शहरं
Join us  
Trending Stories
1
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
2
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
3
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
4
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
5
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
6
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
7
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
8
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
9
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
10
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
11
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
12
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
13
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
14
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
15
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
16
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
17
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
18
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
19
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
20
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...

पर्यटन सुरु झाल्याने व्यावसायिक आनंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2020 23:51 IST

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या चर्चेने धास्ती : पर्यटकांमध्ये उत्साहाचे वातावरण

 सिकंदर अनवारेलोकमत न्यूज नेटवर्कदासगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले आठ महिने बंद असलेली पर्यटनस्थळे, गड-किल्ले आणि धार्मिक स्थळे विविध संघटनांच्या मागणीनंतर खुली करण्यात आली आहेत. रायगड किल्ला, पाचाड व महाड शहरातील चवदार तळे सर्वांसाठी खुले करण्यात आल्याने पर्यटकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. तर गेले काही महिने ठप्प झालेला रोजगार दिवाळी सुट्टीत पुन्हा भरभराटीस येईल अशी आशा येथील व्यावसायिकांना निर्माण झाली असतानाच राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या चर्चेने व्यावसायिक आणि स्थानिक नागरिक धास्तावले आहेत.

देशभरात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे टाळेबंदी जाहीर करण्यात आली होती. यामध्ये पर्यटन स्थळे, मंदिरे व संरक्षित राष्ट्रीय स्मारके पर्यटकांसाठी बंद करण्यात आली होती. महाराष्ट्राची अस्मिता असलेला रायगड किल्ला, राजमाता जिजाऊंचे समाधीस्थळ असलेले पाचाड व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक समतेचा लढा दिलेले महाडचे चवदार तळे ही महत्त्वाची स्थळेही बंद करण्यात आली होती. काही महिन्यांपूर्वी टाळेबंदी उठविण्यात आली. मात्र, महाडमधील ही संरक्षित स्थळे यानंतरही सर्वांसाठी बंद होती. त्यामुळे येथील व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली होती.

रायगड व पाचाड परिसरात मोठी हॉटेल्स नाहीत. परंतु लहान-मोठे सुमारे २०० व्यावसायिक व त्यावर अवलंबून असणारी सुमारे ५०० कुटुंबे आपली उपजीविका करीत असतात. गेले आठ महिने येथील हॉटेल व्यवसाय, निवास व्यवस्था, लहान-मोठी विक्रेत्यांची दुकाने, दही, ताक विकणारे, सरबत विकणारे छोटे व्यावसायिक, वडापावची टपरी या सर्वांना गळती लागली होती. व्यवसाय ठप्प झाल्याने पुढे करायचे काय? हा गंभीर प्रश्न व्यावसायिकांपुढे होता. टाळेबंदीनंतरही ही स्थळे सुरू न झाल्याने काही संघटना याबाबत आवाज उठवू लागल्या. या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी रायगड जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळे व संरक्षित स्थळे सर्वांसाठी खुली करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे येथील व्यावसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. रायगड किल्ला सुरू झाल्यानंतर स्थानिक पर्यटकांनी एकच गर्दी केली आहे. मात्र बाहेरील पर्यटक येण्यास सुरुवात झाल्याने स्थानिकांच्या मनात कोरोनाची भीतीदेखील निर्माण झाली आहे.

स्थानिकांमध्ये भीतीदिवाळीनंतर काही भागात पडणाऱ्या थंडीने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता जागतिक आरोग्य संघटनेने वर्तविली होती. त्यातच लसीकरणदेखील लांबणीवर पडले आहे. आजही दिल्लीमध्ये कोरोनाची स्थिती बिघडलेलीच आहे. शिवाय राज्यातदेखील अनेक भागांत पुन्हा कोरोनाचे रुग्ण आढळून येऊ लागले आहेत. पुढील दोन महिन्यांत जाणवणारा धोका लक्षात घेता गड-किल्ले सुरू करण्याच्या निर्णयावर शंकादेखील व्यक्त केली जात आहे. पर्यटकांची ये-जा सुरू झाल्यास याचा प्रसार ग्रामीण भागात होण्याचा धोका आरोग्य यंत्रणेकडून व्यक्त केला जात आहे. यामुळे गड-व्यावसायिक आनंदी असले तरी भीतीच्या छायेत आहेत.

आठ महिने आम्ही कसे काढले हे आम्हालाच ठाऊक. रायगडचे महत्त्व वेगळे असल्याने पर्यटक येण्यास सुरुवात झाली आहे. मात्र येणाऱ्या पर्यटकांनी नियम पालन करून कोरोनाचा प्रसारदेखील रोखला पाहिजे.- अमर सावंत, विक्रेता