शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
6
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
7
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
8
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
9
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
10
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
11
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
12
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
13
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
14
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
15
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
16
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
17
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
18
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
20
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात पाणीटंचाईची समस्या गंभीर

By admin | Updated: April 18, 2017 06:47 IST

पाऊस चांगला झाला...पीकही चांगले आले...शेतकऱ्याला चांगले उत्पन्न मिळाले... आणि यंदा तरी पाणीटंचाईपासून मुक्ती मिळणार या आशेने नागरिकही समाधानी झाले

जयंत धुळप, अलिबागपाऊस चांगला झाला...पीकही चांगले आले...शेतकऱ्याला चांगले उत्पन्न मिळाले... आणि यंदा तरी पाणीटंचाईपासून मुक्ती मिळणार या आशेने नागरिकही समाधानी झाले. मात्र पाणीटंचाईमुक्त रायगडचे स्वप्न जिल्ह्यातील ३७ ते ४२ अं.से.च्या तापमानात यंदा पूर्णपणे विरून गेले आहे. वाढत्या तापमानाबरोबर पाणीटंचाईची झळ यंदा जिल्ह्यातील ३६७ गावे आणि १ हजार १०९ वाड्यांमधील ग्रामस्थांना बसणार आहे. जिल्ह्यातील या सर्व टंचाईग्रस्त गाव-वाड्यांतील ग्रामस्थांची तहान भागविण्याकरिता तब्बल ६ कोटी २५ लाख १० हजार रुपये जिल्हा प्रशासनाला खर्च करावे लागणार आहे. यंदाचा टंचाई निवारण आराखडा तयार करण्यात आला असून तो राज्य सरकारला पाठविण्यात आला आहे.जिल्ह्यातील पाणीटंचाईग्रस्त ३६७ गावांपैकी सर्वाधिक टंचाईग्रस्त ४८ गावे तर टंचाईग्रस्त एकूण १ हजार १०९ वाड्यांपैकी सर्वाधिक २७२ वाड्या या एकट्या पोलादपूर तालुक्यामध्ये आहेत. पोलादपूरशेजारील महाड तालुक्यात ३६ गावे तर २२० वाड्या टंचाईग्रस्त आहेत. महाड-पोलादपूर बरोबरच कर्जत तालुक्यात देखील मोठे जलदुर्भिक्ष जाणवत असून या तालुक्यात ४४ गावे तर ३७ वाड्या टंचाईग्रस्त आहेत. एकेकाळी टंचाईमुक्त झालेल्या अलिबाग तालुक्यात देखील तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून १२ गावांबरोबरच ७१ वाड्यांमध्ये पाणीप्रश्न गंभीर झाला आहे. पेण तालुक्यातील ग्रामीण व दुर्गम भागातील जलदुर्भिक्ष यंदाही कायम असून, पेण तालुक्यातील १५४ वाड्यांबरोबरच ३९ गावांमध्ये पाणीटंचाई आहे.१५ एप्रिल २०१७ रोजीच यंदा जिल्ह्यातील तीव्र पाणीटंचाईग्रस्त १२ गावे आणि ७४ वाड्यांना १३ टँकर्सच्या माध्यमातून पाणीपुरवठा करावा लागत आहे. महाड तालुक्यातील २ गावे आणि ६ वाड्या, तर पोलादपूर तालुक्यातील ४ गावे आणि २६ वाड्यांना प्रत्येकी तीन टँकर्सच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पेण तालुक्यातील ४ गावे आणि २९ वाड्यांना दोन टँकर्सच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पनवेलमधील दोन वाड्या, खालापूरमधील एक गाव व एक वाडी, रोहा तालुक्यातील एक वाडी तर श्रीवर्धनमधील दोन वाड्या यांना प्रत्येकी एका टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.जलशिवार योजनेंतर्गत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बंधाऱ्यांची कामे करण्यात आली. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात जलसाठा देखील संकलित झाला, परंतु जिल्ह्यातील लक्षणीय तापमानामुळे तो जलसाठा पाणीटंचाई दूर करण्यात यशस्वी होऊ शकलेला नाही, हे या निमित्ताने स्पष्ट झाले आहे. परिणामी जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणार्थ केवळ टँकर्स आणि विंधण विहिरींची पारंपरिक मात्रा देणे प्रशासनाच्या हाती राहिले आहे.