शहरं
Join us  
Trending Stories
1
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
4
पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिक ठार; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
5
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
6
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
7
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
8
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
9
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
10
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
11
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
12
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
13
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
14
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
15
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
16
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
17
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
18
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
19
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
20
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं

महिनाभरापूर्वी वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेल्या ४७ कोटी खर्चाच्या उड्डाणपुलावर महिन्याभरातच खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2023 19:05 IST

या पुलाच्या कामाच्या दर्जा बाबत नागरिकांकडून शंका उपस्थित करण्यात येत आहेत. 

मधुकर ठाकूर 

उरण : मागील महिन्यातच मोठा गाजावाजा करत सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते उदघाटन झालेल्या आणि वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेल्या ४७ कोटी खर्चाच्या चिर्ले-दास्तान उड्डाण पुलावर महिन्याभरातच खड्डे पडायला सुरुवात झाली आहे. यामुळे या पुलाच्या कामाच्या दर्जा बाबत नागरिकांकडून शंका उपस्थित करण्यात येत आहेत. 

दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी वाहतूक कोंडीतून सुटका  करणारा उरण पुर्व विभागातील नागरिकांसाठी हा उड्डाणपुल वाहतुकीसाठी महत्वाचा आहे. मुंबई, ठाणे, नवीमुंबई, पनवेल आणि उरणला जाण्यासाठी हा मार्ग पुर्व भागातील नागरिकांना सोयीचा आहे.त्याशिवाय २० मिनिटांच्या अंतराने  जेएनपीए बंदरातुन धावणाऱ्या मालगाड्यांमुळे रेल्वे फाटक बंद करण्यात येत होते.त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होत होता.या वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी चिर्ले ते दास्तान पर्यंत दिड किमी लांबीचा उड्डाण पुल उभारण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठाणे खाडी पुल विभागातर्फे हे काम करण्यात आले आहे.हा उड्डाणपूल उभारण्यावर सुमारे ४७ कोटी रूपये खर्च करण्यात आले आहेत.

नुकतेच राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते या पुलाचे उदघाटन करण्यात आले होते. याप्रसंगी उपस्थित असलेल्या  बांधकाम मंत्र्यासह खासदार श्रीरंग बारणे, आमदार प्रशांत ठाकूर आणि स्थानिक आमदार महेश बालदी यांनी यावेळी ठेकेदाराच्या कामाबाबत चांगलीच स्तुती सुमने उधळण्यात आली होती. मात्र महिनाभरातच या पुलाला खड्डे पडू लागल्यामुळे कामाच्या दर्जा बद्दल शंका व्यक्त केली जात आहे. अगोदरच या पुलाच्या रस्त्याची कुठेही लेव्हल नाही. त्यामुळे या पुलावर  खड्डे पडले आहेत. तसेच याआधी गर्डर उचलून बसवतानाही कोसळला होता. या उड्डाणपूलाच्या देखभाल, दुरूस्तीचा कालावधी १० वर्षाचा असल्याने जर पुलाच्या कामाला काही झाले तर ठेकेदाराकडून तो दुरूस्त करून घेण्यात येईल. त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही अशी प्रतिक्रिया संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. 

टॅग्स :Raigadरायगडuran-acउरण