शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तराखंडच्या पिथोरागडमध्ये जीप नदीत कोसळली; ८ प्रवाशांचा जागीत मृत्यू, गाडीच्या शेजारी पडले मृतदेह
2
"अनेक दिग्गज नेते प्रदेशाध्यक्ष पदासाठी..."; पहिल्याच भाषणात शशिकांत शिंदेंची रोखठोक भूमिका, काय म्हणाले?
3
Pune Porsche Car Accident: मुलाला 'प्रौढ' ठरवून खटला चालविण्याचा पोलिसांचा अर्ज फेटाळला; बाल न्याय मंडळाचा अल्पवयीन मुलास दिलासा
4
जीएनएम प्रवेशासाठी घेतली २० हजार लाच; परभणीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
5
प्रचंड उष्णता, उडत होत्या आगीच्या ठिणग्या, तरीही या तंत्रज्ञानामुळे शुभांशू यांचं यान राहिलं सुरक्षित, पृथ्वीवर परतताना यानासोबत नेमकं काय घडलं?
6
विम्याच्या पैशांसाठी केले डबल मर्डर; बाबा बनून कुंभमेळ्यात फिरला, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
7
सिराजची विकेट अन् बरंच काही! गिलनं शेअर केली किंग चार्ल्स यांच्यासोबतच्या भेटीतील खास गोष्ट (VIDEO)
8
निमिषा प्रियाची फाशी टाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे ९४ वर्षीय मुस्लीम धर्मगुरू कोण? कुठे आणि कशी झाली चर्चा?
9
सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढवण्याच्या नादात तरुणी गेल्या तुरुंगात, अख्खा गाव विरोधात, नेमका प्रकार काय?   
10
‘’महाराष्ट्रातील सर्वजण मराठीच, मराठीला हात लावाल तर खबरदार, काँग्रेसचा हिंदीला विरोध नाही तर…’, हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
11
'मी मज हरपून...' आशा भोसलेंची नात जनाई आहे खूपच बिनधास्त अन् 'ब्यूटिफूल', पाहा तिचे ग्लॅमरस Photos
12
"मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकता?"; झेलेन्स्की यांच्या सोबत झालेल्या सिक्रेट बैठकीत ट्रम्प यांनी तयार केला खतरनाक प्लॅन!
13
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?
14
शरद पवारांचे विश्वासू, कामगार चळवळीतील बडे नेते; नवे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंची कारकीर्द
15
सगळीकडे 'ऑरा फार्मिंगची' चर्चा; नेमका हा काय प्रकार आहे? बोटीवर नाचणारा तो मुलगा कोण?
16
"ते आले, जबरदस्तीने पँट काढायला लावली आणि…’’ भाजपा नेत्यासोबत रंगेहात पकडल्या गेलेल्या महिलेचा दावा
17
“२६३३ दिवस अध्यक्ष, ७ वर्षांत एकही सुट्टी घेतली नाही, एक पाऊल मागे घेतोय, पण...”: जयंत पाटील
18
शशिकांत शिंदे पवार गटाचे नवे प्रदेशाध्यक्ष होताच जयंत पाटलांचे ट्विट, म्हणाले- "मागच्या काळात..."
19
मुंबई: गेटवे ऑफ इंडिया परिसरात रेडिओ क्लब जेटी प्रकल्पाला उच्च न्यायालयाचा हिरवा झेंडा
20
"माझा मुलगा असता तर बदला घेतला..." भाजपा नेत्याने कानाखाली मारल्यावर ढसाढसा रडले BEO

पावसाअभावी भातशेती करपण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 03:50 IST

गेल्या १० दिवसांपासून पावसाने पाठ फिरवल्यामुळे जिल्ह्यातील भात शेती धोक्यात आली आहे. शेतात पाणी नसल्याने जमिनींना भेगा पडल्या आहेत. पावसाच्या सरी मध्येच बरसत असल्या तरी शेतीसाठी त्या पूरक नाहीत.

अलिबाग : गेल्या १० दिवसांपासून पावसाने पाठ फिरवल्यामुळे जिल्ह्यातील भात शेती धोक्यात आली आहे. शेतात पाणी नसल्याने जमिनींना भेगा पडल्या आहेत. पावसाच्या सरी मध्येच बरसत असल्या तरी शेतीसाठी त्या पूरक नाहीत. अशीच परिस्थिती राहिल्यास भात पीक करपून आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागणार असल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. परंतु सध्याचा पाऊस हा समाधानकारक असल्याचा दावा कृषी विभागाने केला आहे.जिल्ह्यामध्ये जून महिन्यामध्येच पावसाने जोरदार बरसून आपले मनसुबे स्पष्ट केले होते. हवामान विभागानेही वेळोवेळी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार पाऊस समाधानकारक पडत होता. अख्खा जून महिना तसेच जुलै महिन्यामध्ये पावसाने चांगलाच जोर धरला. त्यामुळे शेतीच्या कामांनीही जोर पकडला होता. जिल्ह्यामध्ये भाताचे प्रमुख पीक घेतले जाते. त्यानुसार सर्वत्र मोठ्या संख्येने भाताची लावणी पूर्ण झाली आहे.भाताच्या पिकाने तग धरायला सुरुवात केली असतानाच आता पावसाने पाठ फिरवली आहे. गेले १० दिवस पाऊस लहरी असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यातच अधे-मधे कडक उन्हाच्या झळा बसत असल्याने अलिबाग तालुक्यातील काही ठिकाणच्या शेतातील जमिनीलाभेगा पडण्यास सुरुवात झालीआहे.भात पिकाला पुरेसे पाणी उपलब्ध झाले नाही तर भाताचे पीक करपण्याची शक्यता असल्याचे खंडाळे येथील शेतकरी नंदू सोडवे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. पावसाची उघडीप कायम राहिल्यास ते शेतीला नक्कीच परवडणारे नसल्याने शेतकऱ्यांना फार मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. शेतकरी भातासोबतच बांधावर शेती करताना विविध भाजीपाला, मिरची, टोमॅटो यांचेही पीक घेतात. या पिकांनाही पाण्याची आवश्यकता असल्याने छोटे उत्पन्नही संकटात सापडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.स्थानिक बाजारात रोजचीरोज ताजी भाजी उपलब्ध होत असते, परंतु पावसाची नाराजी अशीच राहिल्यास स्थानिक बाजारांमध्ये स्थानिक पातळीवरचा भाजीपाला मिळणे कठीण होणार आहे. छोट्या प्रमाणात अशी भाजी विकणारेही आर्थिक संकटात सापडणार असल्याचे बोलले जाते.पावसाच्या आकेडवारीवर नजर टाकल्यास जून महिन्यात ९११.२५ मिमी सरासरी (१४१.६७ टक्के) पाऊस पडला होता. जुलै महिन्यातील पावसाच्या कामगिरीकडे पाहिल्यास १३२८.३४ मिमी सरासरी (११४.५८ टक्के) पाऊस झाला आहे, तर आॅगस्ट महिन्यात फक्त ३६.०७ मिमी सरासरी (०४.०८ टक्के) पाऊस झाला आहे. अजून पावसाचा हंगाम शिल्लक असला तरी, भात पिकाला वेळेवर मुबलक पाणी मिळाले नाही तर पीक संकटात येऊ शकते. त्यामुळे पावसाने बरसून बळीराजापुढील संकट दूर करावे अशी आर्त विनवणी करण्यात येत आहे.रायगड जिल्ह्यात पाऊस कमी झाला आहे, परंतु तो अधूनमधून बरसत असल्याने शेतामध्ये सध्या पुरेसे पाणी आहे. त्यामुळे शेतकºयांनी चिंता करण्याचे कारण नाही.-पांडुरंग शेळके, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

टॅग्स :Raigadरायगड