शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया-युक्रेन युद्धबंदीवर ट्रम्प यांचा मोठा यू-टर्न...! म्हणाले, पुतिन-झेलेन्स्की आधी समोरा-समोर बोलतील
2
मनोज जरांगे पाटील आता तरी मुंबई गाठणार की वेशीवरुनच ऐनवेळी माघारी फिरणार?; चर्चांना उधाण
3
Stock Markets Today: आठवड्याच्या अखेरच्या दिवशी शेअर बाजारात घसरण; निफ्टी २५,००० च्या खाली, Wipro, Tata Motors, BEL मध्ये तेजी
4
दक्षिण अमेरिकेत मोठा भूकंप; हादऱ्यांमुळे लोक घाबरले, ७.५ तीव्रता, त्सुनामीचा इशारा
5
लखपती बनण्याची मशीन आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ २२२ रुपयांत सुरू करा गुंतवणूक, पाहा कॅलक्युलेशन
6
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
7
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
8
"रशियासाठी भारत लॉन्ड्री सर्व्हिस, पुढच्या आठवड्यात दुप्पट..."; ट्रम्प यांच्या सल्लागाराची पुन्हा धमकी
9
लक्ष्याच्या लेकीचं व्यवसायात पाऊल! स्वानंदी बेर्डेने सुरू केलं 'कांतप्रिया', आई-वडिलांच्या नावावरुन ठेवलं ब्रँडचं नाव
10
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
11
४ ग्रहांचे सप्टेंबरमध्ये गोचर: ८ राशींना श्रीमंती योग, सुख-सुबत्ता-समृद्धी; पद-पैसा वृद्धी!
12
पावसाळी परिस्थितीचा गैरफायदा, प्रवाशांची लूट, ॲप आधारित टॅक्सींवर कडक कारवाई करा: सरदेसाई
13
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
14
'दूरस्थ'चे दोन महिन्यांत केवळ १०,१६९ प्रवेश; कोणत्या अभ्यासक्रमांना किती प्रवेश? जाणून घ्या
15
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
16
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
17
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
18
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
19
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
20
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे

११ ग्रामपंचायतींचा मालमत्ता कर थकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2020 00:29 IST

खासदारांची जेएनपीटी अध्यक्षांसोबत बैठक : महिनाभरात थकबाकी अदा करण्याचे आश्वासन

उरण : जेएनपीटीकडे गेल्या दहा वर्षांपासून प्रकल्पबाधित ११ ग्रामपंचायतींचा कोट्यवधींचा थकीत असलेला मालमत्ता कर त्वरित देण्यात यावी यासाठी खा. श्रीरंग बारणे यांची अध्यक्षांसोबत मंगळवारी, १८ फे ब्रुवारी रोजी बैठक झाली. चर्चेनंतर येत्या महिनाभरात थकबाकी अदा करण्याचे आश्वासन जेएनपीटी अध्यक्ष संजय सेठी यांनी दिले.

जेएनपीटीकडे प्रकल्पबाधित ११ ग्रामपंचायतींचा कोट्यवधींचा मालमत्ता कर थकीत आहे. मालमत्ता कराअभावी या आकराही ग्रामपंचायतींचा विकास खुंटला आहे. मागील अनेक वर्षांपासून मालमत्ता कराची रक्कम अदा करण्याची मागणी संबंधित ११ ग्रामपंचायतीकडून केली जात आहे. मात्र विविध कारणे पुढे करून जेएनपीटी मालमत्ता कर देण्यास चालढकलपणा करीत आली आहे. मालमत्ता कराची रक्कम तत्काळ अदा करण्यात यावी यासाठी मंगळवारी मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि माजी आ. मनोहर भोईर यांच्या अध्यक्षतेखाली जेएनपीटी अध्यक्ष संजय सेठी यांच्या समवेत बैठक संपन्न झाली. या बैठकीस जेएनपीटी कामगार विश्वस्त दिनेश पाटील, तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, पंचायत समिती सदस्य हिराजी घरत, माजी विभागप्रमुख मधुकर ठाकूर, शिवसेना गटनेते गणेश शिंदे, उरण शहर संपर्क प्रमुख गणेश म्हात्रे, तसेच जेएनपीटी प्रकल्पबाधित ग्रामपंचायतींचे सरपंच, सदस्य, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख व कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी विविध समस्यांवरही चर्चा झाली. चर्चेनंतर येत्या महिनाभरात थकबाकी अदा करण्याचे आश्वासन जेएनपीटी अध्यक्ष संजय सेठी यांनी दिले. तसेच उरण तालुक्यातील गावांसाठी जेएनपीटी सीएसआर फंडातून विविध विकासकामे करण्यात येतील असेही आश्वासन सेठी यांनी दिले.त्याचबरोबर उरण तालुक्यातील ऐतिहासीक द्रोणागिरी किल्ल्याच्या संवर्धनासाठी जेएनपीटी प्रशासनाकडून विशेष रक्कम महाराष्ट्र शासनाकडे सुपूर्द करण्यात यावी, जेएनपीटी बंदरातून प्रचंड प्रमाणात होणारी कंटेनर वाहतूक व पार्किंगमुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवर होणारी वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी जेएनपीटी बंदराकरिता होणाऱ्या कंटेनरसाठी विशिष्ट पार्किंगची व्यवस्था करावी, सिंगापूर पोर्ट तसेच एनएसआय, जीटीआय आदी जेएनपीटीअंतर्गत उभारण्यात आलेल्या खासगी बंदरामध्ये होणाºया नोकरभरतीमध्ये प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना प्राधान्य द्यावे, नोकरीकरिता वयाची अट ३० वर्षे रद्द करून महाराष्ट्र शासनच्या शासन निर्णयानुसार ३५ वर्षे करावी आदि विविध प्रकारच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्यात यावी अशा मागण्याही संबंधितांकडून करण्यात आल्या.यावरही जेएनपीटी चेअरमन संजय सेठी यांनी सकारात्मक आश्वासन दिले आहे. 

टॅग्स :Raigadरायगड