शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

कशेडी घाटात महामार्गावर खड्डे; अपघातांचा धोका वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 01:05 IST

वाहतुकीचा वेग मंदावला; वाहनचालकांची कसरत

पोलादपूर : मुंबई- गोवा महामार्गाचे काम वेगाने चालू असले, तरी महामार्गावर जागोजागी खड्डे पडल्याने अपघातांची शक्यता वाढली आहे. खड्ड्यांमधून खडी वर येऊन सर्वत्र पसरली आहे. त्यातच पावसामुळे खड्ड्यांत पाणी साचल्याने अनेक गाड्या खड्ड्यांत आदळत असून, वाहनचालकांसह प्रवाशांनाही गचके सहन करावे लागत आहे.मुंबई-गोवा महामार्गावर चौपदरीकरणाच्या कामामुळे धामणदेवी गावातील महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून, पावसाच्या पाण्याने खड्डे भरल्याने एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या खड्ड्यांमुळे महामार्गावरील वाहतुकीचा वेग मंदावला असून, वाहतूक संथ गतीने होताना दिसून येत आहे.घाट माथ्यावर पावसाचे प्रमाण जास्त असल्याने वाहनाचा वेगही मंदावत आहे. त्यातच रस्त्यांवर ठिकठिकाणी काम सुरू असल्याने, वाहतुकीला ब्रेक लागत आहे, तसेच दरवर्षीप्रमाणे अनेकदा अनेक मालवाहतूक करणारी मोठी वाहने दरीलगत किंवा महामार्गालगत स्लिप होत पलटी होत असतात. नुकताच कशेडी घाट परिसरात चिपळूणकडे जाणारा कंटेनर स्लिप झाल्याने अपघात झाला होता.महामार्गाच्या कामामुळे माती, डांबर, दगडांची वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू असून, अनेकदा खड्ड्यांत वाहने आदळून खड्ड्यांतील खडी इतर ठिकाणी पसरत असल्याने, भविष्यात दुचाकीस्वार स्लिप होऊन अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.महामार्ग विभागाने लावले बॉरिके ट्सच्कशेडी घाटातील भोगाव हद्दीत सुमारे ९० ते १०० फूट खचलेल्या रस्त्याची दुरुस्ती उन्हाळ्यात एप्रिल महिन्यात दरम्यान पूर्ण झाली. मात्र, काही ठिकाणी काम झालेले नाही. या ठिकाणी अपघातांचा धोका लक्षात घेऊन महामार्ग विभागाकडून लोखंडी बॅरिकेट्स लावून ठेवले आहेत.च्पावसाळ्यात येथे पडलेल्या या खड्ड्यांमध्ये पाणी साचून ते इतर वाहनांमुळे दुचाकीस्वारांच्या अंगावर उडून दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.