शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

तरुणांच्या पुढाकारातून वीजपुरवठा झाला सुरळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 01:10 IST

२१ दिवसांनंतर वीजपुरवठा सुरळीत झाल्याने नागरिकांकडून या तरुणांचे कौतुक करण्यात येत आहे.

आगरदांडा : निसर्ग चक्रीवादळामुळे मुरूड तालुक्याला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. त्यामुळे मुरुड तालुक्यात खूप मोठ्या प्रमाणावर विजेच्या खांबांची पडझड होऊन नुकसान झाल्यामुळे शहरात वीजपुरवठा खंडित झाल होता. १९ दिवसांनी काही भाग सोडून वीजप्रवाह सुरू झाला, तोही काही तासांकरिता. यामुळे येथील नागरिक हैराण झाले होते. मात्र, भागेश्वर आळीतील तरुणांनी पुढाकार घेऊन महावितरणच्या परवानगीने विजेच्या खांबावर चढून काम सुरू के ले. यामुळे २१ दिवसांनंतर वीजपुरवठा सुरळीत झाल्याने नागरिकांकडून या तरुणांचे कौतुक करण्यात येत आहे.२१ दिवस झाले, तरी वीज येत नसल्यामुळे नागरिक विजेच्या समस्यांनी हैराण झाले. शेवटी भोगेश्वर तरुण मित्रमंडळाने वीज अधिकारी सचिन येरेकर यांची भेट घेऊन विजेच्या संदर्भात चर्चा केली. त्यावेळी तरुणांनी जर तुमच्याकडे पुरेसे वीज कर्मचारी नसतील, तर आमच्याकडे विजेचे काम करणारी अनुभवी मुले आहेत. आम्ही विजेच्या खांबावर चढून वीजपुरवठा सुरळीत करू, असे सांगितले. जर मान्यता देत असाल, तर फक्त मुख्य वाहिनीच्या विजेचे फ्यूज काढून द्या. पुढील विजेचे काम आम्ही करू, असे सांगण्यात आले. वीज मंडळाच्या अधिकारी सचिन येरेकरनी मान्यता दिली. त्यानुसार, मंगळवारी सकाळी ज्येष्ठ नागरिक विजय गुरव यांच्या शुभ हस्ते विजेच्या कामांचा शुभारंभ श्रीफळ वाढवून करण्यात आला.समीर पाटील व नयन भायदे यांच्या नेतृत्वाखाली विजेच्या कामाला सकाळी १० वाजल्यापासून सुरुवात करण्यात आली. समीर पाटील, आदित्य माळी, महेश साबळे , तेजस भायदे यांनी २१ पोलवराच्या लाइन कट करून अंडरग्राउंड बॉक्सला जॉइंड करण्याचे काम केले. विजेचा प्रवाह अंडरग्राउंड बॉक्समध्ये आल्याने कामाला यश मिळाले. त्यानंतर, प्रत्येक खांबावरून वीजपुरवठा घराघरांत देण्यास सुरुवात केली. २१ दिवसांनी प्रत्येकाच्या घरात वीज आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त के ले.>‘नागरिकांनी मदतके ल्यास लवकर काम’वीज रिपेरिंग करण्याकरिता लागणारा खर्च प्रति वर्गणी काढून करण्यात आला. आज सर्वांनी एकत्र येऊन भोगेश्वर उत्तर विभागातील विद्युत पुरवठा सुरळीत करण्यास हातभार लावला. त्यासाठी समीर पाटील, आदित्य माळी महेश साबळे, तेजस भायदे, नयन भायदे यांचे वीज मंडळाचे अधिकारी सचिन येरेकर यांनीही विशेष आभार मानले.असेच प्रत्येक ओळीतून जर विजेतील अनुभवी तरुण पुढे आले, तर नक्कीच मुरुड तालुक्यातील वीजपुरवठा लवकरच सुरळीत होऊन मुरुड तालुका प्रकाशमय होईल.