण मुरु म व रबल सोलिंगच्या भरावासाठी हा भराव करण्याचे स्पष्ट असतानाही, अत्यंत निकृष्ट दर्जाची माती या भरावासाठी वापरली जात असल्याने तसेच या मातीचेही बेकायदा उत्खनन व विनारॉयल्टी वापरली जात असल्याचा आरोपही माणिक जगताप यांनी यावेळी केला.‘ध्रुव’ संस्थेचे नियंत्रणच नाहीसावित्री नदीवर पुलाच्या बांधकामावर देखरेख व गुणवत्तेबाबत नियंत्रण ठेवण्याचे काम सरकारने ध्रुव कन्सल्टन्सी या खासगी एजन्सीला दिलेले आहे. यासाठी ध्रुव कन्सल्टन्सीने देखरेखीसाठी सा. बां. विभागाच्या एका निवृत्त उपअभियंत्याची नेमणूक केली आहे. मात्र, पोलादपूर सा. बां. विभागात उपअभियंता म्हणून सेवाकाळात असताना या उपअभियंत्याबाबत अनेक तक्रारी होत्या. त्यामुळे या पुलाच्या कामाचा दर्जा व गुणवत्तेबाबत ध्रुव या एजन्सीचे कुठलेही नियंत्रणच नसल्याचे स्पष्ट होत आहे. या पुलाचे काम टी अ‍ॅण्ड टी इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. या कंपनीकडून केले जात आहे.