शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

संरक्षक भिंतीस भगदाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 02:14 IST

श्रीवर्धन तालुक्यातील वेळास-आदगाव रस्त्याच्या कडेला असलेल्या समुद्राच्या संरक्षक भिंतीस अनेक ठिकाणी भगदाडे पडली आहेत.

संतोष सापते  श्रीवर्धन : श्रीवर्धन तालुक्यातील वेळास-आदगाव रस्त्याच्या कडेला असलेल्या समुद्राच्या संरक्षक भिंतीस अनेक ठिकाणी भगदाडे पडली आहेत. त्यामुळे रस्त्यावर अपघात होण्याची शक्यता आहे. श्रीवर्धन तालुक्यात आठवडाभरापासून पावसाने थैमान घातले आहे. भरतीच्या वेळी लाटा रस्त्यावर उतरून अपघाताची शक्यता वेळास-आदगाव रस्त्यावर वाढली आहे.श्रीवर्धन तालुक्यातील वेळास-आदगाव हा दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा मार्ग आहे. सर्वा, नानवेल व दिघीची वाहतूक या मार्गावरून होत असून लोकसंख्याही मोठी आहे. दुचाकी व चारचाकी वाहनांचे प्रमाण जास्त असल्यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. तसेच वेळास व सर्वा येथील सर्व विद्यार्थी शाळेसाठी आदगाव विद्यालयात याच रस्त्याने जात असल्याने त्यांच्याही जीवास धोका आहे.श्रीवर्धन तालुक्यात पर्यटन व्यवसायाला चालना मिळाली आहे. वेळास या गावी प्रसिद्ध भैरवनाथाचे मंदिर आहे. आदगावचा समुद्र किनारा पर्यटकांना आकर्षित करत आहे.तालुक्यातील लहान मच्छी विक्र ी करणारे आदगावमधून मासळी खरेदी करतात. त्यामुळे सदर मार्गावर सदैव वर्दळ असते.वेळास ते आदगाव ५ किलोमीटरचे अंतर आहे. रस्त्याच्या रु ंदीचा विचार करता अंदाजे १६ फूट रु ंदी आहे. तसेच दुतर्फा मातीची साइडपट्टी तीन तीन फूट आहे. रस्त्याच्या डाव्या बाजूस आदगावचा समुद्र किनारा लाभला आहे. समुद्राच्या पाण्यापासून संरक्षण करण्यासाठी भिंत बांधण्यात आली आहे. मात्र तीन किलोमीटर अंतराच्या संरक्षण भिंतीच्या परिसरात अनेक ठिकाणी सध्या मोठमोठी भगदाडे पडल्याचे निदर्शनास येत आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. संरक्षक भिंतीस सुद्धा तडे गेली आहेत. मुख्य रस्त्याच्या बाजूस मोठे खड्डे निर्माण झाल्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. दररोज या रस्त्याने वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांना खड्ड्यांची कल्पना आहे, परंतु पर्यटकांना मात्र वाहन चालवताना कसरत करावी लागते.वेळास-आदगाव मार्गे सर्वा या मार्गावर एसटीच्या १२ फेºया नियमित चालतात. तसेच खाजगी वाहतूक करणाºया विक्र म रिक्षा आहेत. तसेच भ्रमंतीसाठी येणारे पर्यटक यांची संख्या मोठी आहे.त्यामुळे वेळास-आदगाव रस्त्याच्या बाजूस असलेले खड्डे लवकर भरण्यात यावे व समुद्राच्या संरक्षक भिंतीची दुरु स्ती लवकर करावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.