शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

संरक्षक बांध फोडून शेतजमिनीत खारे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 01:08 IST

खारभूमी विकास खात्याच्या पेण तालुक्यातील जुई-अब्बास खारभूमी योजनेमधील खारढोंबी व खारमाचेला गावाजवळील समुद्र भरती संरक्षक बंधारे (बाहेरकाठे)

जयंत धुळपअलिबाग : खारभूमी विकास खात्याच्या पेण तालुक्यातील जुई-अब्बास खारभूमी योजनेमधील खारढोंबी व खारमाचेला गावाजवळील समुद्र भरती संरक्षक बंधारे (बाहेरकाठे) फुटून गेल्या ४ नोव्हेंबर रोजी दहा गावांतील सुमारे २३०० एकर भातशेतीमध्ये खारे पाणी घुसून १३०० शेतकरी कुटुंबांच्या भात पिकाचे प्रचंड नुकसान झाले. त्यानंतर आता रविवारी मार्गशीर्ष पौर्णिमेच्या रात्री याच परिसरातील खारपाले, देवळी, जुई, म्हैसबाड, ढोंबी आणि गडब या सहा गावांतील तब्बल २८०० एकर भातशेती जमिनीत समुद्राचे खारे पाणी घुसल्याने १६०० शेतकरी कुटुंबे पुन्हा एकदा चिंताग्रस्त झाले असल्याची माहिती खारडोंगर मेहनत आघाडी संघटनेचे अध्यक्ष पांडुरंग तुरे आणि सामाजिक कार्यकर्ते अरुण शिवकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.जुई-आब्बास, म्हैसबाड, खारडोंबी, खारघाट, खारचेरबी आणि माचेला या शासकीय खारभूमी योजनांतील हे संरक्षक बंधारे उधाणाच्या भरतीच्या तडाख्याने रविवारी रात्री व सोमवारी सकाळी फुटून हे खारे पाणी शेतीमध्ये घुसले आहे. गतवर्षी अशाच प्रकारे संरक्षक बंधारे फुटून खारे पाणी भातशेतीत घुसून झालेल्या नुकसानीचे पंचनामे शासकीय महसूल यंत्रणेने केले नसल्याने शेतकºयांना कोणत्याही प्रकारची शासकीय नुकसान भरपाई मिळू शकली नाही. त्यानंतर मे २०१७ मध्ये आलेल्या उधाणाच्यावेळी देखील संरक्षक बंधारे फुटून सुमारे १२०० एकर भातशेतीत खारे पाणी घुसले, त्यावेळी पंचनामे केले, परंतु शासकीय मदत तेव्हाही मिळाली नाही. तिसºयांदा ४ नोव्हेंबर २०१७ रोजी उधाणाने संरक्षक बंधारे फुटून खारे पाणी २३०० एकर भातशेतीत घुसले. पेण उप विभागीय कार्यालयासमोर शेतकºयांनी उपोषण आंदोलन केले, त्यानंतर नुकसानीची पाहणी होवून पंचनामे झाले, परंतु नुकसान भरपाई शेतकºयांना देण्याबाबत कोणताही निर्णय अद्याप झालेला नाही. खारभूमी विभागाच्या या निष्क्रिय आणि बेफिकीर कारभारामुळे आता शेतकरी व ग्रामस्थ संतप्त झाले असल्याचे शिवकर यांनी सांगितले.४ नोव्हेंबरचे उधाण आणि शेती नुकसानीनंतर नुकसान भरपाई मिळावी या मागणीकरिता पेण उप विभागीय महसूल अधिकारी प्रतिमा पुदलवाड यांच्या कार्यालयासमोर शेतकºयांनी उपोषण आंदोलन सुरू केल्यावर, पुदलवाड यांच्याकडे झालेल्या संयुक्त बैठकीत जेएसडब्ल्यू कंपनीने संरक्षक बंधारे बांधून देण्याचे मान्य केले होते. परंतु या नुकसानग्रस्त गावांतील बापदेव मंडळाने या समस्येबाबत पर्यावरणाच्या मुद्द्यावर हरित न्यायालयात दाद मागितली असल्याने संरक्षक बंधाºयाचे काम करण्याकरिता नाल्यात तात्पुरते पाइप टाकण्याकरिता या शेतकºयांनी विरोध केल्याने जेएसडब्ल्यू कंपनीस संरक्षक बंधाºयाच्या दुरुस्तीचे काम करता आले नाही.परिणामी रविवार-सोमवारच्या उधाणात संरक्षक बंधारे फुटून हे खारे पाणी २८०० एकर भातशेतीत घुसून मोठे नुकसान झाले असल्याचे शिवकर यांनी सांगितले.बैठकीत निर्णय न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन१संरक्षक बंधारे नव्याने बांधणे व असलेल्या बंधाºयांची दुरुस्ती करणे ही जबाबदारी ज्या खारलॅन्ड विभागाची आहे, तो खारलॅन्ड विभाग सातत्याने नामानिराळाच रहातो आणि शेतकºयांच्या रोषाला सातत्याने महसूल यंत्रणेस सामोरे जावे लागते, या परिस्थितीत देखील बदल होण्याच्या दृष्टीने या शेतकºयांना निर्णय अपेक्षित आहे.२गेल्या ४ नोव्हेंबर २०१७ रोजी झालेल्या मोठ्या उधाणामुळे संरक्षक बंधारे फुटून २३०० एकर भातशेतीत खारे पाणी शिरून अपरिमित नुकसान झाले आहे. त्या अनुषंगाने पेण उप विभागीय महसूल अधिकारी प्रतिमा पुदलवाड यांनी शुक्रवारी८ डिसेंबर २०१७ रोजी दुपारी चार वाजता पेण उप विभागीय महसूल कार्यालयात सर्व संबंधितांची बैठक बोलावली आहे.३या बैठकीत मागील सर्व उधाण नुकसानीबरोबरच रविवार-सोमवारच्या या ताज्या २८०० एकरातील भातशेती नुकसानीवरून वातावरण तप्त होणार असल्याची चिन्हे आहेत. या बैठकीत सुयोग्य निर्णय झाला नाही तर अलिबागमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा निर्णय देखील शेतकºयांनी घेतला आहे.४० शेतकºयांच्या जमिनी जेएसडब्ल्यूने केल्या खरेदीमाचेला गावातील किनारी भागातील ३० ते ४० शेतकºयांच्या शेतजमिनी जेएसडब्ल्यू कंपनीने घेतल्या आहेत. परिणामी हे ३० ते ४० शेतकरी आता संरक्षक बंधाºयाच्या सामूहिक दुरुस्ती कामास येत नाहीत.परिणामी या क्षेत्रातील संरक्षक बंधाºयांची दुरुस्तीच होत नसल्याने या बांधांची अवस्था बिकट झाली आहे.जेएसडब्ल्यू कंपनीने घेतलेल्या या ३० ते ४० शेतकºयांच्या शेतातील माती घेवून येथील संरक्षण बंधाºयांची दुरुस्ती करून, यापुढे होणारी संभाव्य नुकसानी टाळावी, अशी मागणी आता शेतकºयांनी केली असल्याचे शिवकर यांनी सांगितले.