शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

हनुमान कोळीवाडा, नवीन शेवा ग्रामपंचायतींकडून मालमत्ता कर वसूल करता येणार नाही - उच्च न्यायालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2020 00:19 IST

जेएनपीटी बंदर उभारणीसाठी येथील ११ ग्रामपंचायतींच्या हद्दीतील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादन केल्या आहेत. या ग्रामपंचायतींच्या हद्दीतच जेएनपीटी बंदर, बंदराच्या इमारती उभारल्या आहेत.

उरण : जेएनपीटी प्रकल्पबाधित आणि पुनर्वसन करण्यात आलेल्या हनुमान कोळीवाडा व नवीन शेवा या दोन ग्रामपंचायतींना महसुली गावाचा दर्जा दिलेला नसल्याने जेएनपीटीकडून मालमत्ता कर वसूल करता येणार नसल्याचे स्पष्ट आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. यामुळे या दोन्ही ग्रामपंचायतींना भविष्यात जेएनपीटीकडून थकीत मालमत्ता कराची रक्कम मिळण्याची शक्यता धूसर झाली आहे.न्यायालयात बाजू मांडताना जेएनपीटीने बंदरामुळे विस्थापित झालेल्या हनुमान कोळीवाडा आणि नवीन शेवा या दोन गावांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. त्यामुळे या दोन्ही ग्रामपंचायतींना महसुली गावाचा दर्जा देण्यात आला नसल्याने मालमत्ता कर देता येणार नसल्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे जेएनपीटीकडून तरी या ग्रामपंचायतींना भविष्यात मालमत्ता कर मिळणार नसल्याचे दिसते आहे.जेएनपीटी बंदर उभारणीसाठी येथील ११ ग्रामपंचायतींच्या हद्दीतील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादन केल्या आहेत. या ग्रामपंचायतींच्या हद्दीतच जेएनपीटी बंदर, बंदराच्या इमारती उभारल्या आहेत. ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर विकासकामेही करण्यात आलेली आहेत. त्यामुळे प्रत्येक प्रकल्पबाधित ग्रामपंचायतीचा मालमत्ता कराच्या वसुलीसाठी मागील ३५ वर्षांपासून जेएनपीटीच्या विरोधात संघर्ष सुरू आहे. निवेदने, चर्चा, बैठका, आंदोलने, जप्तीच्या कारवाईनंतरही जेएनपीटीने प्रकल्पबाधित ग्रामपंचायतींना दाद दिली नाही.त्यामुळे सर्वपक्षीय जेएनपीटी प्रकल्पग्रस्त समितीच्या माध्यमातून जेएनपीटीच्या मालमत्ता कराच्या वसुलीसाठी महाराष्ट्र शासनाकडे दाद मागितली होती. शासनानेही समितीची बाजू ग्राह्य धरून ११ ग्रामपंचायतींना मालमत्ता करापोटी थकीत असलेल्या ९५ कोटींची रक्कम अदा करण्याचे आदेश दिले होते. मात्र शासनाचाही निर्णय अमान्य करीत जेएनपीटीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.या कंपन्यांनी पत्रव्यवहार करावाहनुमान कोळीवाडा आणि नवीन शेवा या दोन्ही ग्रामपंचायतींच्या सीमेअंतर्गत एनएसआयसीटी, एनएसआयजीटी, जीटीआय, बीएमसीटीपीएल या खासगी बंदरांचा भूभागही येत नाही.तसेच या चारही खासगी बंदरांच्या धक्क्याला लागून असलेल्या जमिनीसंदर्भात उरणच्या भूमी अभिलेखामार्फत सर्वेक्षण केले जात आहे.त्यामुळे यापुढे मालमत्ता करासाठी जेएनपीटीने ३० वर्षांच्या कराराने भाडेतत्त्वावर देण्यात आलेल्या मेसर्स विराज एग्रो, मेसर्स गणेश बॅन्जोप्लास्ट, मेसर्स दीपक फर्टिलायझर या कंपन्यांशी पत्रव्यवहार करण्याचीतंबीही जेएनपीटी प्रशासनाचे मुख्य व्यवस्थापक व सचिव जयंत ढवळे यांनी दोन्ही ग्रामपंचायतींना लेखी पत्राद्वारे दिली आहे.

टॅग्स :Courtन्यायालय