शहरं
Join us  
Trending Stories
1
उज्ज्वला थिटेंना झटका! राजन पाटलांच्या सुनबाईच अनगरच्या नगराध्यक्ष होणार, न्यायालयात नेमके काय घडले?
2
'ब्लॅक फ्रायडे' म्हणजे काळा शुक्रवार...! मग भरमसाठ डिस्काऊंट देऊन साजरा का करतात कंपन्या...? 
3
Travel : कोल्डड्रिंकपेक्षाही स्वस्त पेट्रोल, इतर गोष्टीही खिशाला परवडणाऱ्या; भारतीयांसाठी व्हिसा फ्री आहे 'हे' बेट!
4
दत्त जयंती २०२५: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे कराल? पाहा, नियम-योग्य पद्धत
5
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
6
बिहार काँग्रेसच्या पराभवाची फाईल दिल्लीत उघडणार; ६१ उमेदवार जिल्हावार अहवाल सादर करणार
7
भारताला २० वर्षांनी पुन्हा मान! शताब्दी 'राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०३०' चे यजमानपद या शहराच्या पारड्यात...
8
मोठी बातमी! २ कोटी लोकांचे आधार क्रमांक कायमचे बंद झाले; UIDAI ने सुरु केली मोहिम...
9
Cyclone Senyar: 'सेन्यार'ने वेग घेतला! दक्षिण आणि पूर्व किनाऱ्यावर ७२ तास राहणार मोठा धोका
10
Pune Crime: "तिच्या बेडरुममध्ये झोपवलं आणि..."; कोल्हापुरातील व्यक्तीसोबत पुण्यातील महिलेने काय काय केलं?
11
१० रुपयांपेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, झटक्यात २०% वाढला भाव; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड
12
सात जन्माच्या साथीदारानेच केली क्रूरता! पतीमुळे ४ वर्षांच्या चिमुकल्याची आई ९ महिने तडफडत राहिली.. 
13
निवडणूक अधिकाऱ्यांना धोका, आयोगाने बंगाल पोलिसांना पत्र लिहिले; त्या घटनेची आठवून करून दिली
14
सोनिया जी, राहुल जी आन् मी..., कर्नाटक सत्तासंघर्षावर खर्गेंचे मोठे सेंकत! पुढचे 48 तास महत्वाचे; "200% 'तेच' CM होणार"
15
कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय; रेअर अर्थ मॅग्नेट उत्पादनाला भारतात मोठी गती मिळणार
16
मायक्रोसॉफ्टचा बाजार उठणार की काय? गुगल कॉम्प्युटर, लॅपटॉपसाठी आणतेय ऑपरेटिंग सिस्टीम...
17
टीम इंडियाचा दबदबा संपत चाललाय, काही जण तर..; लाजिरवाण्या पराभवानंतर हर्षा भोगलेंनी सुनावलं
18
पंडित देशमुख खुनाचा मुद्दा २० वर्षांनंतर प्रचारात, मोहोळच्या देशमुखांसोबत काय घडलं होतं?
19
'थोडी वाट पाहा, फोन करतो', मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेदरम्यान राहुल गांधींचा डीके शिवकुमार यांना मेसेज
20
एकनाथ शिंदे सत्ता मिळवून दिघे साहेबांचे स्वप्न साकारणार की गणेश नाईक पुन्हा दूर ठेवणार?
Daily Top 2Weekly Top 5

प्रस्तावित प्रकल्प  मार्गी लागणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 23:50 IST

रायगड जिल्हा हा औद्याेगिकीकरणामध्ये झपाट्याने पुढे पावले टाकत आहे.

आविष्कार देसाईरायगड : जिल्ह्याच्या प्रगतीचा आलेख उंचावताना दिसत आहे. ताे अधिक गतिमान हाेण्यासाठी आराेग्य, शिक्षण, पर्यटन, नागरी सुविधा यासाठी लागणाऱ्या विभागांसाठी पायाभूत सुविधांवर भर देऊन विविध प्रस्तावित प्रकल्पांना चालना देणे गरजेचे आहे.

रायगड जिल्हा हा औद्याेगिकीकरणामध्ये झपाट्याने पुढे पावले टाकत आहे. उद्याेगांसाठी शेतीचे क्षेत्र गिळंकृत करून त्या ठिकाणी माेठ्या संख्येने उद्याेगांचे जाळे विणले जात आहे. मात्र त्याच वेळी स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांकडे साेयीस्करपणे डाेळेझाक हाेताना दिसत आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांवर आंदाेलनाची वेळ येत आहे. याच कारणांनी नव्याने पाय राेवणाऱ्या उद्याेगांसाठी ते फारच त्रासदायक ठरत आहे. उद्याेगांच्या माध्यमातून विकास साधायचा असेल तर आधी सरकार आणि प्रशासनाला प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांची प्रामाणिकपणे साेडवणूक करावी लागेल.

आजही आरसीएफ, गेल, आरपीसीएल (आयपीसीएल), एचपीसीएल यासह अन्य औद्याेगिक क्षेत्रातील प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांचे घाेंगडे भिजत ठेवले आहे. जिल्ह्यामध्ये दर्जेदार शिक्षणासाठी तसेच उच्च शिक्षणासाठी आजही मुंबई, पुण्यावरच येथील तरुणांना अवलंबून राहावे लागत आहे. रायगड जिल्हा हा या दाेन्ही महानगरांच्या अगदी जवळ असतानाही ही वेळ आली आहे. रायगड जिल्ह्यामध्ये चांगल्या दर्जाच्या शैक्षणिक सुविधा निर्माण करून देणे गरजेचे आहे. सरकार आणि लाेकप्रतिनिधी यांनी याबाबत सकारात्मकता दाखविणे गरजेचे आहे.

आराेग्याच्या बाबतीमध्येही जिल्हा बराच मागासलेला आहे. उच्च दर्जाचे रुग्णालय, प्रशिक्षित तज्ज्ञ डाॅक्टर, आराेग्यविषयक आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधा गेल्या कित्येक वर्षांत झाल्या नाहीत. साध्या आजाराबराेबच गंभीर रुग्णांवर जिल्ह्यात उपचार केले जात नाहीत. त्यासाठी मुंबई आणि पुण्यावर अवलंबून राहावे लागत आहे.

टॅग्स :Raigadरायगड