शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

खालापुरातील तळे होणार गाळमुक्त

By admin | Updated: May 26, 2016 03:05 IST

पाणीटंचाईच्या झळा आणि विदारक वास्तव रोजचेच समोर येत असताना कोकणातही टंचाईसदृश परिस्थिती अजूनही मोठ्या प्रमाणात आहे. कोकणातील खालापूर तालुका राज्याच्या टंचाई कृती

खालापूर : पाणीटंचाईच्या झळा आणि विदारक वास्तव रोजचेच समोर येत असताना कोकणातही टंचाईसदृश परिस्थिती अजूनही मोठ्या प्रमाणात आहे. कोकणातील खालापूर तालुका राज्याच्या टंचाई कृती आराखड्यात असल्याने तालुक्यात मुबलक पाणी असूनही नैसर्गिक आणि कृत्रिम टंचाईने पाण्याची टंचाईजन्य परिस्थिती आहे. यातच खालापूर तहसीलदारांनी जिल्हाधिकारी, प्रांताधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील गावांमधील पाझर तलावातील गाळ लोकसहभागातून काढण्याचे काम सुरु केल्याने पाण्याचे दुर्भिक्ष दूर होण्यास चांगलीच मदत होणार आहे. तालुक्यात दोनवत, कलोते, मोरबेसारखी धरणे तर बाळगंगा, पाताळगंगा बारमाही वाहणाऱ्या नद्या असूनही नैसर्गिक आणि मानवी पाणीटंचाई कायम आहे. तालुक्यातील टंचाईवर मात करण्यासाठी तहसीलदारांनी काम सुरु केले आहे. ऐतिहासिक तलावासोबत वावंढळ, गोहे, नंदनपाडा आदि ठिकाणी गावतळे असून अत्कारगाव येथे पाझर तलाव आहे. या तळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला असून हा गाळ काढण्यासाठी तहसीलदार अजित नैराळे यांनी पुढाकार घेतला आहे. याबाबत नुकतीच तहसील येथे स्थानिक, शेतकऱ्यांची बैठक घेवून लोकसहभाग घेऊन गाळ काढण्याच्या अभियानाला सुरु वात केली आहे. मार्चनंतर पाण्याचे दुर्भिक्ष मोठ्या प्रमाणात जाणवते यासाठी तत्काळ आणि कायमस्वरूपी उपाय म्हणून तळ्यांमधील गाळ उपसा केला तर पाणी साठवणूक क्षमता वाढेल आणि मे महिन्यापर्यंत टंचाईवर मात करण्यासाठी नक्कीच उपयोगी ठरणार आहे. फक्त या कामात लोकसहभाग महत्वाचा आहे आणि तो तालुक्यात मिळत आहे. अनेकांनी या कामात मदत केली आहे. - अजित नैराळे, तहसीलदार, खालापूर