शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

कर्जतमध्ये विजेचे खांब कोसळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 00:08 IST

अनेक गावांच्या नळपाणी योजना बंद : तालुक्यात महावितरणचे काम युद्धपातळीवर सुरू

विजय मांडे ।लोकमत न्यूज नेटवर्ककर्जत : तालुक्यात निसर्ग चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात विजेचे खांब कोसळले असून त्याचवेळी वीज रोहित्रेदेखील कोसळली आहेत. वीज रोहित्रे नादुरुस्त झाल्याने तालुक्यातील अनेक गावांच्या नळपाणी योजना बंद पडल्या आहेत. दरम्यान, महावितरणकडून वादळात कोसळलेले २०० विजेचे खांब बसविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून शुक्रवारी दिवस अखेर ५० खांब उभे करण्यात महावितरणला यश आले आहे. तर तालुक्यातील ग्रामीण भागातील काही भाग वगळता अद्याप येथे अंधार कायम आहे.

कर्जत तालुक्यात मुख्य वीजवाहिनीचे ६८ तर गावागावांत वीजपुरवठा करणारे १४० खांब वादळाने कोसळले आहेत. त्या कोसळलेल्या खांबांमुळे वीजपुरवठा खंडित झाला होता आणि आता युद्धपातळीवर त्या खांबांची दुरुस्ती महावितरणकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, कर्जत आणि माथेरान येथील वीजपुरवठा ४ जूनच्या रात्री सुरू झाला आहे. तर कर्जतसह दहिवली, नेरळ, कडाव, कशेळे येथील वीजपुरवठा सुरू झाला असला तरी त्या त्या वीज उपकेंद्र परिसरातील सर्व गावांची वीज मात्र सुरू झाली नाही. ५ जूनपर्यंत वादळाने कोसळलेल्या एकूण खांबांपैकी जेमतेम ५० खांब उभे करण्यात महावितरणला यश आले आहे. त्याच वेळी ग्रामीण भागात आता विजेचे खांब उभे करण्याचे काम सुरू असून दुर्गम भागातील तुंगी येथेही विजेचे खांब वादळाने जमीनदोस्त झाले आहेत. शिंगढोल येथील विजेचे खांबही कोसळले आहेत. ग्रामीण भागात मागील तीन दिवस वीजपुरवठा खंडित असल्याने त्या त्या गावांतील नळपाणी योजना बंद झाल्या आहेत. त्यामुळे अनेक गावांतील महिलांना पिण्याचे पाणी आणण्यासाठी दूरवर जावे लागले.आदिवासी विभागात नुकसानच्आदिवासी विभागात सर्वाधिक नुकसान वादळाने केले असून तेथील नांदगाव, बळीवरे, रोकडेवाडा, खांडस नळपाणी योजना आणि पाटोळे फार्मजवळ असलेले वीज रोहित्र जमिनीवर कोसळले आहे.च्विजेचे खांब कोसळल्याने तालुक्यातील १४० नळपाणी योजना दोन दिवसांपासून बंद पडल्या आहेत, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली.