शहरं
Join us  
Trending Stories
1
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
2
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
3
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
4
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
5
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
6
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
7
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
8
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!
9
२२ रुपयांच्या 'या' शेअरचा ४२४०% परतावा! १ लाख रुपयांचे झाले तब्बल ४२.४० लाख; अजूनही संधी?
10
कोट्यधीश बनण्याचं स्वप्न असेल तर 'या' सरकारी स्कीमचा विचार करू शकता; मिळेल १ कोटींचा फंड
11
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
12
“राज्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार तातडीची मदत द्या, ओला दुष्काळ जाहीर करा”: सपकाळ
13
रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची अपडेट! कार्डवरुन नाव काढणार? केंद्राने १.१७ कोटी लोकांची यादी पाठवली
14
एका श्वानामुळे तब्बल अर्धा तास रखडली ट्रेन, प्रवाशांचाही उडाला गोंधळ! नेमकं झालं तरी काय?
15
सुवर्णसंधी! BSF मध्ये हेड काँन्स्टेबल पदांवर मेगाभरती; या तारखेपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया
16
पत्नीची गोळ्या, कीटकनाशक देऊन हत्या, मृतदेह पुरला; बॉयफ्रेंडसोबत पळून गेल्याचा केला बनाव, पण एका चुकीमुळे अडकला
17
रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ला पूर्व नियोजित कट; आरोपीचे २४ तास पूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर
18
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
19
आधी ट्रम्प यांची भेट, नंतर भारतात मोठी कर्मचारी कपात; एकाच दिवसात मालकाला बसला १.३१ लाख कोटींचा फटका
20
या देशात शुक्रवारचे नमाजपठण केले नाही तर 2 वर्षांचा तुरुंगवास; भरावा लागेल ₹ 61 हजारचा दंड! का करण्यात आला असा कायदा?

जेएसडब्ल्यूविरोधात आंदोलनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 02:03 IST

संरक्षक बंधारे फुटीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांचा प्रश्न आणि बंधाºयाची दुरुस्ती याकरिता २३ मे २०१७ पासून सतत पाठपुरावा करूनही दुरुस्तीची कार्यवाही करण्यात येत नाही.

अलिबाग : संरक्षक बंधारे फुटीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांचा प्रश्न आणि बंधाºयाची दुरुस्ती याकरिता २३ मे २०१७ पासून सतत पाठपुरावा करूनही दुरुस्तीची कार्यवाही करण्यात येत नाही. या संदर्भातील बैठकीसाठी शेतकºयांना शनिवारी पेण उप विभागीय कार्यालयात रात्री आठ वाजेपर्यंत रखडावे लागले. यामुळे शेतकºयांमध्ये नाराजी पसरली असून आनंदनगर ते गडबपर्यंतच्या अकरा गावांतील शेतकºयांनी उग्र आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीवर शेतकरी महिलांचालाटणी मोर्चा व पेण प्रांत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय शेतकºयांनी घेतलेला असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते अरुण शिवकर यांनी दिली आहे.पेण तालुक्यातील कासू परिसरातील जुईअब्बास व मार्चेला चिर्बी खारभूमी योजनेच्या अंतर्गत येणाºया संरक्षक बंधाºयाला ढोंबी व माचेला गावाजवळ ३ ते ४ ठिकाणी उधाणाच्या भरतीमुळे मोठी भगदाडे(खांडी) पडली आहेत. गडब ते देवळी या गावांपर्यंत २३०० एकर भातशेती क्षेत्रात खारे पाणी शिरले असून दोन हजारच्या वर कुटुंबांच्या उपजीविकेलाच मोठा फटका बसला आहे. या संदर्भात गतवर्षी २३ मे २०१७ पासून शेतकरी शिष्टमंडळ, उपोषण, शेतात घुसलेले खारे पाणी पाहण्यासाठी अधिकारी, आमदार धैर्यशील पाटील यांचा दौरा, विधिमंडळाच्या अधिवेशनात उपस्थित झालेला प्रश्न व केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी जिल्हाधिकाºयांना याबाबत केलेली विचारणा इतके सारे होऊनही जिल्हा प्रशासन हरित न्यायाधीकरणाचे कारण देत हतबलता दाखवित आहे. परिणामी बांध दुरुस्तीचा प्रश्न अजूनही रेंगाळत पडलेला असल्याने बाधित शेतकºयांमध्ये मोठी नाराजी निर्माण झाली असल्याची माहिती शिवकर यांनी दिली आहे.याच समस्येच्या संदर्भात गेल्या १६ फेब्रुवारी रोजी पेण उपविभागीय महसूल अधिकारी प्रतिमा पुदलवाड यांनी बैठक बोलावली होती, मात्र त्याचे लेखी पत्र शेतकºयांना दिले नव्हते. या सभेला जेएसडब्ल्यू कंपनीच्या वतीने उपमहाव्यवस्थापक अरु ण शिर्के, खारभूमी विभागाचे शाखा अभियंता सुभाष निंबाळकर व २५ शेतकरी प्रतिनिधी हजर होते. यावेळी शेतकºयांनी गट नं. ९४ मधील न्यायप्रविष्ट बाब टाळून नवीन ठिकाणाहून खांडीपर्यंत पोचण्याचा मार्ग सुचविला होता. त्यावेळी शिर्के यांनी बांधाच्या रु ंदीबाबत शंका उपस्थित केली व या मार्गाचा पुन्हा फेरसर्व्हे करण्याबाबत सुचविले होते. त्याप्रमाणे १७ मार्च रोजी कंपनीचे अधिकारी व शेतकरी प्रतिनिधी यांनी संयुक्तरीत्या सर्व्हे केला असता बांधाची रु ंदी ३ मीटर ते ६ मीटरपर्यंत आढळली.कांदळवनाची कोणतीही झाडे बांधामध्ये येत नसून काही ठिकाणी खुरटी वनस्पती आढळली त्यामुळे हाच मार्ग बंधाºयांच्या दुरुस्तीकरिता सोईस्कर ठरणार असल्याचे स्पष्ट झाले होते.शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात१आता या संदर्भातील बैठक शासकीय कार्यालयात होण्याऐवजी कंपनीच्या कार्यालयात आयोजित करण्याच्या मुद्यावरून शेतकºयांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. बैठक कंपनीत नव्हे तर प्रांत कार्यालयातच झाली पाहिजे अशी भूमिका घेतली असून याबाबत योग्य निर्णय न झाल्यास कंपनीवर महिला शेतकºयांचा लाटणी मोर्चा व पेण प्रांत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय शेतकºयांनी घेतलेला आहे.२याबाबत राज्यपालांना शेतकरी शिष्टमंडळाद्वारे भेटण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. २३०० एकरात खारे पाणी शिरले त्यावेळी शासकीय पंचनामा झाला असून एप्रिल महिन्यापर्यंत संरक्षक बंधाºयांची दुरुस्ती केली नाही तर पुढे शेतीची कामे करताच येणार नाहीत त्यामुळे एकरी ३० हजार रु पयेप्रमाणे शासनाने नुकसान भरपाई दिलीच पाहिजे, अशीही मागणी शेतकºयांची असल्याचे शिवकर यांनी सांगितले.जेएसडब्ल्यू कंपनीने संरक्षक बंधाºयांच्या दुरुस्तीकरिता ६० लाख रुपयांची तरतूद यापूर्वीच केली आहे. केवळ या दुरुस्ती कामाकरिता त्या बंधाºयापर्यंत पोहोचण्याकरिता शेतकºयांनी सुचविलेला मार्ग अरुंद असल्याने त्यावरून माल घेवून वाहन जावू शकत नाही. कंपनीची जागा आणि संबंधित बंधारा यामध्ये असलेल्या नाल्यामध्ये तात्पुरते पाइप टाकून तात्पुरता रस्ता करून बंधाºयाचे काम करण्यासाठी आम्ही जिल्हाधिकाºयांकडे परवानगी मागितली आहे. ती मिळताच हे दुरुस्तीचे काम करण्यात येईल.- अरुण शिर्के, उपमहाव्यवस्थापक,जेएसडब्ल्यू कंपनी

टॅग्स :Raigadरायगड