शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

कर्जतमध्ये विजेचे खांब कोसळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 00:08 IST

अनेक गावांच्या नळपाणी योजना बंद : तालुक्यात महावितरणचे काम युद्धपातळीवर सुरू

विजय मांडे ।लोकमत न्यूज नेटवर्ककर्जत : तालुक्यात निसर्ग चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात विजेचे खांब कोसळले असून त्याचवेळी वीज रोहित्रेदेखील कोसळली आहेत. वीज रोहित्रे नादुरुस्त झाल्याने तालुक्यातील अनेक गावांच्या नळपाणी योजना बंद पडल्या आहेत. दरम्यान, महावितरणकडून वादळात कोसळलेले २०० विजेचे खांब बसविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून शुक्रवारी दिवस अखेर ५० खांब उभे करण्यात महावितरणला यश आले आहे. तर तालुक्यातील ग्रामीण भागातील काही भाग वगळता अद्याप येथे अंधार कायम आहे.

कर्जत तालुक्यात मुख्य वीजवाहिनीचे ६८ तर गावागावांत वीजपुरवठा करणारे १४० खांब वादळाने कोसळले आहेत. त्या कोसळलेल्या खांबांमुळे वीजपुरवठा खंडित झाला होता आणि आता युद्धपातळीवर त्या खांबांची दुरुस्ती महावितरणकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, कर्जत आणि माथेरान येथील वीजपुरवठा ४ जूनच्या रात्री सुरू झाला आहे. तर कर्जतसह दहिवली, नेरळ, कडाव, कशेळे येथील वीजपुरवठा सुरू झाला असला तरी त्या त्या वीज उपकेंद्र परिसरातील सर्व गावांची वीज मात्र सुरू झाली नाही. ५ जूनपर्यंत वादळाने कोसळलेल्या एकूण खांबांपैकी जेमतेम ५० खांब उभे करण्यात महावितरणला यश आले आहे. त्याच वेळी ग्रामीण भागात आता विजेचे खांब उभे करण्याचे काम सुरू असून दुर्गम भागातील तुंगी येथेही विजेचे खांब वादळाने जमीनदोस्त झाले आहेत. शिंगढोल येथील विजेचे खांबही कोसळले आहेत. ग्रामीण भागात मागील तीन दिवस वीजपुरवठा खंडित असल्याने त्या त्या गावांतील नळपाणी योजना बंद झाल्या आहेत. त्यामुळे अनेक गावांतील महिलांना पिण्याचे पाणी आणण्यासाठी दूरवर जावे लागले.आदिवासी विभागात नुकसानच्आदिवासी विभागात सर्वाधिक नुकसान वादळाने केले असून तेथील नांदगाव, बळीवरे, रोकडेवाडा, खांडस नळपाणी योजना आणि पाटोळे फार्मजवळ असलेले वीज रोहित्र जमिनीवर कोसळले आहे.च्विजेचे खांब कोसळल्याने तालुक्यातील १४० नळपाणी योजना दोन दिवसांपासून बंद पडल्या आहेत, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली.