शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

नवीन उद्योगांना प्रदूषण मंडळाचा हिरवा कंदील

By admin | Updated: June 23, 2017 06:05 IST

पूर्वी डर्टीथर्टीच्या काळ्या यादीत बदनाम झालेल्या महाड औद्योगिक क्षेत्रातील सामूहिक सांडपाणी केंद्राने केलेल्या आमूलाग्र बदलांमुळे

लोकमत न्यूज नेटवर्कमहाड : पूर्वी डर्टीथर्टीच्या काळ्या यादीत बदनाम झालेल्या महाड औद्योगिक क्षेत्रातील सामूहिक सांडपाणी केंद्राने केलेल्या आमूलाग्र बदलांमुळे, तसेच राबवलेल्या कठोर निर्बंधांमुळेच हे सामूहिक सांडपाणी केंद्र महाराष्ट्रात सर्वोत्तम ठरले. त्यांचा आदर्श महाराष्ट्रामधील अन्य सांडपाणी प्रक्रिया केंद्रानेही घ्यावा, असे आवाहन करताना, भविष्यात महाडचे हे सांडपाणी प्रक्रिया केंद्र राष्ट्रीय पातळीवरही आपल्या गुणवत्तेबाबत नावलौकिक मिळवेल, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी डॉ. ए. एन. हर्षवर्धन यांनी केले.महाडच्या सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राला ‘वसुंधरा पुरस्कार’ मिळाल्याबद्दल एमएसए सीईटीपीतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी नव्याने सुशोभीकरण करण्यात आलेल्या गार्डन व वातानुकूलित कॉन्फरन्स हॉलचेही डॉ. हर्षवर्धन यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.सांडपाणी केंद्राचा परफार्मन्स उत्कृष्ट असल्यामुळे नवीन रासायनिक कारखान्यासाठी महाड औद्योगिक क्षेत्रात हिरवा कंदील असेल, अशा उद्योगांना प्रदूषण मंडळाकडून कुठलीही अडचण निर्माण होणार नाही, अशी ग्वाहीदेखील डॉ. हर्षवर्धन यांनी या वेळी दिली. आम्ही ज्या ज्या औद्योगिक क्षेत्रातील सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राना भेटी देतो, त्या वेळी त्या ठिकाणच्या संचालकांना महाडचे प्रक्रिया केंद्र बघून यात त्यांनी कशा सुधारणा केल्या, त्याचे निरीक्षण करा, असा सल्ला आम्ही देत असतो. सामाजिक जबाबदारीची जाणीव असल्यामुळेच महाड औद्योगिक क्षेत्रात प्रदूषणमुक्त वातावरण उद्योगांनी निर्माण केल्याचे हर्षवर्धन यांनी सांगितले. प्रक्रिया केंद्राचे अध्यक्ष संभाजीराव पठारे आणि सहकाऱ्यांनी घेतलेल्या अथक प्रयत्नांमुळेच या प्रक्रिया केंद्राला वसुंधरा पुरस्कार मिळाल्याचे सांगताना, प्रदूषणमुक्त वातावरण असेल तर निसर्गदेखील चांगली साथ देत असतो. महाड औद्योगिक क्षेत्रातील कारखानदारांना सर्व प्रकारचे सहकार्य प्रदूषण मंडळाकडून केले जाईल, असेही हर्षवर्धन यांनी स्पष्ट केले. प्रदूषण मंडळाचे वरिष्ठ अधिकार सोनटक्के यांनी महाडमधील उद्योगांनी अनेक अडचणींवर मात करीत आपला विकास साधला आहे. पर्यावरणाचे रक्षण करण्याचे काम कारखानदारांनी करण्याची आवश्यकता आहे. प्रतिकूल परिस्थितीशी सामना करीत, महाडच्या सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राने केलेली प्रगती कौतुकास्पद असल्याचेही सोनटक्के यांनी सांगितले. एमएमए सीईटीपीचे अध्यक्ष संभाजीराव पठारे म्हणाले की, आपल्या केंद्राला वसुंधरा पुरस्कार मिळाल्यामुळे येथील प्रत्येक उद्योगाची जबाबदारी आता वाढलेली असल्याचे सांगितले. प्रक्रिया केंद्राच्या सुधारणेसाठी आपण घेतलेल्या कठोर निर्णयामुळे कटुता निर्माण झाली होती. मात्र, त्यापेक्षा आज त्याची खऱ्या अर्थाने फ लश्रुती झाल्याचे समाधान लाभल्याचे पठारे यांनी सांगितले. त्यासाठी अनेक सकारात्मक निर्णय घेतले म्हणूनच हा नावलौकिक मिळाल्याचे पठारे यांनी स्पष्ट केले. या वेळी पर्यावरणतज्ज्ञ डॉ. सुधीर पटवर्धन, रमेश भोसले, जे. एच. पाटील, कार्यकारी अभियंता बाळासाहेब झंजे यांची भाषणे झाली. व्यासपीठावर उपाध्यक्ष अशोक तलाठी, के. व्ही. आपटे, पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील, उपप्रादेशिक अधिकारी माने आदी उपस्थित होते.