शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

सायबर गुन्ह्यांची उकल करण्यात पोलीस अपयशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 00:36 IST

सध्या स्मार्टफोन व इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ झाली.

- गिरीश गोरेगावकर माणगाव : सध्या स्मार्टफोन व इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ झाली. मात्र, गुन्हे उघडकीस आणण्यास पोलिसांना यश आलेले नाही. किंबहुना गुन्ह्यातील आरोपी मोकाटच आहेत. रायगडमधील २०१८ मध्ये घडलेल्या ५३ गुन्ह्यांतील १२ गुन्ह्यांची उकल होऊन ४१ गुन्हे अजून उघडकीस आले नाहीत. यामुळे पोलीस यंत्रणा सायबर गुन्ह्याची उकल करण्यात अपयशी ठरले आहेत.एटीएम खात्यातून पैसे लंपास करणे, लॉटरी लागल्याच्या आमिषाने फसवणूक, क्रे डिट कार्डचा सांकेतिक शब्द चोरून त्याद्वारे खरेदी करणे, फेसबुकवर बदनामी करणे किंवा अश्लील मजकूर टाकणे अशा अनेकविध तक्र ारी रायगड पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेकडे नागरिकांकडून केल्या जात आहेत. डिजिटल इंडिया संकल्पनेतून सुरू झालेले कॅशलेस व्यवहार आणि सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आॅनलाइन गुन्हे वाढू लागले आहेत. ओळख लपवून इंटरनेटवर गंभीर गुन्हे सहज करता येतात. एटीएम स्कीमिंग, आॅनलाइन आर्थिक फसवणुकीचे गुन्हे अशा गुन्ह्यांचा तपास करणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. मागील तीन वर्षांतील जिल्ह्यातील सायबर गुन्ह्यांची संख्या पाहता फक्त २२ टक्के गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. उर्वरित गुन्ह्यांतील आरोपी अद्यापही मोकाट आहेत.बँकेच्या आर्थिक गैरव्यवहारातील आरोपी हे परराज्यातील असल्याने त्यांना पकडण्यासाठी उशीर होतो. बऱ्याचशा बाबी या तांत्रिक असल्याने त्याची तपासणी व्हायला वेळ लागतो. मात्र, जिल्ह्यात गुन्हे डिटेक्शनचे प्रमाण चांगले असल्याची माहिती पोलीस जिल्हा अधीक्षक अनिल पारसकर यांनी‘लोकमत’ला बोलताना दिली.।या गुन्ह्याची उकल करण्यास उशीर होण्याचे कारण गुन्हा तपासात जे सर्व्हर असतात ते परदेशी असतात, तेथून माहिती मागविताना उशीर होतो. तसेच पूर्वी सीमकार्ड बनावट नावाने विकली जात होती, ती आता बनावट सीम कार्ड विक्र ी बंद झाली आहे. २०१६ साली सायबर सेल लॅब चालू झाली आहे. याबाबत पोलिसांची ट्रेनिंग पूर्ण झाली आहे. त्यामुळे या गुन्ह्याची उकल भविष्यात लवकर होईल.- अनिल पारसकर,जिल्हा पोलीस अधीक्षक,अलिबागनागरिकांनीच जागरूक व्हावेरायगड पोलीस दलातील सायबर सेलचे पोलीस निरीक्षक एन. एम. गवारे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, इंटरनेटद्वारे आर्थिक व्यवहारात दक्षता बाळगावी. मोबाइलवर आलेल्या कोणत्याही लिंकवर क्लीक करू नये, जाणकारांकडून आर्थिक व्यवहार माहीत करून घ्यावे. बँक अधिकाºयांनी देखील नागरिकांना बँकिंग व्यवहाराची माहिती द्यावी.