शहरं
Join us  
Trending Stories
1
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
2
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
3
व्लादिमीर पुतिन यांची ऑफर लीक झाली, डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचा प्लान जगाला सांगितला
4
नोकरी खाजगी, पैसा सरकारी! पंतप्रधान विकासित भारत रोजगार योजनेचं पोर्टल सुरू, किती मिळणार पैसे?
5
आईने दोन पेग घेतले, त्यानंतर..., निळ्या ड्रमातील मृतदेह प्रकरणात मुलाने दिली धक्कादायक माहिती  
6
Asia Cup 2025 : त्याची काही चूक नाही, पण... आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? पुन्हा तोच रिप्लाय
7
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?
8
Mumbai Rain Updates Live: पावसात अडकलेल्यांसाठी मुंबई महापालिका सरसावली; पाणी, खाद्यपदार्थांचे वाटप
9
मालिकेसाठी कायपण! शूटिंगसाठी मंदार आणि गिरिजा प्रभूचा कमरेभर पाण्यातून जीवघेणा प्रवास, व्हिडीओ समोर
10
नाथपंथीय दीक्षा, माऊलींची परंपरा, स्वामीकृपा; ‘सोऽहम’मंत्र देणारे पावसचे स्वामी स्वरुपानंद
11
वरून वीज, खालीही वीज...! एकाला करंट लागल्याने समजले, नाहीतर...; कोणत्या शहरात घडले...
12
बॉयफ्रेंडसोबत राहण्याचा हट्ट, आईने १२ वर्षांच्या मुलीचं स्वतःच्या प्रियकराशी लग्न; नंतर पतीचा काटा काढला अन्.. 
13
आता रेल्वे प्रवासात कितीही सामान नेता येणार नाही, लवकरच निश्चित होतोय नियम; जाणून घ्या, कोणत्या क्लाससाठी किती मर्यादा?
14
'आम्हाला मतदान करा, राहुल गांधींना देशाचे पंतप्रधान करू', तेजस्वी यादवांची घोषणा
15
Thane: पावसाचा कहर, त्यात रस्त्यावरील पाण्यात साप; ठाणे शहरातील हा व्हिडीओ बघा
16
Mumbai Rains: मुंबईकरांसमोर आणखी एक संकट, मिठी नदीने धोक्याची पातळी गाठली, सतर्क राहण्याचा इशारा!
17
डॉक्टर सांगतात, सणासुदीला तळणीसाठी 'या' तेलाची निवड करा; ना वजन वाढणार, ना तब्येत बिघडणार 
18
गाझामध्ये 'हा' धोकादायक आजार का पसरतोय वेगाने? उपचारही झालेत अशक्य; डॉक्टरांची डोकेदुखी वाढली!
19
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
20
"बहुत तेज बारिश है!" टीम इंडियाच्या सिलेक्शनसाठी IPL छत्रीतून सूर्या दादाची कडक एन्ट्री; व्हिडिओ व्हायरल

नवीन उद्योगांना प्रदूषण मंडळाचा हिरवा कंदील

By admin | Updated: June 23, 2017 06:05 IST

पूर्वी डर्टीथर्टीच्या काळ्या यादीत बदनाम झालेल्या महाड औद्योगिक क्षेत्रातील सामूहिक सांडपाणी केंद्राने केलेल्या आमूलाग्र बदलांमुळे

लोकमत न्यूज नेटवर्कमहाड : पूर्वी डर्टीथर्टीच्या काळ्या यादीत बदनाम झालेल्या महाड औद्योगिक क्षेत्रातील सामूहिक सांडपाणी केंद्राने केलेल्या आमूलाग्र बदलांमुळे, तसेच राबवलेल्या कठोर निर्बंधांमुळेच हे सामूहिक सांडपाणी केंद्र महाराष्ट्रात सर्वोत्तम ठरले. त्यांचा आदर्श महाराष्ट्रामधील अन्य सांडपाणी प्रक्रिया केंद्रानेही घ्यावा, असे आवाहन करताना, भविष्यात महाडचे हे सांडपाणी प्रक्रिया केंद्र राष्ट्रीय पातळीवरही आपल्या गुणवत्तेबाबत नावलौकिक मिळवेल, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी डॉ. ए. एन. हर्षवर्धन यांनी केले.महाडच्या सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राला ‘वसुंधरा पुरस्कार’ मिळाल्याबद्दल एमएसए सीईटीपीतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी नव्याने सुशोभीकरण करण्यात आलेल्या गार्डन व वातानुकूलित कॉन्फरन्स हॉलचेही डॉ. हर्षवर्धन यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.सांडपाणी केंद्राचा परफार्मन्स उत्कृष्ट असल्यामुळे नवीन रासायनिक कारखान्यासाठी महाड औद्योगिक क्षेत्रात हिरवा कंदील असेल, अशा उद्योगांना प्रदूषण मंडळाकडून कुठलीही अडचण निर्माण होणार नाही, अशी ग्वाहीदेखील डॉ. हर्षवर्धन यांनी या वेळी दिली. आम्ही ज्या ज्या औद्योगिक क्षेत्रातील सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राना भेटी देतो, त्या वेळी त्या ठिकाणच्या संचालकांना महाडचे प्रक्रिया केंद्र बघून यात त्यांनी कशा सुधारणा केल्या, त्याचे निरीक्षण करा, असा सल्ला आम्ही देत असतो. सामाजिक जबाबदारीची जाणीव असल्यामुळेच महाड औद्योगिक क्षेत्रात प्रदूषणमुक्त वातावरण उद्योगांनी निर्माण केल्याचे हर्षवर्धन यांनी सांगितले. प्रक्रिया केंद्राचे अध्यक्ष संभाजीराव पठारे आणि सहकाऱ्यांनी घेतलेल्या अथक प्रयत्नांमुळेच या प्रक्रिया केंद्राला वसुंधरा पुरस्कार मिळाल्याचे सांगताना, प्रदूषणमुक्त वातावरण असेल तर निसर्गदेखील चांगली साथ देत असतो. महाड औद्योगिक क्षेत्रातील कारखानदारांना सर्व प्रकारचे सहकार्य प्रदूषण मंडळाकडून केले जाईल, असेही हर्षवर्धन यांनी स्पष्ट केले. प्रदूषण मंडळाचे वरिष्ठ अधिकार सोनटक्के यांनी महाडमधील उद्योगांनी अनेक अडचणींवर मात करीत आपला विकास साधला आहे. पर्यावरणाचे रक्षण करण्याचे काम कारखानदारांनी करण्याची आवश्यकता आहे. प्रतिकूल परिस्थितीशी सामना करीत, महाडच्या सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राने केलेली प्रगती कौतुकास्पद असल्याचेही सोनटक्के यांनी सांगितले. एमएमए सीईटीपीचे अध्यक्ष संभाजीराव पठारे म्हणाले की, आपल्या केंद्राला वसुंधरा पुरस्कार मिळाल्यामुळे येथील प्रत्येक उद्योगाची जबाबदारी आता वाढलेली असल्याचे सांगितले. प्रक्रिया केंद्राच्या सुधारणेसाठी आपण घेतलेल्या कठोर निर्णयामुळे कटुता निर्माण झाली होती. मात्र, त्यापेक्षा आज त्याची खऱ्या अर्थाने फ लश्रुती झाल्याचे समाधान लाभल्याचे पठारे यांनी सांगितले. त्यासाठी अनेक सकारात्मक निर्णय घेतले म्हणूनच हा नावलौकिक मिळाल्याचे पठारे यांनी स्पष्ट केले. या वेळी पर्यावरणतज्ज्ञ डॉ. सुधीर पटवर्धन, रमेश भोसले, जे. एच. पाटील, कार्यकारी अभियंता बाळासाहेब झंजे यांची भाषणे झाली. व्यासपीठावर उपाध्यक्ष अशोक तलाठी, के. व्ही. आपटे, पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील, उपप्रादेशिक अधिकारी माने आदी उपस्थित होते.