शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
3
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
6
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...
7
छोटा दत्तू आला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज
8
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
9
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
10
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
11
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
12
‘जर्मन हँगर’ मंडपात राज्य मंत्रिमंडळाची बैठक
13
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
14
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
15
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
16
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
17
नीट यूजी परीक्षेत ‘फिजिक्स’चा पेपर अवघड; यंदा कट ऑफ घसरणार
18
जे. जे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाबाबत आणखी ‘तारीख पे तारीख’ नको ! 
19
एक्स्प्रेस वे, सर्व्हिस रोडच्या खड्ड्यांसाठी ७८ कोटी ! डागडुजीसाठीचा एकूण खर्च १५७ कोटींच्या घरात
20
एटीएम कार्ड वापरणे झाले महाग, कारण...

महामार्गावरील रस्त्याचा भाग खचण्याची शक्यता

By admin | Updated: July 17, 2017 01:23 IST

महाड तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गावरील नडगाव ग्रामपंचायत हद्दीतील १२७ ते १२८ कि.मी.मधील रस्त्याचा भाग खचून दुर्घटना

लोकमत न्यूज नेटवर्कबिरवाडी : महाड तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गावरील नडगाव ग्रामपंचायत हद्दीतील १२७ ते १२८ कि.मी.मधील रस्त्याचा भाग खचून दुर्घटना घडण्याची भीती निर्माण झाली आहे. याबाबतचे निवेदन महाडचे आ. भरत गोगावले यांनी महाड प्रांताधिकाऱ्यांना दिले असून उपाययोजनेची मागणी के ली आहे.नडगाव ग्रामपंचायतीमधून जाणाऱ्या या रस्त्याला सावित्री नदी पात्र लागून असून या रस्त्याकडील भागाला मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या आहेत, तसेच या रस्त्याच्या कडेला असणाऱ्या डोंगरावरून येणारे पाणी जाण्यासाठी गटार नसल्याने ते पाणी रस्त्यावर साचून जमिनीत मुरत असल्याने या ठिकाणी रस्ता खचला आहे. तसेच पावसाळ्यात अतिवृष्टीच्या काळात सावित्री नदीला पूर आल्यास हा रस्ता खचून पूर्णपणे नदीच्या पात्रात वाहून जावून सावित्री पूल दुर्घटनेसारखी घटना घडू शकते. याबाबत राष्ट्रीय महामार्ग खात्याचे महाड येथील उपविभागीय अभियंता प्रकाश गायकवाड यांच्या निदर्शनास ही बाब आणून देखील उपाययोजना केलेली नाही. पुढील काळात मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाल्यास सावित्री पूल दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ शकते तरी खबरदारीचा उपाय म्हणून त्या ठिकाणच्या जागेची पाहणी करून उपाययोजना करावी, असे निवेदनात नमूद केले आहे.