शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

पोलादपूर-कशेडी बोगदा लवकरच; २५ किमीसाठी पर्यायी मार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 02:25 IST

- सिकंदर अनवारेदासगाव : मुंबई-गोवा महामार्गावर इंदापूर ते कशेडीपर्यंत दुसऱ्या टप्प्याचे चौपदरीकरणाचे काम प्रगतिपथावर आहे. या मार्गावर पोलादपूर ते कशेडी बोगद्याचे काम लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. रिलायन्स कंपनीकडून बोगद्याचे काम करण्यात येणार असल्याची माहिती महामार्ग विभागाकडून देण्यात आली आहे.मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम वेगात सुरू आहे. पनवेल ते ...

- सिकंदर अनवारेदासगाव : मुंबई-गोवा महामार्गावर इंदापूर ते कशेडीपर्यंत दुसऱ्या टप्प्याचे चौपदरीकरणाचे काम प्रगतिपथावर आहे. या मार्गावर पोलादपूर ते कशेडी बोगद्याचे काम लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. रिलायन्स कंपनीकडून बोगद्याचे काम करण्यात येणार असल्याची माहिती महामार्ग विभागाकडून देण्यात आली आहे.मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम वेगात सुरू आहे. पनवेल ते इंदापूर हे काम रखडलेले असले तरी इंदापूर ते कशेडी हे दुसºया टप्प्याचे काम जोमाने सुरू आहे. हे कामदेखील एल अ‍ॅण्ड टी आणि महिंद्रा कंपनीने घेतले असल्याने काम दर्जेदार होईल, असा स्थानिकांना विश्वास आहे.पोलादपूरजवळ भोगाव गावाजवळ बोगदा तयार करण्यात येत आहे. साधारण ११ किमीचा हा बोगदा असून, १६ मीटर रुंद आणि ११ मीटर उंचीचा बोगदा २०२०पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.मुंबई - गोवा महामार्गावर पोलादपूर ते कशेडी हे अंतर साधारण १४ किमी असून, हे अंतर घाट मार्गाचे आहे. घाटात असलेल्या वळणांमुळे या मार्गावर कायम अपघात होत असतात; शिवाय वेळ आणि इंधनही खर्च होत आहे.घाट रस्त्यात धामनदिवी गावाजवळ रस्ता खचलेला आहे. यासाठी अनेक उपाय करूनही हा रस्ता दरवर्षी खचतोच. यामुळे पावसाळ्यात अनेकदा हा मार्ग बंद पडतो. यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत असतात. याला पर्याय म्हणून इंदापूर ते कशेडी यादरम्यान सुरू असलेल्या चौपदरीकरणाच्या कामात पोलादपूरजवळ भोगाव गावाजवळ एका बोगद्याचे काम केले जाणार आहे. यामुळे अंतर आणि इंधन बचत होणार आहे. घाट रस्त्याचे अंतर सुमारे १४ किमी असले तरी उंच घाट असल्याकारणाने वेळ आणि इंधन खर्च होतो. मात्र हा बोगदा झाल्यास हे अंतर ४ किमीने कमी होऊन बोगद्यातील अंतर जवळपास ११ किमी होणार आहे. यामध्ये तीन पदरी दोन बोगदे असून, एका जाणारा आणि एक येणाºया वाहनांसाठी असणार आहे. या बोगद्यात आपत्कालीन सुरक्षा व्यवस्था केली जाणार आहे.२५ किमीसाठी पर्यायी मार्ग- महामार्ग विभागाने बोगद्याच्या कामासाठी ५०२ कोटींची निविदा काढली होती. मात्र रिलायन्स कंपनीने हे काम ४४३ कोटींना घेतले आहे, अशी माहिती महामार्ग विभागाच्या महाड कार्यालयाकडून मिळाली आहे. लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे. कोकणात जाणाºया चाकरमान्यांचा प्रवासातील त्रास या मार्गामुळे कमी होणार आहे.- इंदापूर ते कशेडी चौपदरीकरणाबरोबरच रत्नागिरी विभागात कशेडी घाट समाप्तीनंतर होणारे महामार्गाचे काम वेगाने सुरू आहे. पोलादपूर ते कशेडी यादरम्यानचे किमान २५ किमीचे अंतर कमी करण्यासाठी पर्यायी मार्ग म्हणून कशेडी बोगदा तयार केला जाणार आहे. मात्र दोन्ही भागांचे काम पूर्ण झाले तरी जोपर्यंत बोगदा पूर्ण होत नाही तोपर्यंत हा मार्ग पूर्वीप्रमाणेच अपूर्ण राहणार आहे. मात्र रिलायन्स कंपनीने या बोगद्याचे काम घेतल्याने हे काम लवकर पूर्ण होऊन दोन्ही जिल्हे कमी अंतरात जोडले जाणार आहेत.

टॅग्स :Raigadरायगड