शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

८० गावांचा वीजपुरवठा खंडित

By admin | Updated: November 11, 2015 00:20 IST

महाड तालुक्यातील बिरवाडी येथे मंगळवारी नरक चतुर्दशीच्या दिवशीच पहाटे अभ्यंग स्नानाची गडबड सुरू असतानाच चार वाजण्याच्या सुमारास विद्युत पुरवठा खंडित झाला

बिरवाडी : महाड तालुक्यातील बिरवाडी येथे मंगळवारी नरक चतुर्दशीच्या दिवशीच पहाटे अभ्यंग स्नानाची गडबड सुरू असतानाच चार वाजण्याच्या सुमारास विद्युत पुरवठा खंडित झाला. २२ हजार के व्ही व्होल्ट या उच्च दाबाच्या लाइनचे दोन विद्युत पोल खाली पडल्याने बिरवाडीसह ८० गावांचा विद्युत पुरवठा ऐन दिवाळीमध्ये खंडित झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.महाड तालुक्यातील बिरवाडी येथे मंगळवारी (१० नोव्हेंबर) पहाटे २२ हजार के व्ही होल्टचे दोन विद्युत पोल रस्त्यावर वाकल्याने येथील विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. या घटनेनंतर बिरवाडीमधून येणारी एसटी सेवा बंद पडली आहे. दुपारी ३ ते ४ वाजेपर्यंत रस्त्यावरील पोल बाजूला करुन तसेच विद्युत तारा बाजूला केल्यानंतर एसटीची बस सेवा सुरळीत करुन बिरवाडीचा मुख्य रस्ता वाहतुकीकरिता खुला केला होता. मात्र सकाळी रस्ता बंद असल्याने नागरिकांची धांदल उडाली.ऐन दिवाळीत नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून पडलेले विद्युत पोल लवकरात लवकर दुरु स्त करण्यासाठी महावितरण कंपनीचे १२ - १२ कर्मचाऱ्यांच्या दोन तुकड्यांसह एकूण ३० कर्मचारी युध्दपातळीवर काम करीत आहेत. सायंकाळी ६ वाजेपर्यंत बिरवाडीसह ८० गावांचा विद्युत पुरवठा सुरळीत झाला असल्याची माहिती महाड येथील महावितरणाचे उपकार्यकारी अभियंता महेंद्र वाकपैजण यांनी दिली. या घटनेची माहिती बिरवाडीचे मंडळ अधिकारी बी. डी. जाधव यांनी महाडचे तहसीलदार संदीप कदम यांना देताच संदीप कदम यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची माहिती घेतली. बिरवाडी परिसरात जुने विद्युत पोल बदलण्याची मागणी बिरवाडी ग्रामपंचायत तसेच नागरिकांनी लेखी निवेदनाद्वारे वारंवार विद्युत वितरण कंपनीकडे केली आहे. (वार्ताहर)ऐन दिवाळीत अशा प्रकारे विद्युत पुरवठा खंडित झाल्याने सकाळची सर्वच कामे रखडल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच बस सेवा बंद असल्याने नागरिकांची तारांबळ झाली. बिरवाडी परिसरात जुने विद्युत पोल बदलण्याची मागणी बिरवाडी ग्रामपंचायत तसेच नागरिकांनी लेखी निवेदनाद्वारे वारंवार विद्युत वितरण कंपनीकडे केली आहे. मात्र नागरिकांच्या मागणीची योग्य ती दखल घेऊन कारवाई केली नाही, तेव्हा आता तरी या मागणीचा गांभीर्याने विचार करावा अशी नागरिकांची अपेक्षा आहे.