शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

जेएसडब्ल्यूविरोधात आंदोलनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 02:03 IST

संरक्षक बंधारे फुटीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांचा प्रश्न आणि बंधाºयाची दुरुस्ती याकरिता २३ मे २०१७ पासून सतत पाठपुरावा करूनही दुरुस्तीची कार्यवाही करण्यात येत नाही.

अलिबाग : संरक्षक बंधारे फुटीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांचा प्रश्न आणि बंधाºयाची दुरुस्ती याकरिता २३ मे २०१७ पासून सतत पाठपुरावा करूनही दुरुस्तीची कार्यवाही करण्यात येत नाही. या संदर्भातील बैठकीसाठी शेतकºयांना शनिवारी पेण उप विभागीय कार्यालयात रात्री आठ वाजेपर्यंत रखडावे लागले. यामुळे शेतकºयांमध्ये नाराजी पसरली असून आनंदनगर ते गडबपर्यंतच्या अकरा गावांतील शेतकºयांनी उग्र आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीवर शेतकरी महिलांचालाटणी मोर्चा व पेण प्रांत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय शेतकºयांनी घेतलेला असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते अरुण शिवकर यांनी दिली आहे.पेण तालुक्यातील कासू परिसरातील जुईअब्बास व मार्चेला चिर्बी खारभूमी योजनेच्या अंतर्गत येणाºया संरक्षक बंधाºयाला ढोंबी व माचेला गावाजवळ ३ ते ४ ठिकाणी उधाणाच्या भरतीमुळे मोठी भगदाडे(खांडी) पडली आहेत. गडब ते देवळी या गावांपर्यंत २३०० एकर भातशेती क्षेत्रात खारे पाणी शिरले असून दोन हजारच्या वर कुटुंबांच्या उपजीविकेलाच मोठा फटका बसला आहे. या संदर्भात गतवर्षी २३ मे २०१७ पासून शेतकरी शिष्टमंडळ, उपोषण, शेतात घुसलेले खारे पाणी पाहण्यासाठी अधिकारी, आमदार धैर्यशील पाटील यांचा दौरा, विधिमंडळाच्या अधिवेशनात उपस्थित झालेला प्रश्न व केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी जिल्हाधिकाºयांना याबाबत केलेली विचारणा इतके सारे होऊनही जिल्हा प्रशासन हरित न्यायाधीकरणाचे कारण देत हतबलता दाखवित आहे. परिणामी बांध दुरुस्तीचा प्रश्न अजूनही रेंगाळत पडलेला असल्याने बाधित शेतकºयांमध्ये मोठी नाराजी निर्माण झाली असल्याची माहिती शिवकर यांनी दिली आहे.याच समस्येच्या संदर्भात गेल्या १६ फेब्रुवारी रोजी पेण उपविभागीय महसूल अधिकारी प्रतिमा पुदलवाड यांनी बैठक बोलावली होती, मात्र त्याचे लेखी पत्र शेतकºयांना दिले नव्हते. या सभेला जेएसडब्ल्यू कंपनीच्या वतीने उपमहाव्यवस्थापक अरु ण शिर्के, खारभूमी विभागाचे शाखा अभियंता सुभाष निंबाळकर व २५ शेतकरी प्रतिनिधी हजर होते. यावेळी शेतकºयांनी गट नं. ९४ मधील न्यायप्रविष्ट बाब टाळून नवीन ठिकाणाहून खांडीपर्यंत पोचण्याचा मार्ग सुचविला होता. त्यावेळी शिर्के यांनी बांधाच्या रु ंदीबाबत शंका उपस्थित केली व या मार्गाचा पुन्हा फेरसर्व्हे करण्याबाबत सुचविले होते. त्याप्रमाणे १७ मार्च रोजी कंपनीचे अधिकारी व शेतकरी प्रतिनिधी यांनी संयुक्तरीत्या सर्व्हे केला असता बांधाची रु ंदी ३ मीटर ते ६ मीटरपर्यंत आढळली.कांदळवनाची कोणतीही झाडे बांधामध्ये येत नसून काही ठिकाणी खुरटी वनस्पती आढळली त्यामुळे हाच मार्ग बंधाºयांच्या दुरुस्तीकरिता सोईस्कर ठरणार असल्याचे स्पष्ट झाले होते.शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात१आता या संदर्भातील बैठक शासकीय कार्यालयात होण्याऐवजी कंपनीच्या कार्यालयात आयोजित करण्याच्या मुद्यावरून शेतकºयांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. बैठक कंपनीत नव्हे तर प्रांत कार्यालयातच झाली पाहिजे अशी भूमिका घेतली असून याबाबत योग्य निर्णय न झाल्यास कंपनीवर महिला शेतकºयांचा लाटणी मोर्चा व पेण प्रांत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय शेतकºयांनी घेतलेला आहे.२याबाबत राज्यपालांना शेतकरी शिष्टमंडळाद्वारे भेटण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. २३०० एकरात खारे पाणी शिरले त्यावेळी शासकीय पंचनामा झाला असून एप्रिल महिन्यापर्यंत संरक्षक बंधाºयांची दुरुस्ती केली नाही तर पुढे शेतीची कामे करताच येणार नाहीत त्यामुळे एकरी ३० हजार रु पयेप्रमाणे शासनाने नुकसान भरपाई दिलीच पाहिजे, अशीही मागणी शेतकºयांची असल्याचे शिवकर यांनी सांगितले.जेएसडब्ल्यू कंपनीने संरक्षक बंधाºयांच्या दुरुस्तीकरिता ६० लाख रुपयांची तरतूद यापूर्वीच केली आहे. केवळ या दुरुस्ती कामाकरिता त्या बंधाºयापर्यंत पोहोचण्याकरिता शेतकºयांनी सुचविलेला मार्ग अरुंद असल्याने त्यावरून माल घेवून वाहन जावू शकत नाही. कंपनीची जागा आणि संबंधित बंधारा यामध्ये असलेल्या नाल्यामध्ये तात्पुरते पाइप टाकून तात्पुरता रस्ता करून बंधाºयाचे काम करण्यासाठी आम्ही जिल्हाधिकाºयांकडे परवानगी मागितली आहे. ती मिळताच हे दुरुस्तीचे काम करण्यात येईल.- अरुण शिर्के, उपमहाव्यवस्थापक,जेएसडब्ल्यू कंपनी

टॅग्स :Raigadरायगड