शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

जेएनपीटीच्या समुद्र चॅनलवरच प्रकल्पग्रस्तांची चढाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 23:31 IST

आंदोलन : स्थानिक नेत्यांची पोलिसांकडून धरपकड; ३५ वर्षे हनुमान कोळीवाड्याच्या पुनर्वसनाचे काम कागदावरच

उरण : तब्बल वर्षे ३५ हनुमान कोळीवाड्याच्या पुनर्वसनाचे काम कागदावरच राहिले. त्यामुळे संतप्त झालेल्या शेकडो ग्रामस्थांनी शुक्रवारी (२६) भल्या पहाटेच थेट जेएनपीटीच्या समुद्र चॅनलवरच जोरदार चढाई केली. मध्यरात्रीपासून नेतृत्व करणाऱ्या स्थानिक नेत्यांची पोलिसांनी धरपकड सुरू केली. असे असतानाही पोलिसांना चकवा देत ४० बोटी आणि शेकडो महिला, पुरुष आंदोलनकर्त्यांनी जेएनपीटीचे समुद्र चॅनल बंद करून भर समुद्रात मालवाहू जहाजांचा मार्ग रोखून धरला.

२५६ घरांना लागलेल्या वाळवीमुळे फेर पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत असलेल्या हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांना जेएनपीटीने पुन्हा एकदा वाऱ्यावर सोडले आहे. पुनर्वसन कायद्यानुसार पायाभूत सोयी-सुविधांसह सुमारे १७ हेक्टर जागेच्या प्रस्तावावर हनुमान कोळीवाडा ग्रामस्थ ठाम आहेत. यासाठी ग्रामस्थांचा जेएनपीटी, केंद्र व राज्य सरकार विरोधात जोरदार संघर्ष सुरू आहे. उरण तहसीलदारांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांच्या पुनर्वसनाचा प्रश्न पोहचविण्यात आला आहे.

दरम्यानच्या काळात हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांनी शिवसेनेच्या माध्यमातून हा विषय केंद्र सरकारकडे नेण्यात आला. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार  श्रीरंग बारणे, सुनील तटकरे यांच्या माध्यमातून राज्यमंत्री मनसुख मांडविया यांच्याशी चर्चेच्या फेऱ्याही झडल्या. मात्र त्यातूनही आश्वासनांशिवाय काहीही हाती लागले नाही. त्यामुळे हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांनी २१ जानेवारी  रोजी जेएनपीटी समुद्र चॅनेल बंद आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता.

मात्र जिल्हाधिकारी निधी चौधरी आणि डीसीपी शिवराज पाटील यांच्या मध्यस्थीनंतर हे आंदोलन  महिनाभरासाठी स्थगित करण्यात आले होते. मात्र महिनाभराच्या प्रतीक्षेनंतरही हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांच्या १७ हेक्टर पुनर्वसन जागेचा प्रश्न सोडविण्यात केंद्र सरकार आणि जेएनपीटी अपयशी ठरले. त्यामुळे संतप्त झालेल्या हनुमान कोळीवाडा गावाच्या ग्रामस्थांनी शुक्रवारी पहाटे पासूनच जेएनपीटी विरोधात चॅनेल बंद आंदोलन सुरू  केले आहे.

टॅग्स :Raigadरायगड