शहरं
Join us  
Trending Stories
1
उज्ज्वला थिटेंना झटका! राजन पाटलांच्या सुनबाईच अनगरच्या नगराध्यक्ष होणार, न्यायालयात नेमके काय घडले?
2
'ब्लॅक फ्रायडे' म्हणजे काळा शुक्रवार...! मग भरमसाठ डिस्काऊंट देऊन साजरा का करतात कंपन्या...? 
3
दत्त जयंती २०२५: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे कराल? पाहा, नियम-योग्य पद्धत
4
बिहार काँग्रेसच्या पराभवाची फाईल दिल्लीत उघडणार; ६१ उमेदवार जिल्हावार अहवाल सादर करणार
5
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
6
भारताला २० वर्षांनी पुन्हा मान! शताब्दी 'राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०३०' चे यजमानपद या शहराच्या पारड्यात...
7
मोठी बातमी! २ कोटी लोकांचे आधार क्रमांक कायमचे बंद झाले; UIDAI ने सुरु केली मोहिम...
8
Cyclone Senyar: 'सेन्यार'ने वेग घेतला! दक्षिण आणि पूर्व किनाऱ्यावर ७२ तास राहणार मोठा धोका
9
Pune Crime: "तिच्या बेडरुममध्ये झोपवलं आणि..."; कोल्हापुरातील व्यक्तीसोबत पुण्यातील महिलेने काय काय केलं?
10
१० रुपयांपेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, झटक्यात २०% वाढला भाव; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड
11
सात जन्माच्या साथीदारानेच केली क्रूरता! पतीमुळे ४ वर्षांच्या चिमुकल्याची आई ९ महिने तडफडत राहिली.. 
12
निवडणूक अधिकाऱ्यांना धोका, आयोगाने बंगाल पोलिसांना पत्र लिहिले; त्या घटनेची आठवून करून दिली
13
सोनिया जी, राहुल जी आन् मी..., कर्नाटक सत्तासंघर्षावर खर्गेंचे मोठे सेंकत! पुढचे 48 तास महत्वाचे; "200% 'तेच' CM होणार"
14
कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय; रेअर अर्थ मॅग्नेट उत्पादनाला भारतात मोठी गती मिळणार
15
मायक्रोसॉफ्टचा बाजार उठणार की काय? गुगल कॉम्प्युटर, लॅपटॉपसाठी आणतेय ऑपरेटिंग सिस्टीम...
16
टीम इंडियाचा दबदबा संपत चाललाय, काही जण तर..; लाजिरवाण्या पराभवानंतर हर्षा भोगलेंनी सुनावलं
17
पंडित देशमुख खुनाचा मुद्दा २० वर्षांनंतर प्रचारात, मोहोळच्या देशमुखांसोबत काय घडलं होतं?
18
'थोडी वाट पाहा, फोन करतो', मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेदरम्यान राहुल गांधींचा डीके शिवकुमार यांना मेसेज
19
एकनाथ शिंदे सत्ता मिळवून दिघे साहेबांचे स्वप्न साकारणार की गणेश नाईक पुन्हा दूर ठेवणार?
20
IND vs SA : गौतम गंभीरचा राजीनामा द्यायला नकार! म्हणाला, "मी जिंकवलेल्या मालिका आठवा..!!"
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पग्रस्तांनी उरण रेल्वेचे काम तिसऱ्यांदा पाडले बंद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 00:27 IST

गुरुवारी केले आंदोलन : न्याय मिळण्याची केली मागणी 

लोकमत न्यूज नेटवर्क उरण :  स्थानिक रेल्वे प्रकल्पग्रस्त शेतकरी कृती सेवा संस्था काळाधोंडा व कोट ग्रामसुधारणा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी गुरुवारी (७) कोटनाका येथे सुरू असलेल्या उरण रेल्वे स्थानकाचे काम बंद पाडले. याआधीही ग्रामस्थांनी दोन वेळा प्रकल्पाचे काम बंद पाडले आहे.

   उरण तालुक्यातील कोटनाका-काळाधोंडा येथील शेकडो शेतकऱ्यांच्या जमिनी रेल्वे प्रकल्पाकरिता रेल्वे व सिडको प्रशासनामार्फत संयुक्तरीत्या संपादित करण्यात आलेल्या आहेत. त्या बदल्यात प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना मात्र कोणतीही आर्थिक नुकसानभरपाई देण्यात आलेली नाही. तसेच जमिनीचा योग्य प्रकारे मोबदलाही देण्यात आलेला नाही. मात्र मागील काही वर्षांपासून सुरू असलेल्या संघर्षानंतरही प्रकल्पबाधितांना न्याय मिळाला नाही.

   त्यामुळे आक्रमक झालेल्या संतप्त शेतकऱ्यांनी गुरुवारी (७) स्थानिक रेल्वे प्रकल्पग्रस्त शेतकरी कृती सेवा संस्था काळाधोंडा व कोटगाव ग्रामसुधारणा मंडळाचे अध्यक्ष नीलेश भोईर यांच्या नेतृत्वाखाली कोटनाका येथे सुरू असलेले रेल्वे स्थानक उभारण्याचे काम बंद पाडले.

  महिनाभरापूर्वी केलेल्या आंदोलनामुळे वठणीवर आलेल्या रेल्वे-सिडको प्रशासनाने यावर तोडगा काढण्यासाठी बैठक बोलावण्याचे आश्वासन दिले होते. या बैठकीतून काही तरी समाधानकारक मार्ग निघेल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र अद्यापही एकही बैठक झाली नसल्याने सिडको व रेल्वे प्रशासनाच्या ढिसाळ व बेजबाबदारीच्या कारभाराबद्दल प्रकल्पग्रस्तांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. जोपर्यंत प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत कोटनाका येथे सुरू असलेल्या उरण रेल्वे स्टेशनचे काम सुरूच होऊ देणार नाही, असा इशारा स्थानिक रेल्वे प्रकल्पग्रस्त शेतकरी कृती सेवा संस्था व कोटगाव ग्रामसुधारणा मंडळाने ठेकेदार व प्रशासनाला दिला आहे.

आर्थिक भरपाई मिळालेली नाही कोटनाका-काळाधोंडा येथील  शेतकऱ्यांच्या जमिनी रेल्वे व सिडको प्रशासनामार्फत संयुक्तरीत्या संपादित केल्या आलेल्या आहेत. त्या बदल्यात प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानभरपाई दिलेली नाही.  प्रकल्पबाधितांना नोकरीतही सामावून घेण्यात आलेले नाही. ठेकेदारीतील कामात प्राधान्य, व्यावसायिक गाळे मिळावेत यासाठी प्रकल्पग्रस्तांचा संघर्ष सुरू आहे.