शहरं
Join us  
Trending Stories
1
झाले उलटेच...! मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, जेएलआर आणि ऑडी कार स्वस्त होणार; धनाढ्यांनाही GST पावला
2
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले
3
मुंबई, उपनगरामध्ये मध्ये ईद ए मिलादच्या सुट्टीत बदल, राज्य सरकारने काढले आदेश
4
“छगन भुजबळांच्या मनातील शंका आम्ही दूर करू, ओबीसींवर अन्याय होणार नाही”: CM फडणवीस
5
Income Tax रिटर्न फाईल करण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर; तारीख चुकवल्यास काय होईल? जाणून घ्या
6
Video: बंगाल विधानसभेत जोरदार राडा; BJP-TMC आमदारांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी, कारण...
7
"...मग बाकीच्या मराठ्यांचं काय? त्यांचा विचार कोण करणार?", विनोद पाटलांनी दाखवले आकडे
8
धक्कादायक! न्यायाधीशांनाच दिली जीवे मारण्याची धमकी, म्हणाला, जिवंत राहायचे असेल तर ५०० कोटी घेऊन जंगलात या
9
Video: अवैध कामावर कारवाई करणाऱ्या महिला पोलीस अधिकाऱ्यालाच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी खडसावलं
10
GST कपातीमुळे तुमचा खर्च किती वाचणार? घरखर्च, विमा आणि गाड्यांच्या दरांवरचा 'हा' मोठा फरक समजून घ्या!
11
Viral Video: ५ किलो बटाटे अन् ५ किलो समोसे... कोणती पिशवी जड? मुलीने दिलं भन्नाट उत्तर
12
बिहारमध्ये एनडीएतील मित्रांनी वाढवलं भाजपा-जेडीयूचं टेन्शन, केली एवढ्या जागांची मागणी 
13
Ruturaj Gaikwad Century: बंगळुरुच्या मैदानात पुणेकराची हवा; सेंच्युरीसह ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा
14
उंदीर चावले, दोन नवजात बाळांचा मृत्यू; मध्य प्रदेशातील शासकीय रुग्णालयातील घटना
15
पाकिस्तानी क्रिकेटरसोबत होत रेखाचं अफेअर, लग्नासाठी आईने ज्योतिषाला दाखवलेली कुंडली पण...
16
२० हजार किमी रेंज, संपूर्ण जग टप्प्यात, पृथ्वीबाहेरही हल्ला करण्यास सक्षम, चीननं बनवलं घातक हत्यार
17
Amit Mishra Retirement : लेट निवृत्तीसह IPL हॅटट्रिक किंगनं क्रिकेटच्या देवालाही टाकलं मागे
18
“महाराष्ट्र विकासाच्या महामार्गावर, देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठे योगदान”: DCM एकनाथ शिंदे
19
जगभ्रमंतीवर निघालेल्या योगेश आळेकरी यांची दुचाकी चोरीला, UK मधील नॉटिंगहॅम शहरातील घटना
20
"राजवटींचा काळ संपला; तुम्ही भारत, चीनसोबत असं बोलू शकत नाही"; पुतीन यांनी ट्रम्प यांना सुनावलं

पावसाअभावी भातशेती करपण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 03:50 IST

गेल्या १० दिवसांपासून पावसाने पाठ फिरवल्यामुळे जिल्ह्यातील भात शेती धोक्यात आली आहे. शेतात पाणी नसल्याने जमिनींना भेगा पडल्या आहेत. पावसाच्या सरी मध्येच बरसत असल्या तरी शेतीसाठी त्या पूरक नाहीत.

अलिबाग : गेल्या १० दिवसांपासून पावसाने पाठ फिरवल्यामुळे जिल्ह्यातील भात शेती धोक्यात आली आहे. शेतात पाणी नसल्याने जमिनींना भेगा पडल्या आहेत. पावसाच्या सरी मध्येच बरसत असल्या तरी शेतीसाठी त्या पूरक नाहीत. अशीच परिस्थिती राहिल्यास भात पीक करपून आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागणार असल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. परंतु सध्याचा पाऊस हा समाधानकारक असल्याचा दावा कृषी विभागाने केला आहे.जिल्ह्यामध्ये जून महिन्यामध्येच पावसाने जोरदार बरसून आपले मनसुबे स्पष्ट केले होते. हवामान विभागानेही वेळोवेळी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार पाऊस समाधानकारक पडत होता. अख्खा जून महिना तसेच जुलै महिन्यामध्ये पावसाने चांगलाच जोर धरला. त्यामुळे शेतीच्या कामांनीही जोर पकडला होता. जिल्ह्यामध्ये भाताचे प्रमुख पीक घेतले जाते. त्यानुसार सर्वत्र मोठ्या संख्येने भाताची लावणी पूर्ण झाली आहे.भाताच्या पिकाने तग धरायला सुरुवात केली असतानाच आता पावसाने पाठ फिरवली आहे. गेले १० दिवस पाऊस लहरी असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यातच अधे-मधे कडक उन्हाच्या झळा बसत असल्याने अलिबाग तालुक्यातील काही ठिकाणच्या शेतातील जमिनीलाभेगा पडण्यास सुरुवात झालीआहे.भात पिकाला पुरेसे पाणी उपलब्ध झाले नाही तर भाताचे पीक करपण्याची शक्यता असल्याचे खंडाळे येथील शेतकरी नंदू सोडवे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. पावसाची उघडीप कायम राहिल्यास ते शेतीला नक्कीच परवडणारे नसल्याने शेतकऱ्यांना फार मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. शेतकरी भातासोबतच बांधावर शेती करताना विविध भाजीपाला, मिरची, टोमॅटो यांचेही पीक घेतात. या पिकांनाही पाण्याची आवश्यकता असल्याने छोटे उत्पन्नही संकटात सापडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.स्थानिक बाजारात रोजचीरोज ताजी भाजी उपलब्ध होत असते, परंतु पावसाची नाराजी अशीच राहिल्यास स्थानिक बाजारांमध्ये स्थानिक पातळीवरचा भाजीपाला मिळणे कठीण होणार आहे. छोट्या प्रमाणात अशी भाजी विकणारेही आर्थिक संकटात सापडणार असल्याचे बोलले जाते.पावसाच्या आकेडवारीवर नजर टाकल्यास जून महिन्यात ९११.२५ मिमी सरासरी (१४१.६७ टक्के) पाऊस पडला होता. जुलै महिन्यातील पावसाच्या कामगिरीकडे पाहिल्यास १३२८.३४ मिमी सरासरी (११४.५८ टक्के) पाऊस झाला आहे, तर आॅगस्ट महिन्यात फक्त ३६.०७ मिमी सरासरी (०४.०८ टक्के) पाऊस झाला आहे. अजून पावसाचा हंगाम शिल्लक असला तरी, भात पिकाला वेळेवर मुबलक पाणी मिळाले नाही तर पीक संकटात येऊ शकते. त्यामुळे पावसाने बरसून बळीराजापुढील संकट दूर करावे अशी आर्त विनवणी करण्यात येत आहे.रायगड जिल्ह्यात पाऊस कमी झाला आहे, परंतु तो अधूनमधून बरसत असल्याने शेतामध्ये सध्या पुरेसे पाणी आहे. त्यामुळे शेतकºयांनी चिंता करण्याचे कारण नाही.-पांडुरंग शेळके, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

टॅग्स :Raigadरायगड