शहरं
Join us  
Trending Stories
1
सूडानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
2
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
3
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
4
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
5
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
6
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
7
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
8
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
9
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
10
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
11
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
12
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
13
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
14
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
15
साताऱ्यात मेफेड्रॉन कारखाना उद्ध्वस्त; कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त, सात अटकेत
16
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
17
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
18
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
19
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
20
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
Daily Top 2Weekly Top 5

दिघी पोर्टला समस्यांचा विळखा; रस्ते, रोजगारनिर्मितीबाबत प्रश्नचिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 02:18 IST

दिघी पोर्टमध्ये २००२पासून काम सुरू झाले असले, तरी अनेक समस्यांमुळे पोर्ट नेहमीच वादात अडकले आहे. बँकांचे कर्ज, आर्थिक फसवणुकीचे गुन्हे, शून्य रोजगारनिर्मिती, कर्मचाऱ्यांचे थकलेले पगार, अशा अनेक कारणांमुळे दिघी पोर्ट दिवाळखोरीत निघाल्याचे चित्र आहे.

- श्रीकांत शेलारदांडगुरी : दिघी पोर्टमध्ये २००२पासून काम सुरू झाले असले, तरी अनेक समस्यांमुळे पोर्ट नेहमीच वादात अडकले आहे. बँकांचे कर्ज, आर्थिक फसवणुकीचे गुन्हे, शून्य रोजगारनिर्मिती, कर्मचाऱ्यांचे थकलेले पगार, अशा अनेक कारणांमुळे दिघी पोर्ट दिवाळखोरीत निघाल्याचे चित्र आहे. परिणामी, डीबीएम जिओटेक्निकल अ‍ॅण्ड कन्स्ट्रक्शन कंपनीने दिघी बंदर प्रशासनाविरोधात कंपनी लवादाकडे दाद मागितली आहे.महाराष्ट्र मेरीटाइम बोर्ड व बालाजी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी यामध्ये पाच वर्षांचा बांधकाम कालावधी धरून एकूण ५० वर्षांचा बीओटी करार करण्यात आला. करारानुसार १५०० कोटी रुपये खर्च करून, दिघी व आगरदांडा येथे लिक्विड कार्गो, बल्क कार्गो, एलएनजी टर्मिनल, कंटेनर टर्मिनल हे पाच वर्षांत बांधून कार्यान्वित करणे अपेक्षित होते; पण सुरुवातीला स्थानिक पातळीवर खाडीजवळील भराव, डोंगर फोडण्यामुळे घरांना हादरे बसणे, भूसंपादन, मच्छीमारांची जाळी बार्जेसमुळे फाटली जाणे, अशा अनेक कारणांमुळे प्रकल्पाला विरोध झाल्यामुळे बंदराचे काम रखडले. त्यात भराव व उत्खनन करताना रॉयल्टी भरणे, पोर्ट विकासात स्थानिक ग्रामपंचायतीची बांधकाम परवानगीबाबत मेरीटाइम बोर्ड व बंदरविकास मंत्रत्रालयाने स्थानिक प्रशासनाला विश्वासात न घेतल्याने अडचणी आणखी वाढल्या. पोर्ट विकसित करताना पावसामुळे भराव वाहून जाणे, मातीची धूप रोखण्यासाठी तजवीज करणे, गाळ काढणे, यांसाठी वेळ व पैसा वाया गेला आहे.प्रकल्प राबवताना सुरुवातीला कंपनीच्या प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये काही त्रुटी राहिल्या. दिघी येथील माती वाहून जाण्याचे प्रमाण कमी होते, नैसर्गिक खोली होती, ब्रेकवॉटर वॉल न बांधताही मोठी जहाजे सहज हाताळली जात होती. यामुळेच कंत्राटदार विकासकाने दिघी टर्मिनलचा एक टप्पा सुरू करून म्हसळा व माणगाव शहर बायपास बांधून दिघी-माणगाव राज्यमार्ग (सध्या राष्ट्रीय महामार्ग)चे मजबुतीकरण केले असते, तर २४ तास मालाची हाताळणी होऊन पूर्ण क्षमतेने कार्यान्वयित झाला असता, आणि पुढच्या टप्प्याकरिता आगरदांडा टर्मिनल विकासासाठी नियमित उत्पन्न सुरू झाले असते. कोकणातील खनिजे, पश्चिम महाराष्ट्रातला शेतमाल व उसाची मळी निर्यात करण्यासाठी दिघी पोर्ट ते पुणे हा महामार्ग नियोजित आहे. मात्र, रस्ते विकासासाठी निधी नसणे, शासनाची रॉयल्टी थकणे, अंतर्गत कंत्राटदारांची बिले थकणे, कर्मचाºयांचे पगारे थकवणे, करारात नमूद असताना गावाला अपुरा पाणीपुरवठा करणे, यातून वेळोवेळी ठेकेदार कंपनीची आर्थिक क्षमता कमजोर दिसून येते.दिघी पोर्ट संदर्भात कंपनी लवादाकडे असलेल्या प्रकरणाला तात्पुरती स्थगिती दिली.- विजय कलंत्री,विकासक, दिघी बंदर

टॅग्स :Raigadरायगड