शहरं
Join us  
Trending Stories
1
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
2
क्रिकेटर रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा! दोघांच्या खास लूकची चर्चा; इथं पाहा Pics
3
पुण्यात अंधश्रद्धेचा कळस! झाडातून वाहू लागलं पाणी, लोकांनी पूजा करत घेतले दर्शन; नंतर कळलं की...
4
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
5
“कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय होईल”; दोन्ही NCP एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचे विधान
6
Viral : मेहुणीला बघून कंट्रोल सुटला, भर स्टेजवरच नवरदेवाने ताल धरला! व्हिडीओ होतोय व्हायरल
7
MS Dhoni च्या गॅरेजमध्ये 100 हून अधिक लक्झरी बाईक्स; किंमत ऐकून बसेल धक्का..!
8
मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष
9
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
10
भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?
11
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
12
"सध्या अ‍ॅक्शन सिनेमे चालत आहेत, त्यामुळे.."; आमिर खान 'सितारे जमीन पर'साठी चिंताग्रस्त, म्हणाला-
13
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
14
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
15
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
16
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
17
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
18
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
19
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
20
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?

नवीन उद्योगांना प्रदूषण मंडळाचा हिरवा कंदील

By admin | Updated: June 23, 2017 06:05 IST

पूर्वी डर्टीथर्टीच्या काळ्या यादीत बदनाम झालेल्या महाड औद्योगिक क्षेत्रातील सामूहिक सांडपाणी केंद्राने केलेल्या आमूलाग्र बदलांमुळे

लोकमत न्यूज नेटवर्कमहाड : पूर्वी डर्टीथर्टीच्या काळ्या यादीत बदनाम झालेल्या महाड औद्योगिक क्षेत्रातील सामूहिक सांडपाणी केंद्राने केलेल्या आमूलाग्र बदलांमुळे, तसेच राबवलेल्या कठोर निर्बंधांमुळेच हे सामूहिक सांडपाणी केंद्र महाराष्ट्रात सर्वोत्तम ठरले. त्यांचा आदर्श महाराष्ट्रामधील अन्य सांडपाणी प्रक्रिया केंद्रानेही घ्यावा, असे आवाहन करताना, भविष्यात महाडचे हे सांडपाणी प्रक्रिया केंद्र राष्ट्रीय पातळीवरही आपल्या गुणवत्तेबाबत नावलौकिक मिळवेल, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी डॉ. ए. एन. हर्षवर्धन यांनी केले.महाडच्या सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राला ‘वसुंधरा पुरस्कार’ मिळाल्याबद्दल एमएसए सीईटीपीतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी नव्याने सुशोभीकरण करण्यात आलेल्या गार्डन व वातानुकूलित कॉन्फरन्स हॉलचेही डॉ. हर्षवर्धन यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.सांडपाणी केंद्राचा परफार्मन्स उत्कृष्ट असल्यामुळे नवीन रासायनिक कारखान्यासाठी महाड औद्योगिक क्षेत्रात हिरवा कंदील असेल, अशा उद्योगांना प्रदूषण मंडळाकडून कुठलीही अडचण निर्माण होणार नाही, अशी ग्वाहीदेखील डॉ. हर्षवर्धन यांनी या वेळी दिली. आम्ही ज्या ज्या औद्योगिक क्षेत्रातील सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राना भेटी देतो, त्या वेळी त्या ठिकाणच्या संचालकांना महाडचे प्रक्रिया केंद्र बघून यात त्यांनी कशा सुधारणा केल्या, त्याचे निरीक्षण करा, असा सल्ला आम्ही देत असतो. सामाजिक जबाबदारीची जाणीव असल्यामुळेच महाड औद्योगिक क्षेत्रात प्रदूषणमुक्त वातावरण उद्योगांनी निर्माण केल्याचे हर्षवर्धन यांनी सांगितले. प्रक्रिया केंद्राचे अध्यक्ष संभाजीराव पठारे आणि सहकाऱ्यांनी घेतलेल्या अथक प्रयत्नांमुळेच या प्रक्रिया केंद्राला वसुंधरा पुरस्कार मिळाल्याचे सांगताना, प्रदूषणमुक्त वातावरण असेल तर निसर्गदेखील चांगली साथ देत असतो. महाड औद्योगिक क्षेत्रातील कारखानदारांना सर्व प्रकारचे सहकार्य प्रदूषण मंडळाकडून केले जाईल, असेही हर्षवर्धन यांनी स्पष्ट केले. प्रदूषण मंडळाचे वरिष्ठ अधिकार सोनटक्के यांनी महाडमधील उद्योगांनी अनेक अडचणींवर मात करीत आपला विकास साधला आहे. पर्यावरणाचे रक्षण करण्याचे काम कारखानदारांनी करण्याची आवश्यकता आहे. प्रतिकूल परिस्थितीशी सामना करीत, महाडच्या सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राने केलेली प्रगती कौतुकास्पद असल्याचेही सोनटक्के यांनी सांगितले. एमएमए सीईटीपीचे अध्यक्ष संभाजीराव पठारे म्हणाले की, आपल्या केंद्राला वसुंधरा पुरस्कार मिळाल्यामुळे येथील प्रत्येक उद्योगाची जबाबदारी आता वाढलेली असल्याचे सांगितले. प्रक्रिया केंद्राच्या सुधारणेसाठी आपण घेतलेल्या कठोर निर्णयामुळे कटुता निर्माण झाली होती. मात्र, त्यापेक्षा आज त्याची खऱ्या अर्थाने फ लश्रुती झाल्याचे समाधान लाभल्याचे पठारे यांनी सांगितले. त्यासाठी अनेक सकारात्मक निर्णय घेतले म्हणूनच हा नावलौकिक मिळाल्याचे पठारे यांनी स्पष्ट केले. या वेळी पर्यावरणतज्ज्ञ डॉ. सुधीर पटवर्धन, रमेश भोसले, जे. एच. पाटील, कार्यकारी अभियंता बाळासाहेब झंजे यांची भाषणे झाली. व्यासपीठावर उपाध्यक्ष अशोक तलाठी, के. व्ही. आपटे, पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील, उपप्रादेशिक अधिकारी माने आदी उपस्थित होते.