शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
2
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
3
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
4
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
5
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
6
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
7
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
8
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
9
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
10
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
11
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
12
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
13
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
14
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
15
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
16
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
17
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
18
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
19
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
20
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले

पंदेरी-दापोली गावांना जोडणारा पूल चार दिवस पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 23:13 IST

लोखंडी पुलाचा आधार : विद्यार्थ्यांना करावी लागते पायपीट

बिरवाडी : महाड तालुक्यातील दापोली-पंदेरी गावांना जोडणारा पूल गेले चार दिवस पडणाऱ्या पावसाने पाण्याखाली गेला आहे. विद्यार्थ्यांना शाळेत व महाविद्यालयात जाण्यासाठी चार किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे, तर नदीपात्र ओलांडण्याकरिता लोखंडी पुलाचा आधार घेत तारेवरची कसरत करीत ये-जा करावी लागत आहे.

महाड शहरापासून २५ ते ३० किलोमीटरच्या अंतरावर पंदेरी, दापोली, दापोली पाडा, ही गावे सह्याद्री पर्वतरांगांच्या कुशीत वसलेली आहेत. या ठिकाणी जाण्याकरिता असणाºया रस्त्यावर नदीपात्र ओलांडण्याकरिता पूल बांधण्यात आला आहे. मात्र, पुलाची उंची कमी असल्याने पावसाळ्याच्या दिवसांत अनेक दिवस गावांचा तालुक्यापासून संपर्क तुटला जात आहे. दापोली-पंदेरी या गावाकडे जाणाºया रस्त्याचे नूतनीकरण प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून करण्यात आले आहे, त्याचप्रमाणे सद्यस्थितीत रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून या रस्त्याचे डांबरीकरणही झाले आहे. मात्र, या रस्त्यावरील पुलाची उंची कमी असल्याने हा पूल मुसळधार पावसात कायम पाण्याखाली असल्याने गावातील वाहतूक पूर्णपणे ठप्प होते, तर विद्यार्थ्यांना शाळेत जाण्याकरिता पंदेरी-दापोली, दापोली-पाडा अशी पायपीट करीत वाळण कोंडी येथील लोखंडी पुलावरून नदी ओलांडावी लागते, ही परिस्थिती कायम असल्याने शासनाच्या उदासीन धोरणामुळे या डोंगरावरील नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.

याबाबत महाडचे आमदार भरत गोगावले यांनी ही समस्या मार्गी लावण्याकरिता सुमारे पाच कोटी रुपयांचा निधी आवश्यक आहे, याकरिता शासन दरबारी पाठपुरावा करून दापोली-पंदेरीमधील नागरिकांची गैरसोय कायमस्वरूपी दूर करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.