शहरं
Join us  
Trending Stories
1
बायजूच्या रवींद्रन यांना अमेरिकेच्या कोर्टाचा मोठा झटका! कोर्टाचे आदेश न पाळल्यामुळे १ अब्ज डॉलरचा दंड
2
G20 शिखर परिषदेने परंपरा मोडली; अमेरिकेच्या बहिष्काराला न जुमानता ठराव मंजूर केला...
3
जानेवारीत लग्न ठरलेले...! २८ वर्षीय महिला डॉक्टरने ९व्या मजल्यावरून उडी मारली, होणाऱ्या नवऱ्याला तिथेच...   
4
बांगलादेश सीमेलगतच्या जिल्ह्यांत मतदारांची संख्या अचानक वाढली; भाजप म्हणतेय मुस्लिम, तृणमूल म्हणतेय हिंदू...
5
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
6
तर ती आज माझ्यासोबत असली असती...! माधुरी दीक्षितसोबत लग्नाच्या मागणीवर सुरेश वाडकर आजही...
7
बाप आहे की राक्षस ! सोबत झोपणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार; मुलीने दिला बाळाला जन्म
8
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
9
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
10
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
11
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
12
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
13
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
14
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
15
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
16
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
17
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
18
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
19
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
20
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
Daily Top 2Weekly Top 5

मुरुडमध्ये पर्यटकांना सर्व सुविधा देणार, तहसीलदारांचे आश्वासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 06:59 IST

मुरुड-जंजिरामधील असुविधांवर ‘लोकमत’ने ‘मुरुडमध्ये पर्यटन सुविधांची वानवा’ या वृत्ताद्वारे व फोटो फिचरच्या माध्यमातून प्रकाश टाकला. त्या संदर्भात जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांनी दखल घेऊन मुरुडच्या तहसीलदारांना चौकशीचे आदेश दिले होते. याची गंभीर दखल घेऊन सोमवारी मुरुड तहसीलदार कार्यालयात पुरातत्व विभाग, गटविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक, मुख्याधिकारी, बंदर निरीक्षक, सरपंच, ग्रामसेवक या संबंधित खात्याशी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

आगरदांडा - मुरुड-जंजिरामधील असुविधांवर ‘लोकमत’ने ‘मुरुडमध्ये पर्यटन सुविधांची वानवा’ या वृत्ताद्वारे व फोटो फिचरच्या माध्यमातून प्रकाश टाकला. त्या संदर्भात जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांनी दखल घेऊन मुरुडच्या तहसीलदारांना चौकशीचे आदेश दिले होते. याची गंभीर दखल घेऊन सोमवारी मुरुड तहसीलदार कार्यालयात पुरातत्व विभाग, गटविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक, मुख्याधिकारी, बंदर निरीक्षक, सरपंच, ग्रामसेवक या संबंधित खात्याशी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुरुड तहसीलदार उमेश पाटील यांनी संबंधित अधिकाºयांची कानउघाडणी केली. पर्यटन स्थळांपैकी जंजिरा किल्ला महत्त्वाचा आहे. त्याकरिता काय योजना करता येईल यासाठी बैठक आयोजित करण्यात येणारआहे.अरुंद रस्त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. त्यावेळी उपअभियंता नीलेश खिलारे म्हणाले की, एकदरापासून ते राजपुरी ग्रामपंचायत डांबरीकरणाचे काम मंजूर असून निविदा स्तरावर आहे. संरक्षण भिंती पावसाळ्यापूर्वी बांधून देणार मात्र राजपुरी ग्रामपंचायत हद्दीतील निवासस्थाने रस्त्यालगत असल्याने रस्ता रु ंदीकरण होणार नाही. जंजिरा किल्ल्याकडे जाणारा अंतर्गत रस्ता दुरुस्तीकरिता जिल्हापरिषदेकडे पत्रव्यवहार करून लवकर रस्ता बनवण्यात येईल, असे पंचायत समिती सहायक प्रशासन अधिकारी प्रकाश पवार यांनी सांगितले.पुरातत्व खात्याचे वरिष्ठ संरक्षण सहायक शैलेंद्र कांबळे म्हणाले की, किल्ल्यामध्ये पुरु षांकरिता व महिलांकरिता एक एक शौचालय चालू आहे. त्याठिकाणी पाण्याची उत्तम सोय केली आहे. परंतु पर्यटकांची संख्या जास्त असल्यामुळे ते अपुरे पडत आहे. जर शासनाने मोठ्या स्वरूपात निधी उपलब्ध करून दिला तर शौचालयामध्ये वाढ करू व होणारी गैरसोय थांबवू असे ते यावेळीम्हणाले.किल्ल्याची माहिती देणारा फलक लावणार व इतर सोयी पर्यटकांसाठी उपलब्ध करून देऊ असे अभिवचन यावेळी उपस्थितांना दिले.ज्यांना जंजिरा किल्ल्याविषयी काहीच माहीत नाही,ज्यांना इतिहास माहीत नाही असे राजपुरी येथील स्थानिक लोक जे गाइडचे काम करीत आहेत त्यांना त्यांचे काम करू देणार नाही. त्यांच्यावर प्रतिबंध आणणार असल्याचे पुरातत्व खात्याचे वरिष्ठ सहायक शैलेश कांबळे यांनी सांगितले.या बैठकीत पुरातत्व वरिष्ठ संरक्षण सहायक शैलेश कांबळे, बंदर निरीक्षक अतुल धोत्रे, मुख्याधिकारी दयानंद गोरे, बांधकाम खात्याचे अधिकारी नीलेश खिलारे, पंचायत समिती सहायक प्रशासन अधिकारी प्रकाश पवार, सरपंच हिरकणी गिदी, ग्रामविकास अधिकारी अनिल चवरकर, रूपाली कवाडे आदी या बैठकीसाठी हजरहोते.1नवीन जेट्टीवर शौचालये बांधून तयार आहेत. मात्र या ठिकाणी पाणी नसल्याने शौचालये चालू नाहीत. पाण्यासाठी ग्रामपंचायतीकडे अनेक पत्रव्यवहार करण्यात आले आहे, परंतु अजूनपर्यंत पाण्याची लाइन देण्यात आली नाही. त्यावेळी ग्रामविकास अधिकारी अनिल चवरकर यांनी नवीन योजनेतून पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. यावर तहसीलदार उमेश पाटील यांचे समाधान झाले नाही त्यांनी गटविकास अधिकारी संजय चव्हाण हे ट्रेनिंगकरिता गेले आहेत. ते आल्यावर ग्रामसेवकांना बोलावण्यात येऊन यावर तातडीने निर्णय घेऊन नवीन जेट्टीला तातडीने नळ कनेक्शन दिले जाईल. तसेच राजपुरी नवीन जेट्टी व जुनी जेट्टी येथे पर्यटकांना चढ-उतार करण्याकरिता जो त्रास होत आहे त्याकरिता जेट्टीची उंची वाढवण्यात येणार आहे. राजपुरी जुन्या जेट्टीवर स्वच्छतेचे तीनतेरा वाजले त्याकरिता उपाययोजना करावी अशी सूचना बंदर निरीक्षक अतुल धोत्रे यांनी मांडली. त्यावर ग्रामसेवकांनी स्वच्छतेकडे लक्ष द्यावे असे आदेश दिले.2जंजिरा किल्ल्यासाठी स्वतंत्र तरंगती जेट्टी असावी याकरिता आम्ही प्रयत्न करणार असल्याचे बंदर निरीक्षक अतुल धोत्रे यांनी सांगितले. कासा किल्लाकरिता तरंगती अथवा अन्य कोणताही प्रस्ताव आमच्याकडे प्राप्त नाही. दिल्लीवरून याबाबत कोणतीही सूचना आलेली नसल्याचा स्पष्ट उल्लेख पुरातत्व खात्याचे अधिकाºयांनी स्पष्टपणे सांगितले. जंजिरा किल्ल्यावरील तरंगत्या जेट्टीचा प्रस्ताव पुरातत्व खात्याने मंजूर केला असून तो दिल्लीला मंजुरीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती सुद्धा पुरातत्व अधिकारी वर्गाने या सभेच्या निमित्ताने दिली.राजपुरी ग्रा.पं.ने माहिती कें द्र उभारावेतहसीलदारांनी माहिती केंद्र राजपुरी ग्रामपंचायतीने करावे कारण जंजिरा किल्ला पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने पर्यटक येत असतात ते ज्यावेळी राजपुरी ग्रामपंचायत हद्दीत येतात त्यावेळी त्यांच्याकडून स्वच्छता कर या नावाने फी आकारली जाते.पर्यटक येण्यामुळे ग्रामपंचायतीस उत्पन्न मिळत आहे म्हणून राजपुरी ग्रामपंचायतीने माहिती केंद्र स्थापन करावे अशी सूचना तहसीलदार उमेश पाटील यांनी मांडली, परंतु उपस्थित राजपुरी सरपंच व ग्राम विकास अधिकाºयांनी यावर मौन पाळले त्यामुळे भविष्यात माहिती केंद्र होईलच असे नाही.स्थानिक पत्रकारांनी राजपुरी येथील नवीन जेट्टीवर बंदर निरीक्षकांनी एलएलडीव्दारे आॅडीओ-व्हिडीओव्दारे किल्ल्याची माहिती मिळाली तर वेटिंग करणारे व किल्ला पाहून येणाºया पर्यटकांना यांचा फायदा होईल अशी सूचना मांडली. यावर बंदर निरीक्षक अतुल धोत्रे यांनी किल्ल्याची सर्व माहिती पुरातत्व खात्याकडे असून त्यांनी नवीन जेट्टीवर ही सर्व व्यवस्था करावी आम्ही परवानगी देण्यास तयार आहोत.

टॅग्स :Raigadरायगडtourismपर्यटन