शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

खड्ड्यांचा फटका सरकारी कामकाजाला

By admin | Updated: August 13, 2015 23:28 IST

पळस्पे (पनवेल) ते कशेडी (पोलादपूर) दरम्यानच्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांची समस्या दूर करण्यात शासनाला अद्याप यश आलेले नाही

अलिबाग : पळस्पे (पनवेल) ते कशेडी (पोलादपूर) दरम्यानच्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांची समस्या दूर करण्यात शासनाला अद्याप यश आलेले नाही. महामार्ग आणि जिल्ह्यातील राज्यमार्ग व अन्य मार्गावरील खड्डे हे केवळ पावसामुळे पडलेले नाहीत तर शासनाच्या निष्क्रिय कारभाराचे ते खड्डे असल्याची संतप्त भावना प्रवासी व्यक्त करत आहे. शासकीय निष्क्रियतेच्या या खड्ड्यांचा परिणाम आता जिल्ह्यातील प्रशासकीय सेवांवर होत आहे. रायगड जिल्ह्यात शासनाच्या विविध कार्यालयांत कार्यरत तब्बल २५ हजार ९४६ कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून जनसामान्यांना प्रशासकीय सेवा देण्यात येते. यामध्ये येथील रायगड जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्ह्यातील आठ उपविभागीय महसूल अधिकारी कार्यालये आणि १५ तहसीलदार कार्यालयांमध्ये एकूण ३ हजार ७०० राज्य शासनाचे कर्मचारी कार्यरत आहेत. या व्यतिरिक्त केंद्र शासनाचे १ हजार ७०० कर्मचारी जिल्ह्यात कार्यरत आहेत. रायगड जिल्हा परिषदेच्या जिल्ह्यातील १५ पंचायत समिती कार्यालये व संलग्न सेवांमध्ये जिल्हा परिषदेचे कर्मचारी व तृतीय श्रेणी कर्मचारी असे एकूण २० हजार ५४६ कर्मचारी कार्यरत आहेत. या एकूण कर्मचाऱ्यांपैकी ६० टक्क्यांच्यावर कर्मचारी दररोज एसटी बसने प्रवास करून कामावर येतात.सध्याच्या रस्त्यांच्या खड्डे व गंभीर दुरवस्थेमुळे आणि त्यामुळे दररोज हमखास होत असलेली वाहतूक कोंडी यामुळे एसटी प्रवासास दररोज नियोजित कालावधीपेक्षा किमान दीड तास तर कमाल दोन ते अडीच तासांचा विलंब होत आहे. कर्मचारी नियोजित वेळेपेक्षा तास दीड तास उशिरा आपापल्या कार्यालयात पोहोचतात तर संध्याकाळी घरी देखील तितक्याच विलंबाने पोहोचत असल्याने सरकारी कार्यालयांतील कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर विपरित परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. त्यातच आता सर्व शासकीय कार्यालयांमध्ये ‘बायोमेट्रिक अटेंडन्स मशिन्स’ लावण्यात आल्याने त्यावर ‘लेट मार्क’ पंच होतो. महिन्यात तीन वेळा ‘लेटमार्क’ पंच झाल्यास एक रजा कापण्याचा शासनाचा नियम असल्याने, हा भुर्दंड कर्मचाऱ्यांना सहन करावा लागत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण असल्याचे काही सरकारी कर्मचाऱ्यांनी सांगितले. पोलादपूर : मुंबई-गोवा महामार्गावरील प्रवास दिवसेंदिवस जीवघेणा ठरत आहे. पनवेलपासून पोलादपूरपर्यंतच्या तीन तासांच्या प्रवासाला सहा ते सात तास लागत असून रस्त्यावर पडलेले खड्डे चुकविताना वाहनचालकाला मोठी कसरत करावी लागत आहे. सकाळी घरून निघालेली व्यक्ती वेळेत पोहोचणे सोडाच पण सुखरूप पोहचेल का? हाच प्रश्न घरच्या कुटुंबाला पडतो.बुधवारी पनवेल ते वडखळपर्यंत ट्रॅफिक जाम झाल्याने येणाऱ्या एसटी बस पोलादपूर स्थानकात उशिरा पोहचत होत्या. पनवेल ते इंदापूर बसस्थानकात खड्डे असल्याने एसटीने प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना धक्के सहन करत प्रवास करावा लागत आहे, अशी प्रतिक्रिया एसटी वाहनचालक पोसे यांनी दिली. एक खड्डा चुकविताना दुसरा खड्डा समोर के व्हा येतो हे समजत नाही. त्यामुळे गाड्यांना अपघात होण्याची शक्यता असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली. गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजविले गेले नाही तर या रस्त्याने वाहन चालविणे कठीण होईल, अशी भीती खाजगी वाहनचालकांनी व्यक्त केली. तर एसटीने प्रवास करणाऱ्या मोरे नामक व्यक्तीने बसमधून प्रवास करताना आपण होडीतून तर चाललो नाही ना? असा प्रश्न पडतो, अशी प्रतिक्रिया दिली. यामुळे गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजवावे, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. (विशेष प्रतिनिधी)