शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
3
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
4
SIP देईल छप्परफाड रिटर्न की RD नं बनाल कोट्यधीश? तुमच्या पैशांचा खरा 'बाहुबली' कोण, जाणून घ्या
5
सोनम रघुवंशीने केलेला 'तो' हट्ट ऐकला नसता, तर कदाचित राजा रघुवंशीचा जीव वाचला असता...
6
तुमच्या स्वप्नातील गाडी महागणार? चीनच्या 'या' निर्णयामुळे ऑटो मार्केटमध्ये खळबळ!
7
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
8
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
9
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
10
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
11
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
12
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
13
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
14
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
15
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
16
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
17
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
18
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
19
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
20
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत

महिनाभरापूर्वी वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेल्या ४७ कोटी खर्चाच्या उड्डाणपुलावर महिन्याभरातच खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2023 19:05 IST

या पुलाच्या कामाच्या दर्जा बाबत नागरिकांकडून शंका उपस्थित करण्यात येत आहेत. 

मधुकर ठाकूर 

उरण : मागील महिन्यातच मोठा गाजावाजा करत सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते उदघाटन झालेल्या आणि वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेल्या ४७ कोटी खर्चाच्या चिर्ले-दास्तान उड्डाण पुलावर महिन्याभरातच खड्डे पडायला सुरुवात झाली आहे. यामुळे या पुलाच्या कामाच्या दर्जा बाबत नागरिकांकडून शंका उपस्थित करण्यात येत आहेत. 

दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी वाहतूक कोंडीतून सुटका  करणारा उरण पुर्व विभागातील नागरिकांसाठी हा उड्डाणपुल वाहतुकीसाठी महत्वाचा आहे. मुंबई, ठाणे, नवीमुंबई, पनवेल आणि उरणला जाण्यासाठी हा मार्ग पुर्व भागातील नागरिकांना सोयीचा आहे.त्याशिवाय २० मिनिटांच्या अंतराने  जेएनपीए बंदरातुन धावणाऱ्या मालगाड्यांमुळे रेल्वे फाटक बंद करण्यात येत होते.त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होत होता.या वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी चिर्ले ते दास्तान पर्यंत दिड किमी लांबीचा उड्डाण पुल उभारण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठाणे खाडी पुल विभागातर्फे हे काम करण्यात आले आहे.हा उड्डाणपूल उभारण्यावर सुमारे ४७ कोटी रूपये खर्च करण्यात आले आहेत.

नुकतेच राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते या पुलाचे उदघाटन करण्यात आले होते. याप्रसंगी उपस्थित असलेल्या  बांधकाम मंत्र्यासह खासदार श्रीरंग बारणे, आमदार प्रशांत ठाकूर आणि स्थानिक आमदार महेश बालदी यांनी यावेळी ठेकेदाराच्या कामाबाबत चांगलीच स्तुती सुमने उधळण्यात आली होती. मात्र महिनाभरातच या पुलाला खड्डे पडू लागल्यामुळे कामाच्या दर्जा बद्दल शंका व्यक्त केली जात आहे. अगोदरच या पुलाच्या रस्त्याची कुठेही लेव्हल नाही. त्यामुळे या पुलावर  खड्डे पडले आहेत. तसेच याआधी गर्डर उचलून बसवतानाही कोसळला होता. या उड्डाणपूलाच्या देखभाल, दुरूस्तीचा कालावधी १० वर्षाचा असल्याने जर पुलाच्या कामाला काही झाले तर ठेकेदाराकडून तो दुरूस्त करून घेण्यात येईल. त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही अशी प्रतिक्रिया संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. 

टॅग्स :Raigadरायगडuran-acउरण