शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

संरक्षक भिंतीस भगदाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 02:14 IST

श्रीवर्धन तालुक्यातील वेळास-आदगाव रस्त्याच्या कडेला असलेल्या समुद्राच्या संरक्षक भिंतीस अनेक ठिकाणी भगदाडे पडली आहेत.

संतोष सापते  श्रीवर्धन : श्रीवर्धन तालुक्यातील वेळास-आदगाव रस्त्याच्या कडेला असलेल्या समुद्राच्या संरक्षक भिंतीस अनेक ठिकाणी भगदाडे पडली आहेत. त्यामुळे रस्त्यावर अपघात होण्याची शक्यता आहे. श्रीवर्धन तालुक्यात आठवडाभरापासून पावसाने थैमान घातले आहे. भरतीच्या वेळी लाटा रस्त्यावर उतरून अपघाताची शक्यता वेळास-आदगाव रस्त्यावर वाढली आहे.श्रीवर्धन तालुक्यातील वेळास-आदगाव हा दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा मार्ग आहे. सर्वा, नानवेल व दिघीची वाहतूक या मार्गावरून होत असून लोकसंख्याही मोठी आहे. दुचाकी व चारचाकी वाहनांचे प्रमाण जास्त असल्यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. तसेच वेळास व सर्वा येथील सर्व विद्यार्थी शाळेसाठी आदगाव विद्यालयात याच रस्त्याने जात असल्याने त्यांच्याही जीवास धोका आहे.श्रीवर्धन तालुक्यात पर्यटन व्यवसायाला चालना मिळाली आहे. वेळास या गावी प्रसिद्ध भैरवनाथाचे मंदिर आहे. आदगावचा समुद्र किनारा पर्यटकांना आकर्षित करत आहे.तालुक्यातील लहान मच्छी विक्र ी करणारे आदगावमधून मासळी खरेदी करतात. त्यामुळे सदर मार्गावर सदैव वर्दळ असते.वेळास ते आदगाव ५ किलोमीटरचे अंतर आहे. रस्त्याच्या रु ंदीचा विचार करता अंदाजे १६ फूट रु ंदी आहे. तसेच दुतर्फा मातीची साइडपट्टी तीन तीन फूट आहे. रस्त्याच्या डाव्या बाजूस आदगावचा समुद्र किनारा लाभला आहे. समुद्राच्या पाण्यापासून संरक्षण करण्यासाठी भिंत बांधण्यात आली आहे. मात्र तीन किलोमीटर अंतराच्या संरक्षण भिंतीच्या परिसरात अनेक ठिकाणी सध्या मोठमोठी भगदाडे पडल्याचे निदर्शनास येत आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. संरक्षक भिंतीस सुद्धा तडे गेली आहेत. मुख्य रस्त्याच्या बाजूस मोठे खड्डे निर्माण झाल्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. दररोज या रस्त्याने वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांना खड्ड्यांची कल्पना आहे, परंतु पर्यटकांना मात्र वाहन चालवताना कसरत करावी लागते.वेळास-आदगाव मार्गे सर्वा या मार्गावर एसटीच्या १२ फेºया नियमित चालतात. तसेच खाजगी वाहतूक करणाºया विक्र म रिक्षा आहेत. तसेच भ्रमंतीसाठी येणारे पर्यटक यांची संख्या मोठी आहे.त्यामुळे वेळास-आदगाव रस्त्याच्या बाजूस असलेले खड्डे लवकर भरण्यात यावे व समुद्राच्या संरक्षक भिंतीची दुरु स्ती लवकर करावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.