शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: २६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप 
2
३५० सीसीवरील मोटरसायकलचा जीएसटी वाढला; KTM, Triumph अन् Aprilia ने मोठा निर्णय घेतला...
3
रशियाने भारताला SU-57 लढाऊ विमानांची ऑफर दिली, त्याचे फिचर अन् महत्त्व जाणून घ्या
4
अर्जुन तेंडुलकर राहुल द्रविडच्या मुलाला भिडला; समित द्रविड पहिल्यांदाच खेळला, पण... 
5
मराठी माणसाचं दुकान हडपल्याचा गुन्हा; 'त्या' परप्रांतीयाला शिंदेसेनेकडून जबाबदारी, पक्षात नाराजी
6
"गरबा कार्यक्रमांच्या प्रवेशद्वारावर गोमूत्र ठेवावं, गैर-हिंदूंना..."; धीरेंद्र शास्त्रींचं मोठं विधान
7
मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
8
दिल्लीतील रस्त्यावर मध्यरात्री चकमकीचा थरार, माया गँगच्या म्होरक्याविरोधात STF ची मोठी कारवाई
9
जीएसटीच्या पहिल्याच दिवशी मारुतीने २५,००० गाड्या विकल्या; ८० हजार लोकांची इन्क्वायरी...
10
वयाच्या २९व्या वर्षी वेगवान गोलंदाज निवृत्त; वकील बनण्यासाठी क्रिकेटशी तोडलं नातं!
11
Muhurat Trading 2025 Date and Time: वेळ लिहून ठेवा! या मुहूर्तावर शेअर बाजारात होणार धनवर्षा; १ तासासाठी उघडणार मार्केट
12
मुसळधार पावसाने कोलकात्याला झोडपले, अनेक भागात पाणी साचले, मेट्रो विस्कळीत, ५ जणांचा मृत्यू
13
निमिषा प्रियासारखंच प्रकरण; १९ वर्षांपासून सौदी अरेबियाच्या तुरुंगात असलेला अब्दुल रहीम सुटणार!
14
फक्त किराणाच नाही तर मॉलमध्ये शॉपिंगपासून ते सिनेमापर्यंत या गोष्टींवर भरघोस बचत; पाहा यादी
15
"मी तुमचा मोठा चाहता...", रितेश देशमुखने प्रसाद ओकचं केलं कौतुक; गंमतीत म्हणाला...
16
"बिग बॉसचं मला काही विचारू नका", भाऊ अमालबद्दल विचारताच अरमान मलिक भडकला, व्हिडीओ व्हायरल
17
महिला पोलीस अधिकाऱ्याने वर्दीवरील बॅज फेकून मारला; Video व्हायरल, घटनेची दुसरी बाजू आली समोर
18
काय आहे विमानाच्या टायरजवळची 'ती' जीवघेणी जागाा, जिथे बसून १३ वर्षांचा मुलगा अफगाणिस्तानातून भारतात आला
19
GST कमी झाला आणि AC-TV च्या विक्रीत झाली जोरदार वाढ, किराणा दुकानदारांनाही 'अच्छे दिन'
20
Kuttu Atta: नवरात्री उपवासाचं कुट्टूचं पीठ ठरलं विषारी; १५० हून अधिक लोक आजारी, रुग्णालयाबाहेर रांगा!

पर्यटन सुरु झाल्याने व्यावसायिक आनंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2020 23:51 IST

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या चर्चेने धास्ती : पर्यटकांमध्ये उत्साहाचे वातावरण

 सिकंदर अनवारेलोकमत न्यूज नेटवर्कदासगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले आठ महिने बंद असलेली पर्यटनस्थळे, गड-किल्ले आणि धार्मिक स्थळे विविध संघटनांच्या मागणीनंतर खुली करण्यात आली आहेत. रायगड किल्ला, पाचाड व महाड शहरातील चवदार तळे सर्वांसाठी खुले करण्यात आल्याने पर्यटकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. तर गेले काही महिने ठप्प झालेला रोजगार दिवाळी सुट्टीत पुन्हा भरभराटीस येईल अशी आशा येथील व्यावसायिकांना निर्माण झाली असतानाच राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या चर्चेने व्यावसायिक आणि स्थानिक नागरिक धास्तावले आहेत.

देशभरात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे टाळेबंदी जाहीर करण्यात आली होती. यामध्ये पर्यटन स्थळे, मंदिरे व संरक्षित राष्ट्रीय स्मारके पर्यटकांसाठी बंद करण्यात आली होती. महाराष्ट्राची अस्मिता असलेला रायगड किल्ला, राजमाता जिजाऊंचे समाधीस्थळ असलेले पाचाड व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक समतेचा लढा दिलेले महाडचे चवदार तळे ही महत्त्वाची स्थळेही बंद करण्यात आली होती. काही महिन्यांपूर्वी टाळेबंदी उठविण्यात आली. मात्र, महाडमधील ही संरक्षित स्थळे यानंतरही सर्वांसाठी बंद होती. त्यामुळे येथील व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली होती.

रायगड व पाचाड परिसरात मोठी हॉटेल्स नाहीत. परंतु लहान-मोठे सुमारे २०० व्यावसायिक व त्यावर अवलंबून असणारी सुमारे ५०० कुटुंबे आपली उपजीविका करीत असतात. गेले आठ महिने येथील हॉटेल व्यवसाय, निवास व्यवस्था, लहान-मोठी विक्रेत्यांची दुकाने, दही, ताक विकणारे, सरबत विकणारे छोटे व्यावसायिक, वडापावची टपरी या सर्वांना गळती लागली होती. व्यवसाय ठप्प झाल्याने पुढे करायचे काय? हा गंभीर प्रश्न व्यावसायिकांपुढे होता. टाळेबंदीनंतरही ही स्थळे सुरू न झाल्याने काही संघटना याबाबत आवाज उठवू लागल्या. या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी रायगड जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळे व संरक्षित स्थळे सर्वांसाठी खुली करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे येथील व्यावसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. रायगड किल्ला सुरू झाल्यानंतर स्थानिक पर्यटकांनी एकच गर्दी केली आहे. मात्र बाहेरील पर्यटक येण्यास सुरुवात झाल्याने स्थानिकांच्या मनात कोरोनाची भीतीदेखील निर्माण झाली आहे.

स्थानिकांमध्ये भीतीदिवाळीनंतर काही भागात पडणाऱ्या थंडीने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता जागतिक आरोग्य संघटनेने वर्तविली होती. त्यातच लसीकरणदेखील लांबणीवर पडले आहे. आजही दिल्लीमध्ये कोरोनाची स्थिती बिघडलेलीच आहे. शिवाय राज्यातदेखील अनेक भागांत पुन्हा कोरोनाचे रुग्ण आढळून येऊ लागले आहेत. पुढील दोन महिन्यांत जाणवणारा धोका लक्षात घेता गड-किल्ले सुरू करण्याच्या निर्णयावर शंकादेखील व्यक्त केली जात आहे. पर्यटकांची ये-जा सुरू झाल्यास याचा प्रसार ग्रामीण भागात होण्याचा धोका आरोग्य यंत्रणेकडून व्यक्त केला जात आहे. यामुळे गड-व्यावसायिक आनंदी असले तरी भीतीच्या छायेत आहेत.

आठ महिने आम्ही कसे काढले हे आम्हालाच ठाऊक. रायगडचे महत्त्व वेगळे असल्याने पर्यटक येण्यास सुरुवात झाली आहे. मात्र येणाऱ्या पर्यटकांनी नियम पालन करून कोरोनाचा प्रसारदेखील रोखला पाहिजे.- अमर सावंत, विक्रेता