शहरं
Join us  
Trending Stories
1
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
2
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
3
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
4
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
5
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
6
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
7
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
8
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
9
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
10
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
11
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
12
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
13
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
14
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
15
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
16
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
17
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
18
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
19
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
20
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप

पर्यटन सुरु झाल्याने व्यावसायिक आनंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2020 23:51 IST

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या चर्चेने धास्ती : पर्यटकांमध्ये उत्साहाचे वातावरण

 सिकंदर अनवारेलोकमत न्यूज नेटवर्कदासगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले आठ महिने बंद असलेली पर्यटनस्थळे, गड-किल्ले आणि धार्मिक स्थळे विविध संघटनांच्या मागणीनंतर खुली करण्यात आली आहेत. रायगड किल्ला, पाचाड व महाड शहरातील चवदार तळे सर्वांसाठी खुले करण्यात आल्याने पर्यटकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. तर गेले काही महिने ठप्प झालेला रोजगार दिवाळी सुट्टीत पुन्हा भरभराटीस येईल अशी आशा येथील व्यावसायिकांना निर्माण झाली असतानाच राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या चर्चेने व्यावसायिक आणि स्थानिक नागरिक धास्तावले आहेत.

देशभरात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे टाळेबंदी जाहीर करण्यात आली होती. यामध्ये पर्यटन स्थळे, मंदिरे व संरक्षित राष्ट्रीय स्मारके पर्यटकांसाठी बंद करण्यात आली होती. महाराष्ट्राची अस्मिता असलेला रायगड किल्ला, राजमाता जिजाऊंचे समाधीस्थळ असलेले पाचाड व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक समतेचा लढा दिलेले महाडचे चवदार तळे ही महत्त्वाची स्थळेही बंद करण्यात आली होती. काही महिन्यांपूर्वी टाळेबंदी उठविण्यात आली. मात्र, महाडमधील ही संरक्षित स्थळे यानंतरही सर्वांसाठी बंद होती. त्यामुळे येथील व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली होती.

रायगड व पाचाड परिसरात मोठी हॉटेल्स नाहीत. परंतु लहान-मोठे सुमारे २०० व्यावसायिक व त्यावर अवलंबून असणारी सुमारे ५०० कुटुंबे आपली उपजीविका करीत असतात. गेले आठ महिने येथील हॉटेल व्यवसाय, निवास व्यवस्था, लहान-मोठी विक्रेत्यांची दुकाने, दही, ताक विकणारे, सरबत विकणारे छोटे व्यावसायिक, वडापावची टपरी या सर्वांना गळती लागली होती. व्यवसाय ठप्प झाल्याने पुढे करायचे काय? हा गंभीर प्रश्न व्यावसायिकांपुढे होता. टाळेबंदीनंतरही ही स्थळे सुरू न झाल्याने काही संघटना याबाबत आवाज उठवू लागल्या. या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी रायगड जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळे व संरक्षित स्थळे सर्वांसाठी खुली करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे येथील व्यावसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. रायगड किल्ला सुरू झाल्यानंतर स्थानिक पर्यटकांनी एकच गर्दी केली आहे. मात्र बाहेरील पर्यटक येण्यास सुरुवात झाल्याने स्थानिकांच्या मनात कोरोनाची भीतीदेखील निर्माण झाली आहे.

स्थानिकांमध्ये भीतीदिवाळीनंतर काही भागात पडणाऱ्या थंडीने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता जागतिक आरोग्य संघटनेने वर्तविली होती. त्यातच लसीकरणदेखील लांबणीवर पडले आहे. आजही दिल्लीमध्ये कोरोनाची स्थिती बिघडलेलीच आहे. शिवाय राज्यातदेखील अनेक भागांत पुन्हा कोरोनाचे रुग्ण आढळून येऊ लागले आहेत. पुढील दोन महिन्यांत जाणवणारा धोका लक्षात घेता गड-किल्ले सुरू करण्याच्या निर्णयावर शंकादेखील व्यक्त केली जात आहे. पर्यटकांची ये-जा सुरू झाल्यास याचा प्रसार ग्रामीण भागात होण्याचा धोका आरोग्य यंत्रणेकडून व्यक्त केला जात आहे. यामुळे गड-व्यावसायिक आनंदी असले तरी भीतीच्या छायेत आहेत.

आठ महिने आम्ही कसे काढले हे आम्हालाच ठाऊक. रायगडचे महत्त्व वेगळे असल्याने पर्यटक येण्यास सुरुवात झाली आहे. मात्र येणाऱ्या पर्यटकांनी नियम पालन करून कोरोनाचा प्रसारदेखील रोखला पाहिजे.- अमर सावंत, विक्रेता