शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी राजकीय पक्ष सज्ज, प्रतिष्ठा पणाला : खारसई ग्रामपंचायतीची निवडणूक होणार चुरशीची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 03:22 IST

तालुक्यातील मोठी व सर्वच राजकीय पक्षांसाठी प्रतिष्ठेची खरसई ग्रामपंचायत निवडणूक चुरशीची होणार असून गेली दहा वर्षे असलेली बिनविरोध निवडणुकीची परंपरा खंडित होणार असल्याचे स्पष्ट संकेत

म्हसळा : तालुक्यातील मोठी व सर्वच राजकीय पक्षांसाठी प्रतिष्ठेची खरसई ग्रामपंचायत निवडणूक चुरशीची होणार असून गेली दहा वर्षे असलेली बिनविरोध निवडणुकीची परंपरा खंडित होणार असल्याचे स्पष्ट संकेत राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी दिले आहेत. पहिल्यांदाच सरपंच थेट निवडणूक होत असल्याने सरपंच पदासह संपूर्ण पॅनल निवडून आणण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे.खरसई ग्रामपंचायतीत एकूण ९ सदस्य संख्या असून प्रभाग १ मध्ये सर्वसाधारण खुला १ व सर्वसाधारण महिला ३, प्रभाग क्र. २ मध्ये सर्वसाधारण खुला १, सर्वसाधारण महिला १, नामप्र महिला १, प्रभाग क्र. ३ मध्ये सर्वसाधारण खुला १, नामप्र पुरु ष १, अनुसूचित जमाती महिला १ अशा प्रकारे आरक्षण आहे. सरपंच पदासाठी अनेक नावे चर्चेत असली तरी शेकापकडून विद्यमान सरपंच नीलेश मांदाडकर, शिवसेनेकडून कानू शितकर, नरेश कातळकर, भाजपकडून चंद्रकांत खोत तर खरसई ग्रामविकास आघाडीतर्फे हरिश पयेर यांची नावे चर्चेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांची नावे अद्याप गुलदस्त्यात आहेत. गावचा विकास या मुद्यावर निवडणुका होणार असून गावातील पाणीपुरवठा योजना, दिवाबत्ती, सोयी सुविधा, अंतर्गत रस्ते आदी विषय सर्वच पक्षांच्या पटलावर राहतील. सध्या पंचायतीत शेकाप राष्ट्रवादी आघाडीचा सरपंच असून शिवसेनेचा उपसरपंच आहे. शेकाप राष्ट्रवादी सोबत शिवसेना विद्यमान पंचायतीत सत्ताधारी असल्याने आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा प्रत्येक पक्ष स्वत:ची भूमिका मतदारांसमोर ठेवतील. शेकाप राष्ट्रवादी आघाडी, शिवसेना, भाजपा, काँग्रेस सोबत ग्रामविकास आघाडी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता असल्याने निवडणूक चुरशीची होईल असे राजकीय विश्लेषकांचेमत आहे.माणगाव तालुक्यात १९ग्रामपंचायतींच्या निवडणुकालोकमत न्यूज नेटवर्कमाणगाव : राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील ७ हजार ५७६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर केल्या असून या निवडणुका दोन टप्प्यांत होणार आहेत. रायगड जिल्ह्यातील २४२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार असून त्यापैकी माणगाव तालुक्यातील १९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका १४ आॅक्टोबर रोजी होणार आहेत. या निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपली जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे.माणगाव तालुक्यातील साई, गोरेगांव, करंबेळी, कुमशेत, न्हावे, पहेल, भागाड, मांगरु ल, मुठवली तर्फे तळे, डोंगरोली, शिरवली तर्फे निजामपूर,हरकोल, होडगांव, दहिवली कोंड, पळसप, चिंचवली, टोळखुर्द, नांदवी, कुंभे या १९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. यातील १२ ग्रामपंचायती स्त्री वर्गासाठी आरक्षित आहेत तर ७ ग्रामपंचायतीत सर्वसाधारण प्रवर्गातील सरपंच निवडण्यात येणार आहेत. यामध्ये करंबेळी (नामप्र स्त्री), चिंचवली (नामप्र स्त्री), कुंभे (नामप्र स्त्री), नांदवी (नामप्र स्त्री), तर भागाड व पहेळ, ग्रामपंचायत नामप्र खुल्या जागेसाठी आरक्षित आहेत. शिरवली तर्फे निजामपूर व होडगांव या ग्रामपंचायती अ.ज. स्त्रीसाठी राखीव आहेत. दहिवलीकोंड, डोंगरोली, कुमशेत, न्हावे, पळसप, मुठवली तर्फे तळे या सर्वसाधारण स्त्री प्रवर्गासाठी राखीव असून गोरेगांव, हरकोल, साई, मांगरु ळ व टोळखुर्द या ग्रामपंचायती सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी राखीव आहेत. या निवडणुकांत सरपंच पदासाठी तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतीतून जोरदार मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. सरपंच पदाचे उमेदवार असलेली व्यक्ती १ जानेवारी १९९५ रोजी किंवा त्यानंतर जन्मलेली असल्यास तो उमेदवार किमान ७ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.मुरूडमध्येही मोर्चेबांधणीला सुरु वातलोकमत न्यूज नेटवर्कआगरदांडा : मुरु ड तालुक्यातील काकळघर, तेलवडे, कोर्लई, वेळास्ते, वावडुंगी या ग्रामपंचायत हद्दीत निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. अवघ्या एका महिन्यावर ही निवडणूक येऊन ठेपली असल्याने इच्छुक उमेदवारासंह सर्वच पक्षांची उमेदवारांच्या बाबतीत दमछाक होताना दिसत आहे. ग्रामपंचायतीवर आपलाच झेंडा फडकावा यासाठी सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. प्रत्येक तालुकास्तरावरील तसेच ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांबरोबर गुप्त चर्चा बैठका झाल्या आहेत. त्यामध्ये प्रत्येक स्थानिक कार्यकर्त्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. प्रत्येक गावात नाक्या नाक्यावर गावच्या निवडणुकीवर तासन्तास चर्चा होताना दिसत आहेत. सरपंच पद हे थेट जनतेतून निवडून द्यावयाचे असल्याने ग्रामपंचायतीमधील स्पर्धकांमध्ये वाढ झाली आहे. मुरु ड -तेलवडे, कोर्लेई ग्रामपंचायतींवर सध्या शिवसेनेचे वर्चस्व आहे तर मुरु ड -वावडुंगी, वेळास्ते, काकळघर या ग्रामपंचायतीवर शेतकरी कामगार पक्षाचे वर्चस्व आहे. आता थेट सरपंच निवडणूक असल्याने यावेळी या पंचायतीवर कोणाचा झेंडा फडकणार यावर साºयांचे लक्ष लागून असणार आहे.