शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसचे १५ खासदार विकले गेले, मुख्यमंत्री रेड्डींच्या आदेशामुळे भाजपच्या उमेदवाराला केले मतदान"; कोणत्या आमदाराने केला गौप्यस्फोट?
2
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
3
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
4
नक्षलवादी संघटनांकडून केंद्र सरकारला शांततेचा प्रस्ताव; १ महिना सशस्त्र संघर्ष विरामाची मागणी
5
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
6
केवळ संशयामुळे लाेकांची झडती घेता येणार नाही, अपवादात्मक परिस्थितीत लेखी कारणे बंधनकारक : कोर्ट
7
सोशल मीडियावर ‘फोटो एडिट’ ॲपची धूम; सुरक्षित ठेवा तुमचे फोटो, फसवणूक वाढली
8
मुलाच्या वाढदिवसादिवशी पोहोचलं वडिलांचं शेवटचं गिफ्ट, कुटुंबीयांना झाले अश्रू अनावर
9
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार!
10
"इथं काम करणं आता कठीण..."; रस्त्यांवरील खड्डे अन् वाहतूक कोंडीमुळे बंगळुरूतील कंपनी शिफ्ट होणार
11
Crime: "माझ्या बहिणीपासून दूर राहा", वारंवार समजावूनही मित्र ऐकत नव्हता; मग...
12
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
13
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
14
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
15
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
16
परशुराम महामंडळाच्या अध्यक्षांना दिला मंत्रिदर्जा; अजित पवार गटाचे आशिष दामले आहेत अध्यक्ष
17
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
18
उत्तर बार्शी भागातून वाहणाऱ्या चांदनी नदीला महापूर, नरसिंह मंदिर पाण्याखाली!
19
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
20
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर

अवकाळी पावसाचा रानमेव्यावर घाळा; खेड्यातील शेतकरी झाला हताश

By निखिल म्हात्रे | Updated: June 10, 2024 19:40 IST

जिल्ह्यातील अनेक डोंगर भगत आदिवासी वाडया आहेत. यातील अनेक आदिवासी बांधवाना खास आसे उपजिवीकेचे साधन नाही

अलिबाग - सध्याच्या हवामान बदलाचा विपरीत परिणाम यंदाच्या वर्षी रानमेव्यावर झाला आहे. या वर्षी अवकाळी पाऊस झाल्याने पिक कमी आले. याचा दुष्परिणाम जांभूळ, करवंद, राजण, अटूर्ण-पिटूर्णसह काजु या रानमेव्यावर झाला आहे. या वर्षी पिक कमी आले असल्याने खेडयातील शेतकरी व वाडयांतील आदिवासी हाताश झाले आहे.  

जिल्ह्यातील अनेक डोंगर भगत आदिवासी वाडया आहेत. यातील अनेक आदिवासी बांधवाना खास आसे उपजिवीकेचे साधन नाही. या आदिवासी वाडयांतील बांधवांना आणि खेडयातील काही शेतकऱ्यांना ऊन्हाळयात जाम, जांभळ, करवंद, आंबे, काजु आदि जंगलातील रानमेवा विकुन घर खर्चाला दर वर्षी चांगला आधार होत आहे. मात्र या वर्षी पिक कमी आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह आदिवासी काळजीत पडले आहे. 

मागील वर्षी पाऊस चांगला झाला. त्यानंतर थंडीही चांगली पडली. फळ झाडांना मोहर येत असताना ढगाळलेले हवामान, पडणारे धुके, आणि आवकाळी पाऊस या खराब हवामानाचा झाडांना मोहोर येताना परिणाम झाला आहे. दरम्यान या वर्षी रानमेव्याचे पिक कमी आले आहे. तसेच जिल्हाभरातील बाजार पेठेत जांभळ, काजु विक्रीसाठी येऊ लागले आहे. जांभळाला किलोला सुमारे शंभराहून अधिक रूपये भाव मिळत असल्याचे सांगण्यात आले. 

खेडयातील शेतकरी व वाडयांतील आदिवासी हाताश झाले आहे. त्यामुळे बाजार पेठेत कमी प्रमाणात जांभळे, काजु हा रानमेवा विक्रीसाठी येऊ लागला आहे. थोडया दिवसात जांभळांची आवक वाढेल असे सांगण्यात आले. फेब्रुवारी ते मे या चार महिन्यांत जंगलातील विविध फळेही बाजारात येत असतात. हा व्यवसाय रायगड जिल्ह्यातील आदिवासी महिला करीत असतात. या वर्षीही रानमेवा काजूगर, रांजणे, करवंदे, जांभळे, काजू बाजारात दाखल झाले आहेत. ओले काजूगर सातशे रुपये किलो तर काजूचा वाटा शंभर रुपये असा विकला जात आहे.