शहरं
Join us  
Trending Stories
1
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
2
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
3
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
4
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
5
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
6
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
7
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
8
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
9
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
10
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
11
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
12
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
13
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
14
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
15
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
16
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
17
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
18
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
19
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
20
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!

खड्ड्यांचा फटका सरकारी कामकाजाला

By admin | Updated: August 13, 2015 23:28 IST

पळस्पे (पनवेल) ते कशेडी (पोलादपूर) दरम्यानच्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांची समस्या दूर करण्यात शासनाला अद्याप यश आलेले नाही

अलिबाग : पळस्पे (पनवेल) ते कशेडी (पोलादपूर) दरम्यानच्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांची समस्या दूर करण्यात शासनाला अद्याप यश आलेले नाही. महामार्ग आणि जिल्ह्यातील राज्यमार्ग व अन्य मार्गावरील खड्डे हे केवळ पावसामुळे पडलेले नाहीत तर शासनाच्या निष्क्रिय कारभाराचे ते खड्डे असल्याची संतप्त भावना प्रवासी व्यक्त करत आहे. शासकीय निष्क्रियतेच्या या खड्ड्यांचा परिणाम आता जिल्ह्यातील प्रशासकीय सेवांवर होत आहे. रायगड जिल्ह्यात शासनाच्या विविध कार्यालयांत कार्यरत तब्बल २५ हजार ९४६ कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून जनसामान्यांना प्रशासकीय सेवा देण्यात येते. यामध्ये येथील रायगड जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्ह्यातील आठ उपविभागीय महसूल अधिकारी कार्यालये आणि १५ तहसीलदार कार्यालयांमध्ये एकूण ३ हजार ७०० राज्य शासनाचे कर्मचारी कार्यरत आहेत. या व्यतिरिक्त केंद्र शासनाचे १ हजार ७०० कर्मचारी जिल्ह्यात कार्यरत आहेत. रायगड जिल्हा परिषदेच्या जिल्ह्यातील १५ पंचायत समिती कार्यालये व संलग्न सेवांमध्ये जिल्हा परिषदेचे कर्मचारी व तृतीय श्रेणी कर्मचारी असे एकूण २० हजार ५४६ कर्मचारी कार्यरत आहेत. या एकूण कर्मचाऱ्यांपैकी ६० टक्क्यांच्यावर कर्मचारी दररोज एसटी बसने प्रवास करून कामावर येतात.सध्याच्या रस्त्यांच्या खड्डे व गंभीर दुरवस्थेमुळे आणि त्यामुळे दररोज हमखास होत असलेली वाहतूक कोंडी यामुळे एसटी प्रवासास दररोज नियोजित कालावधीपेक्षा किमान दीड तास तर कमाल दोन ते अडीच तासांचा विलंब होत आहे. कर्मचारी नियोजित वेळेपेक्षा तास दीड तास उशिरा आपापल्या कार्यालयात पोहोचतात तर संध्याकाळी घरी देखील तितक्याच विलंबाने पोहोचत असल्याने सरकारी कार्यालयांतील कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर विपरित परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. त्यातच आता सर्व शासकीय कार्यालयांमध्ये ‘बायोमेट्रिक अटेंडन्स मशिन्स’ लावण्यात आल्याने त्यावर ‘लेट मार्क’ पंच होतो. महिन्यात तीन वेळा ‘लेटमार्क’ पंच झाल्यास एक रजा कापण्याचा शासनाचा नियम असल्याने, हा भुर्दंड कर्मचाऱ्यांना सहन करावा लागत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण असल्याचे काही सरकारी कर्मचाऱ्यांनी सांगितले. पोलादपूर : मुंबई-गोवा महामार्गावरील प्रवास दिवसेंदिवस जीवघेणा ठरत आहे. पनवेलपासून पोलादपूरपर्यंतच्या तीन तासांच्या प्रवासाला सहा ते सात तास लागत असून रस्त्यावर पडलेले खड्डे चुकविताना वाहनचालकाला मोठी कसरत करावी लागत आहे. सकाळी घरून निघालेली व्यक्ती वेळेत पोहोचणे सोडाच पण सुखरूप पोहचेल का? हाच प्रश्न घरच्या कुटुंबाला पडतो.बुधवारी पनवेल ते वडखळपर्यंत ट्रॅफिक जाम झाल्याने येणाऱ्या एसटी बस पोलादपूर स्थानकात उशिरा पोहचत होत्या. पनवेल ते इंदापूर बसस्थानकात खड्डे असल्याने एसटीने प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना धक्के सहन करत प्रवास करावा लागत आहे, अशी प्रतिक्रिया एसटी वाहनचालक पोसे यांनी दिली. एक खड्डा चुकविताना दुसरा खड्डा समोर के व्हा येतो हे समजत नाही. त्यामुळे गाड्यांना अपघात होण्याची शक्यता असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली. गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजविले गेले नाही तर या रस्त्याने वाहन चालविणे कठीण होईल, अशी भीती खाजगी वाहनचालकांनी व्यक्त केली. तर एसटीने प्रवास करणाऱ्या मोरे नामक व्यक्तीने बसमधून प्रवास करताना आपण होडीतून तर चाललो नाही ना? असा प्रश्न पडतो, अशी प्रतिक्रिया दिली. यामुळे गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजवावे, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. (विशेष प्रतिनिधी)