शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

जिल्ह्यात ७० हजार जनावरांचे पावसाळापूर्व लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2023 13:11 IST

रायगड जिल्ह्यात तीन हजार मि.मी.पेक्षा अधिक पाऊस पडतो. अनेक वेळा पूरपरिस्थिती निर्माण होते.

अलिबाग : पावसाळ्यात उद्भवणाऱ्या संसर्गजन्य आजारांमुळे पशुधनाची हानी होते. त्यामुळे या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभाग सज्ज झाला आहे. जिल्ह्यातील गाय, म्हैस, शेळी- मेंढ्या आदी ७० हजार १६६ जनावरांचे लसीकरण करण्यात संबंधित विभागाला यश आले आहे.रायगड जिल्ह्यात तीन हजार मि.मी.पेक्षा अधिक पाऊस पडतो. अनेक वेळा पूरपरिस्थिती निर्माण होते. या बदलत्या वातावरणामुळे संसर्गजन्य आजार होतात. यामुळे गायी, म्हशी, कोंबड्या, बकऱ्या पशू व पक्षांना घटसर्प, फन्या, आंत्रविषारसारखे रोग होतात. ताप येणे, श्वसननलिका सूजणे, नाकातून चिकट स्राव येणे ही घटसर्प आजाराची लक्षणे आहेत, या आजारावर वेळेत उपचार न केल्यास जनावरांचा मृत्यू होतो. या रोगामुळे जनावरांमधील प्रतिकारशक्ती कमी होते. उत्पादन क्षमता कमी होते. त्यामुळे या संसर्गजन्य रोगांवर मात करण्यासाठी तसेच नियंत्रण ठेवण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने पुढाकार घेतला आहे. या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी महिनाभरापासून प्रत्येक तालुक्यात या लसीचे वितरण केले आहे. यातून आतापर्यंत ७० हजार जनावरांना लस देण्यात आली आहे. 

अशी घ्या जनावरांची काळजी    रोगप्रतिकारशक्ती निर्माण होण्यासाठी जनावरांना योग्य असा पोषक आहार म्हणजेच क्षार व खनिजे यांचे मिश्रण द्यावे.    लसीकरण करण्यापूर्वी एक आठवडा अगोदर जंतनाशक औषध द्यावे, तर लसीकरणानंतर जनावरांना अतिशय कष्टाची कामे करू देऊ नयेत.     गाभण जनावरांना लस टोचू नये. लस देताना लसीची मात्रा व देण्याची पद्धत तंतोतंत पाळावी.    लसीकरण से नेहमी दिवसाच्या थंड वेळेतच माणजेच सकाळी किंवा संध्याकाळी करावे.     लस टोचलेल्या जागी कोणत्याही जंतुनाशकाचा वापर करू नये. 

टॅग्स :Raigadरायगड