शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
2
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
3
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
4
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
5
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
6
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
7
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
8
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
9
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
10
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
11
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
12
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
13
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
14
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
15
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
16
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
17
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
18
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
19
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
20
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!

दिघी पोर्टला समस्यांचा विळखा; रस्ते, रोजगारनिर्मितीबाबत प्रश्नचिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 02:18 IST

दिघी पोर्टमध्ये २००२पासून काम सुरू झाले असले, तरी अनेक समस्यांमुळे पोर्ट नेहमीच वादात अडकले आहे. बँकांचे कर्ज, आर्थिक फसवणुकीचे गुन्हे, शून्य रोजगारनिर्मिती, कर्मचाऱ्यांचे थकलेले पगार, अशा अनेक कारणांमुळे दिघी पोर्ट दिवाळखोरीत निघाल्याचे चित्र आहे.

- श्रीकांत शेलारदांडगुरी : दिघी पोर्टमध्ये २००२पासून काम सुरू झाले असले, तरी अनेक समस्यांमुळे पोर्ट नेहमीच वादात अडकले आहे. बँकांचे कर्ज, आर्थिक फसवणुकीचे गुन्हे, शून्य रोजगारनिर्मिती, कर्मचाऱ्यांचे थकलेले पगार, अशा अनेक कारणांमुळे दिघी पोर्ट दिवाळखोरीत निघाल्याचे चित्र आहे. परिणामी, डीबीएम जिओटेक्निकल अ‍ॅण्ड कन्स्ट्रक्शन कंपनीने दिघी बंदर प्रशासनाविरोधात कंपनी लवादाकडे दाद मागितली आहे.महाराष्ट्र मेरीटाइम बोर्ड व बालाजी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी यामध्ये पाच वर्षांचा बांधकाम कालावधी धरून एकूण ५० वर्षांचा बीओटी करार करण्यात आला. करारानुसार १५०० कोटी रुपये खर्च करून, दिघी व आगरदांडा येथे लिक्विड कार्गो, बल्क कार्गो, एलएनजी टर्मिनल, कंटेनर टर्मिनल हे पाच वर्षांत बांधून कार्यान्वित करणे अपेक्षित होते; पण सुरुवातीला स्थानिक पातळीवर खाडीजवळील भराव, डोंगर फोडण्यामुळे घरांना हादरे बसणे, भूसंपादन, मच्छीमारांची जाळी बार्जेसमुळे फाटली जाणे, अशा अनेक कारणांमुळे प्रकल्पाला विरोध झाल्यामुळे बंदराचे काम रखडले. त्यात भराव व उत्खनन करताना रॉयल्टी भरणे, पोर्ट विकासात स्थानिक ग्रामपंचायतीची बांधकाम परवानगीबाबत मेरीटाइम बोर्ड व बंदरविकास मंत्रत्रालयाने स्थानिक प्रशासनाला विश्वासात न घेतल्याने अडचणी आणखी वाढल्या. पोर्ट विकसित करताना पावसामुळे भराव वाहून जाणे, मातीची धूप रोखण्यासाठी तजवीज करणे, गाळ काढणे, यांसाठी वेळ व पैसा वाया गेला आहे.प्रकल्प राबवताना सुरुवातीला कंपनीच्या प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये काही त्रुटी राहिल्या. दिघी येथील माती वाहून जाण्याचे प्रमाण कमी होते, नैसर्गिक खोली होती, ब्रेकवॉटर वॉल न बांधताही मोठी जहाजे सहज हाताळली जात होती. यामुळेच कंत्राटदार विकासकाने दिघी टर्मिनलचा एक टप्पा सुरू करून म्हसळा व माणगाव शहर बायपास बांधून दिघी-माणगाव राज्यमार्ग (सध्या राष्ट्रीय महामार्ग)चे मजबुतीकरण केले असते, तर २४ तास मालाची हाताळणी होऊन पूर्ण क्षमतेने कार्यान्वयित झाला असता, आणि पुढच्या टप्प्याकरिता आगरदांडा टर्मिनल विकासासाठी नियमित उत्पन्न सुरू झाले असते. कोकणातील खनिजे, पश्चिम महाराष्ट्रातला शेतमाल व उसाची मळी निर्यात करण्यासाठी दिघी पोर्ट ते पुणे हा महामार्ग नियोजित आहे. मात्र, रस्ते विकासासाठी निधी नसणे, शासनाची रॉयल्टी थकणे, अंतर्गत कंत्राटदारांची बिले थकणे, कर्मचाºयांचे पगारे थकवणे, करारात नमूद असताना गावाला अपुरा पाणीपुरवठा करणे, यातून वेळोवेळी ठेकेदार कंपनीची आर्थिक क्षमता कमजोर दिसून येते.दिघी पोर्ट संदर्भात कंपनी लवादाकडे असलेल्या प्रकरणाला तात्पुरती स्थगिती दिली.- विजय कलंत्री,विकासक, दिघी बंदर

टॅग्स :Raigadरायगड