शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

पोलादपूर-कशेडी बोगदा लवकरच; २५ किमीसाठी पर्यायी मार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 02:25 IST

- सिकंदर अनवारेदासगाव : मुंबई-गोवा महामार्गावर इंदापूर ते कशेडीपर्यंत दुसऱ्या टप्प्याचे चौपदरीकरणाचे काम प्रगतिपथावर आहे. या मार्गावर पोलादपूर ते कशेडी बोगद्याचे काम लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. रिलायन्स कंपनीकडून बोगद्याचे काम करण्यात येणार असल्याची माहिती महामार्ग विभागाकडून देण्यात आली आहे.मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम वेगात सुरू आहे. पनवेल ते ...

- सिकंदर अनवारेदासगाव : मुंबई-गोवा महामार्गावर इंदापूर ते कशेडीपर्यंत दुसऱ्या टप्प्याचे चौपदरीकरणाचे काम प्रगतिपथावर आहे. या मार्गावर पोलादपूर ते कशेडी बोगद्याचे काम लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. रिलायन्स कंपनीकडून बोगद्याचे काम करण्यात येणार असल्याची माहिती महामार्ग विभागाकडून देण्यात आली आहे.मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम वेगात सुरू आहे. पनवेल ते इंदापूर हे काम रखडलेले असले तरी इंदापूर ते कशेडी हे दुसºया टप्प्याचे काम जोमाने सुरू आहे. हे कामदेखील एल अ‍ॅण्ड टी आणि महिंद्रा कंपनीने घेतले असल्याने काम दर्जेदार होईल, असा स्थानिकांना विश्वास आहे.पोलादपूरजवळ भोगाव गावाजवळ बोगदा तयार करण्यात येत आहे. साधारण ११ किमीचा हा बोगदा असून, १६ मीटर रुंद आणि ११ मीटर उंचीचा बोगदा २०२०पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.मुंबई - गोवा महामार्गावर पोलादपूर ते कशेडी हे अंतर साधारण १४ किमी असून, हे अंतर घाट मार्गाचे आहे. घाटात असलेल्या वळणांमुळे या मार्गावर कायम अपघात होत असतात; शिवाय वेळ आणि इंधनही खर्च होत आहे.घाट रस्त्यात धामनदिवी गावाजवळ रस्ता खचलेला आहे. यासाठी अनेक उपाय करूनही हा रस्ता दरवर्षी खचतोच. यामुळे पावसाळ्यात अनेकदा हा मार्ग बंद पडतो. यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत असतात. याला पर्याय म्हणून इंदापूर ते कशेडी यादरम्यान सुरू असलेल्या चौपदरीकरणाच्या कामात पोलादपूरजवळ भोगाव गावाजवळ एका बोगद्याचे काम केले जाणार आहे. यामुळे अंतर आणि इंधन बचत होणार आहे. घाट रस्त्याचे अंतर सुमारे १४ किमी असले तरी उंच घाट असल्याकारणाने वेळ आणि इंधन खर्च होतो. मात्र हा बोगदा झाल्यास हे अंतर ४ किमीने कमी होऊन बोगद्यातील अंतर जवळपास ११ किमी होणार आहे. यामध्ये तीन पदरी दोन बोगदे असून, एका जाणारा आणि एक येणाºया वाहनांसाठी असणार आहे. या बोगद्यात आपत्कालीन सुरक्षा व्यवस्था केली जाणार आहे.२५ किमीसाठी पर्यायी मार्ग- महामार्ग विभागाने बोगद्याच्या कामासाठी ५०२ कोटींची निविदा काढली होती. मात्र रिलायन्स कंपनीने हे काम ४४३ कोटींना घेतले आहे, अशी माहिती महामार्ग विभागाच्या महाड कार्यालयाकडून मिळाली आहे. लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे. कोकणात जाणाºया चाकरमान्यांचा प्रवासातील त्रास या मार्गामुळे कमी होणार आहे.- इंदापूर ते कशेडी चौपदरीकरणाबरोबरच रत्नागिरी विभागात कशेडी घाट समाप्तीनंतर होणारे महामार्गाचे काम वेगाने सुरू आहे. पोलादपूर ते कशेडी यादरम्यानचे किमान २५ किमीचे अंतर कमी करण्यासाठी पर्यायी मार्ग म्हणून कशेडी बोगदा तयार केला जाणार आहे. मात्र दोन्ही भागांचे काम पूर्ण झाले तरी जोपर्यंत बोगदा पूर्ण होत नाही तोपर्यंत हा मार्ग पूर्वीप्रमाणेच अपूर्ण राहणार आहे. मात्र रिलायन्स कंपनीने या बोगद्याचे काम घेतल्याने हे काम लवकर पूर्ण होऊन दोन्ही जिल्हे कमी अंतरात जोडले जाणार आहेत.

टॅग्स :Raigadरायगड