शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

पावसाअभावी भातशेती करपण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 03:50 IST

गेल्या १० दिवसांपासून पावसाने पाठ फिरवल्यामुळे जिल्ह्यातील भात शेती धोक्यात आली आहे. शेतात पाणी नसल्याने जमिनींना भेगा पडल्या आहेत. पावसाच्या सरी मध्येच बरसत असल्या तरी शेतीसाठी त्या पूरक नाहीत.

अलिबाग : गेल्या १० दिवसांपासून पावसाने पाठ फिरवल्यामुळे जिल्ह्यातील भात शेती धोक्यात आली आहे. शेतात पाणी नसल्याने जमिनींना भेगा पडल्या आहेत. पावसाच्या सरी मध्येच बरसत असल्या तरी शेतीसाठी त्या पूरक नाहीत. अशीच परिस्थिती राहिल्यास भात पीक करपून आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागणार असल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. परंतु सध्याचा पाऊस हा समाधानकारक असल्याचा दावा कृषी विभागाने केला आहे.जिल्ह्यामध्ये जून महिन्यामध्येच पावसाने जोरदार बरसून आपले मनसुबे स्पष्ट केले होते. हवामान विभागानेही वेळोवेळी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार पाऊस समाधानकारक पडत होता. अख्खा जून महिना तसेच जुलै महिन्यामध्ये पावसाने चांगलाच जोर धरला. त्यामुळे शेतीच्या कामांनीही जोर पकडला होता. जिल्ह्यामध्ये भाताचे प्रमुख पीक घेतले जाते. त्यानुसार सर्वत्र मोठ्या संख्येने भाताची लावणी पूर्ण झाली आहे.भाताच्या पिकाने तग धरायला सुरुवात केली असतानाच आता पावसाने पाठ फिरवली आहे. गेले १० दिवस पाऊस लहरी असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यातच अधे-मधे कडक उन्हाच्या झळा बसत असल्याने अलिबाग तालुक्यातील काही ठिकाणच्या शेतातील जमिनीलाभेगा पडण्यास सुरुवात झालीआहे.भात पिकाला पुरेसे पाणी उपलब्ध झाले नाही तर भाताचे पीक करपण्याची शक्यता असल्याचे खंडाळे येथील शेतकरी नंदू सोडवे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. पावसाची उघडीप कायम राहिल्यास ते शेतीला नक्कीच परवडणारे नसल्याने शेतकऱ्यांना फार मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. शेतकरी भातासोबतच बांधावर शेती करताना विविध भाजीपाला, मिरची, टोमॅटो यांचेही पीक घेतात. या पिकांनाही पाण्याची आवश्यकता असल्याने छोटे उत्पन्नही संकटात सापडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.स्थानिक बाजारात रोजचीरोज ताजी भाजी उपलब्ध होत असते, परंतु पावसाची नाराजी अशीच राहिल्यास स्थानिक बाजारांमध्ये स्थानिक पातळीवरचा भाजीपाला मिळणे कठीण होणार आहे. छोट्या प्रमाणात अशी भाजी विकणारेही आर्थिक संकटात सापडणार असल्याचे बोलले जाते.पावसाच्या आकेडवारीवर नजर टाकल्यास जून महिन्यात ९११.२५ मिमी सरासरी (१४१.६७ टक्के) पाऊस पडला होता. जुलै महिन्यातील पावसाच्या कामगिरीकडे पाहिल्यास १३२८.३४ मिमी सरासरी (११४.५८ टक्के) पाऊस झाला आहे, तर आॅगस्ट महिन्यात फक्त ३६.०७ मिमी सरासरी (०४.०८ टक्के) पाऊस झाला आहे. अजून पावसाचा हंगाम शिल्लक असला तरी, भात पिकाला वेळेवर मुबलक पाणी मिळाले नाही तर पीक संकटात येऊ शकते. त्यामुळे पावसाने बरसून बळीराजापुढील संकट दूर करावे अशी आर्त विनवणी करण्यात येत आहे.रायगड जिल्ह्यात पाऊस कमी झाला आहे, परंतु तो अधूनमधून बरसत असल्याने शेतामध्ये सध्या पुरेसे पाणी आहे. त्यामुळे शेतकºयांनी चिंता करण्याचे कारण नाही.-पांडुरंग शेळके, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

टॅग्स :Raigadरायगड