शहरं
Join us  
Trending Stories
1
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
2
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
3
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
4
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
5
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
6
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
7
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
8
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
9
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
10
Surya Gochar 2025: सूर्य होणार अधिक प्रखर, मात्र 'या' राशींसाठी ठरणार सुखकर; कसा ते पहा!
11
'तुझा मुलगा जिन्न आहे' मांत्रिकाचं ऐकून १२ वर्षांनी झालेल्या मुलाला कालव्यात फेकलं!
12
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट
13
ICC Test Rankings : 'तलवारबाज' जड्डूचा मोठा पराक्रम! टेस्टमध्ये अव्वलस्थान कायम राखत सेट केला नवा विक्रम
14
३६ युद्धनौका, ७ विनाशिका, फ्रिगेट आणि पाणबुड्या..., त्या रात्री नौदलाने केली होती कराची बेचिराख करण्याची तयारी   
15
Mumbai: मुंबईतील महिलेची सातव्या मजल्यावरून उडी, सुसाईड नोटमध्ये लिहिले मृत्युचे कारण
16
दहशतवादी मसूद अजहरला पाकिस्तानी सरकार १४ कोटी रुपये देणार? कारण ऐकून व्हाल हैराण!
17
India Pakistan conflict : मोठा खुलासा! तुर्कीचे सैनिक भारतावर ड्रोन हल्ला करत होते; सीमेपलिकडे काय घडत होते?
18
'आली रे आली चीनची बारी आली'; आता मोदी सरकार चीनची नांगी ठेचण्याच्या तयारीत, प्रकरण काय?
19
भारताविरोधातील कट उधळला! शोपियान चकमकीत ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
20
प्रसिद्ध सेलिब्रिटीचा व्हिसा रिजेक्ट, कान्सला जाण्याचं स्वप्न भंगलं; पोस्ट शेअर करत म्हणाली...

पंदेरी-दापोली गावांना जोडणारा पूल चार दिवस पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 23:13 IST

लोखंडी पुलाचा आधार : विद्यार्थ्यांना करावी लागते पायपीट

बिरवाडी : महाड तालुक्यातील दापोली-पंदेरी गावांना जोडणारा पूल गेले चार दिवस पडणाऱ्या पावसाने पाण्याखाली गेला आहे. विद्यार्थ्यांना शाळेत व महाविद्यालयात जाण्यासाठी चार किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे, तर नदीपात्र ओलांडण्याकरिता लोखंडी पुलाचा आधार घेत तारेवरची कसरत करीत ये-जा करावी लागत आहे.

महाड शहरापासून २५ ते ३० किलोमीटरच्या अंतरावर पंदेरी, दापोली, दापोली पाडा, ही गावे सह्याद्री पर्वतरांगांच्या कुशीत वसलेली आहेत. या ठिकाणी जाण्याकरिता असणाºया रस्त्यावर नदीपात्र ओलांडण्याकरिता पूल बांधण्यात आला आहे. मात्र, पुलाची उंची कमी असल्याने पावसाळ्याच्या दिवसांत अनेक दिवस गावांचा तालुक्यापासून संपर्क तुटला जात आहे. दापोली-पंदेरी या गावाकडे जाणाºया रस्त्याचे नूतनीकरण प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून करण्यात आले आहे, त्याचप्रमाणे सद्यस्थितीत रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून या रस्त्याचे डांबरीकरणही झाले आहे. मात्र, या रस्त्यावरील पुलाची उंची कमी असल्याने हा पूल मुसळधार पावसात कायम पाण्याखाली असल्याने गावातील वाहतूक पूर्णपणे ठप्प होते, तर विद्यार्थ्यांना शाळेत जाण्याकरिता पंदेरी-दापोली, दापोली-पाडा अशी पायपीट करीत वाळण कोंडी येथील लोखंडी पुलावरून नदी ओलांडावी लागते, ही परिस्थिती कायम असल्याने शासनाच्या उदासीन धोरणामुळे या डोंगरावरील नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.

याबाबत महाडचे आमदार भरत गोगावले यांनी ही समस्या मार्गी लावण्याकरिता सुमारे पाच कोटी रुपयांचा निधी आवश्यक आहे, याकरिता शासन दरबारी पाठपुरावा करून दापोली-पंदेरीमधील नागरिकांची गैरसोय कायमस्वरूपी दूर करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.