शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
3
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
4
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
5
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
6
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
7
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
8
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
9
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
10
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
11
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
12
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
13
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
14
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
15
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
16
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
17
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
18
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
19
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
20
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!

कर्जत तालुक्यात निवडणुकींचे वेध

By admin | Updated: January 9, 2017 06:27 IST

राज्यातील नगरपरिषद, नगरपंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी संपली. पाच राज्यांच्या निवडणुकासुद्धा जाहीर झाल्यात. कोणत्याही क्षणी महापालिका

 विजय मांडे / कर्जतराज्यातील नगरपरिषद, नगरपंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी संपली. पाच राज्यांच्या निवडणुकासुद्धा जाहीर झाल्यात. कोणत्याही क्षणी महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर होतील. या निवडणुका म्हणजे मिनी विधानसभा निवडणुका म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. काही दिवसांपूर्वी जिल्हापरिषद व पंचायत समिती निवडणुका ७ फेब्रुवारी रोजी होणार, असे मेसेज अगदी वर्तमानपत्रातील बातमीसह व्हायरल झाल्याने अनेक इच्छुकांनी आपापल्या प्रभागात मोर्चेबांधणीला सुरु वात केली. मात्र, अद्याप या निवडणुका जाहीर न झाल्याने, ही मोर्चेबांधणी थंडावली आहे. असे असले तरी राष्ट्रवादी काँग्रेस व शेकापची आघाडी निश्चितच आपले वर्चस्व राखेल, असे चित्र दिसत आहे. कर्जत तालुक्यात गेल्या निवडणुकीत जिल्हा परिषदेचे पाच गट, तर पंचायत समितीचे दहा गण होते. यंदा त्यात बदल होऊन सहा गट व बारा गण झाले आहेत. जिल्हा परिषदेच्या एका गटाची व पंचायत समितीच्या दोन गणांची वाढ झाल्याने पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आपल्या कार्यकर्त्यांची वर्णी लावणे, जरा सोपे झाले आहे. यावेळी तालुक्यात एके काळी निर्विवाद वर्चस्व असलेल्या शेतकरी कामगार पक्षाची व आता तालुक्यात वर्चस्व असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आघाडी झाली आहे. तर सध्या तरी शिवसेना, भाजपा व काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. आरपीआय कुणाबरोबर असेल, हे आताच सांगता येणार नाही.प्रचाराच्या बाबतीत राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर आहे. त्यांच्या जिल्हा परिषद गटनिहाय कार्यकर्त्यांच्या सभा वर्षाच्या पहिल्याच दिवशी पार पडल्या. इच्छुक उमेदवारांनी पक्षाकडे उमेदवारीचे अर्जसुद्धा दाखल केले; परंतु राष्ट्रवादी काँग्रेस-शेतकरी कामगार पक्षाची आघाडी असल्याने कोणत्या जागा कोणाला सोडायच्या याचा निर्णय न झाल्याने इच्छुक प्रतीक्षेत आहेत. असे असले तरी ज्यांना उमेदवारी मिळण्याची खात्री आहे ते प्रचारालासुद्धा लागले आहेत. अशी परिस्थिती शिवसेनेचीसुद्धा आहे. कोणाशी युती करायची हे अद्याप निश्चित न झाल्याने सर्वच प्रतीक्षेत आहेत. भाजपा, काँग्रेसनेसुद्धा उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस व शेतकरी कामगार पक्ष हे जिल्ह्यातील बलाढ्य दोन पक्ष एकत्र आल्याने त्यांना निवडणूक सोपी जाणार आहे. जिल्ह्यात शेतकरी कामगार पक्ष ज्या पक्षाबरोबर आहे त्याची सरशी होते, असा आजपर्यंतचा अनुभव आहे. काही अपवादसुद्धा असतील; परंतु अलीकडच्या काळात हेच समीकरण दिसत आहे. खोपोली नगरपरिषदेत शेकापपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर होता म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचा नगराध्यक्ष झाला. जिल्हा परिषदेत शेतकरी कामगार पक्ष, शिवसेना, आरपीआय महायुती होती म्हणून आरपीआयचा जिल्हा परिषद अध्यक्ष झाला. त्यानंतर शेकापने महायुतीशी फारकत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर घरोबा केल्याने जिल्हा परिषद अध्यक्षपद राष्ट्रवादीला मिळाले. तसेच कर्जत तालुक्यातसुद्धा शेतकरी कामगार पक्षाने शिवसेनेची साथ सोडली आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर जुळवून घेतले म्हणून राष्ट्रवादीच्या सभापती विराजमान झाल्या. यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप आघाडी तालुक्यातील बहुतांश जागा जिंकेल, तर पंचायत समितीवरसुद्धा निर्विवाद सत्ता आणेल, असे चित्र आतातरी स्पष्टपणे दिसत आहे.राष्ट्रवादी काँग्रेस शेकाप आघाडी जिंकण्याचे चिन्ह?गेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत शेकापपक्ष, शिवसेना, आरपीआय अशी युती होती, तर कर्जत तालुक्यात ग्रामीण भागात अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतकी मते असलेल्या भाजपाला बरोबर घेऊन निवडणूक लढविलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा परिषदेच्या पाचपैकी दोन जागा जिंकल्या होत्या, तर पंचायत समितीच्या तीन जागा जिंकल्या होत्या, याचा फायदा भाजपाला मिळाला.कारण भाजपाचे प्रकाश वारे यांचा पं . स.मध्ये प्रवेश सुकर झाला होता.  अडीच वर्षांनंतर झालेल्या पंचायत स्ािमती सभापती निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडून आघाडीचा धर्म तोडला व शिवसेनेबरोबर राहणे पसंद केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला उपसभापतीपदावर पाणी सोडावे लागले होते. यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप आघाडी तालुक्यातील बहुतांश जागा जिंकेल, तर पंचायत समितीवरसुद्धा निर्विवाद सत्ता आणेल, असे चित्र आतातरी स्पष्टपणे दिसत आहे.