शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

प्रभू श्रीराम स्वगृही विराजमान झाले, कारसेवक किशोर जैन यांची प्रतिक्रिया

By राजेश भोस्तेकर | Updated: January 22, 2024 15:44 IST

आयोध्येत रामललाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली आहे. हा आमच्यासाठी आनंदाचा दिवस आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

अलिबाग : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने बाबरी मशीद पाडण्याचे आदेश दिल्यानंतर युपी राज्यात दाखल झालो मात्र मुलायम सिह यांच्या सरकारने कारसेवक यांना पकडून बंदिवान केले होते. १३ दिवस जेलमध्ये ठेवले त्यानंतर सोडून दिले. २२ जानेवारी रोजी आयोध्येत रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. हा आमच्यासाठी आनंदाचा दिवस आहे. अशी प्रतिक्रिया नागोठणे येथील ठाकरे गटाचे नेते किशोर जैन यांनी दिली आहे. 

१९९० साली आयोध्यातील बाबरी मशीद पाडण्यासाठी नागोठणे येथून १६ ते १७ जण ट्रेनने युपी मध्ये पोहचलो. यावेळी जिल्ह्यातून साडे तीनशे शिवसैनिक हे दाखल झाले होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आदेश मानून आम्ही कार सेवक म्हणून गेलो होतो. त्यावेळी जैन हे २५ वर्षाचे होते. बाबरी मशीद प्रकरण हे चांगलेच तापले होते. अशावेळी मुलायम सिंह यांचे सरकार युपीत होते. येणाऱ्या कार सेवक यांना अटक करण्याचे फर्मान मुख्यमंत्री मुलायम सिंह यांनी दिले होते. 

युपी येथे पोहचल्यानंतर आम्हाला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर उरई येथील जेलमध्ये ठेवण्यात आले. त्यावेळी अनेक कार सेवक आमच्या सोबत होते. दोन तीन दिवस जवळचे असलेले पदार्थ खाऊन दिवस काढले. मात्र मुलायम सरकारने कोणतीही खाण्या पिण्याची व्यवस्था केलेली नव्हती. अखेर एक दिवस जेलच्या भिंतीवरून उडी टाकून बाहेर असलेल्यांना जेवणाबाबत माहिती दिली. त्यानंतर तेथील गावकऱ्यांनी तांदूळ, भाजी, डाळ जेलमध्ये दिले. जेलमध्ये जेवण करून तेरा दिवस काढले. त्यानंतर युपी सरकारने सोडून दिले. मात्र बाबरी येथे जाण्यास बंदी केल्याने आम्हाला माघारी फिरावे लागले. असे किशोर जैन यांनी माहिती दिली.

कार सेवक म्हणून आम्हाला अभिमान आहे. कार सेवकाच्या त्यागामुळे सोमवारी २२ जानेवारी रोजी अयोध्या मध्ये श्री राम मूर्तीची प्राण प्रतिष्ठान करण्यात आली. ५०० वर्षाने श्रीराम हे स्वगृहात विराजमान झाले. याचा आम्हा कार सेवकांना अत्यानंद आहे. अशी प्रतिक्रिया किशोर जैन यांनी दिली आहे.

टॅग्स :Ayodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिर