शहरं
Join us  
Trending Stories
1
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
3
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
4
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
5
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
6
पावसाचा मंडे ‘ब्लॉक’! चाकरमानी स्टेशनावर अडकले, चार तासांत उपनगरात ७५ मि.मी. पाऊस
7
मुदतीत थकबाकी न भरल्यास संरक्षण नाहीच, भाडे न देणाऱ्याची हकालपट्टी निश्चित: सुप्रीम कोर्ट
8
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
9
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
10
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
11
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
12
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
13
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
14
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
15
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
16
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
17
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
18
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
19
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित

प्रस्तावित प्रकल्प  मार्गी लागणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 23:50 IST

रायगड जिल्हा हा औद्याेगिकीकरणामध्ये झपाट्याने पुढे पावले टाकत आहे.

आविष्कार देसाईरायगड : जिल्ह्याच्या प्रगतीचा आलेख उंचावताना दिसत आहे. ताे अधिक गतिमान हाेण्यासाठी आराेग्य, शिक्षण, पर्यटन, नागरी सुविधा यासाठी लागणाऱ्या विभागांसाठी पायाभूत सुविधांवर भर देऊन विविध प्रस्तावित प्रकल्पांना चालना देणे गरजेचे आहे.

रायगड जिल्हा हा औद्याेगिकीकरणामध्ये झपाट्याने पुढे पावले टाकत आहे. उद्याेगांसाठी शेतीचे क्षेत्र गिळंकृत करून त्या ठिकाणी माेठ्या संख्येने उद्याेगांचे जाळे विणले जात आहे. मात्र त्याच वेळी स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांकडे साेयीस्करपणे डाेळेझाक हाेताना दिसत आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांवर आंदाेलनाची वेळ येत आहे. याच कारणांनी नव्याने पाय राेवणाऱ्या उद्याेगांसाठी ते फारच त्रासदायक ठरत आहे. उद्याेगांच्या माध्यमातून विकास साधायचा असेल तर आधी सरकार आणि प्रशासनाला प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांची प्रामाणिकपणे साेडवणूक करावी लागेल.

आजही आरसीएफ, गेल, आरपीसीएल (आयपीसीएल), एचपीसीएल यासह अन्य औद्याेगिक क्षेत्रातील प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांचे घाेंगडे भिजत ठेवले आहे. जिल्ह्यामध्ये दर्जेदार शिक्षणासाठी तसेच उच्च शिक्षणासाठी आजही मुंबई, पुण्यावरच येथील तरुणांना अवलंबून राहावे लागत आहे. रायगड जिल्हा हा या दाेन्ही महानगरांच्या अगदी जवळ असतानाही ही वेळ आली आहे. रायगड जिल्ह्यामध्ये चांगल्या दर्जाच्या शैक्षणिक सुविधा निर्माण करून देणे गरजेचे आहे. सरकार आणि लाेकप्रतिनिधी यांनी याबाबत सकारात्मकता दाखविणे गरजेचे आहे.

आराेग्याच्या बाबतीमध्येही जिल्हा बराच मागासलेला आहे. उच्च दर्जाचे रुग्णालय, प्रशिक्षित तज्ज्ञ डाॅक्टर, आराेग्यविषयक आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधा गेल्या कित्येक वर्षांत झाल्या नाहीत. साध्या आजाराबराेबच गंभीर रुग्णांवर जिल्ह्यात उपचार केले जात नाहीत. त्यासाठी मुंबई आणि पुण्यावर अवलंबून राहावे लागत आहे.

टॅग्स :Raigadरायगड