शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
3
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
5
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
6
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
7
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
9
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
10
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
11
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
12
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
13
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
14
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
15
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
16
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
17
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
18
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
19
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
20
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
Daily Top 2Weekly Top 5

पुलाच्या कामात घोळ

By admin | Updated: April 16, 2017 04:36 IST

मुंबई-गोवा महामार्गावर नव्याने बांधण्यात येत असलेल्या पुलाच्या कामात मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार होत असून, पुलाच्या दोन्ही बाजूंनी ३० फूट उंचीच्या भरावासाठी

- संदीप जाधव, महाड

मुंबई-गोवा महामार्गावर नव्याने बांधण्यात येत असलेल्या पुलाच्या कामात मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार होत असून, पुलाच्या दोन्ही बाजूंनी ३० फूट उंचीच्या भरावासाठी चक्क शेतातील मातीचा वापर केला जात आहे. या कामाची सखोल चौकशी करण्याची मागणी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस माजी आ. माणिक जगताप यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली. पुलाच्या दोन्ही बाजूंना टाकण्यात आलेला मातीचा भराव सावित्री नदीच्या प्रवाहात वाहून जाण्याचा धोका असून त्या ठिकाणी सावित्री पूल दुर्घटनेसारखीच दुसरी गंभीर घटना घडण्याची शक्यता असल्याचेही जगताप यांनी स्पष्ट केले.महामार्गावर महाडजवळील सावित्री नदीवरील पूल गेल्यावर्षी २ आॅगस्ट रोजी रात्री कोसळून दोन एसटी बससह एक तवेरा जीप नदीच्या प्रवाहात वाहून गेलीहोती. यादुर्घटनेत ४० प्रवाशांचे बळी गेले होते. महाराष्ट्रातही या घटनेमुळे हाहाकार माजला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या महामार्ग विभागाकडून नवीन पूल बांधण्याचे काम हाती घेण्यात आलेले असून, हे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पावसाळ्यापूर्वी हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचा महामार्ग विभागाचा प्रयत्न असला, तरी पुलाच्या दोन्ही बाजूंकडून उभारण्यात आलेल्या आरसीसी संरक्षक भिंतीच्या आत ३० फुटांहून अधिक उंचीचा भराव टाकण्याचे काम सध्या सुरू आहे.भरावासाठी कठीण मुरु म व रबल सोलिंग ऐवजी शेतातील मातीचा हजारो ब्रासचा भराव टाकण्यात येत असल्याची बाब महामार्ग विभागाच्या अभियंत्याच्या प्रत्यक्ष जागेवर जाऊन निदर्शनास आणून दिली. पुलाच्या दोन्ही बाजूंकडे टाकण्यात येत असलेला हा भराव अतिवृष्टीत नदीच्या जोरदार प्रवाहाबरोबर वाहून जाण्याचा धोका असल्याचेही माणिक जगताप यांनी या अभियंत्याच्या लक्षात आणून दिले. प्रत्यक्षात या पुलाच्या कामाच्या अंदाजपत्रकात कठीण मुरु म व रबल सोलिंगच्या भरावासाठी हा भराव करण्याचे स्पष्ट असतानाही, अत्यंत निकृष्ट दर्जाची माती या भरावासाठी वापरली जात असल्याने तसेच या मातीचेही बेकायदा उत्खनन व विनारॉयल्टी वापरली जात असल्याचा आरोपही माणिक जगताप यांनी यावेळी केला.‘ध्रुव’ संस्थेचे नियंत्रणच नाहीसावित्री नदीवर पुलाच्या बांधकामावर देखरेख व गुणवत्तेबाबत नियंत्रण ठेवण्याचे काम सरकारने ध्रुव कन्सल्टन्सी या खासगी एजन्सीला दिलेले आहे. यासाठी ध्रुव कन्सल्टन्सीने देखरेखीसाठी सा. बां. विभागाच्या एका निवृत्त उपअभियंत्याची नेमणूक केली आहे. मात्र, पोलादपूर सा. बां. विभागात उपअभियंता म्हणून सेवाकाळात असताना या उपअभियंत्याबाबत अनेक तक्रारी होत्या. त्यामुळे या पुलाच्या कामाचा दर्जा व गुणवत्तेबाबत ध्रुव या एजन्सीचे कुठलेही नियंत्रणच नसल्याचे स्पष्ट होत आहे. या पुलाचे काम टी अ‍ॅण्ड टी इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. या कंपनीकडून केले जात आहे.