शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारताला स्वसंरक्षणाचा अधिकार, दहशतवाद्यांना...”; ‘ऑपरेशन सिंदूर’चे इस्रायलकडून खुले समर्थन
2
“भारताने केलेली लष्करी कारवाई खेदजनक, दहशतवादाला विरोध पण...”; ‘ऑपरेशन सिंदूर’वर चीनचे भाष्य
3
Operation Sindoor : पाकिस्तानवर हवाई हल्ला करताच पुण्यातून लढाऊ विमाने झेपावली; मुंबईपर्यंत दिले संरक्षण...
4
Operation Sindoor Live Updates: भारताचा पाकिस्तानवर स्ट्राईक; थोड्याच वेळात पत्रकार परिषद
5
ज्येष्ठ रंगकर्मी माधव वझे यांचं निधन; 'श्यामची आई', '३ इडियट्स' सिनेमांमध्ये केलं होतं काम
6
Stock Market Today: आधी घसरण मग तेजी, Sensex १०० अंकांनी वधारला; ऑटो-बँकिंग स्टॉक्समध्ये मोठी खरेदी
7
“आगे बढ़ते रहो, ऐसाही बदला लेते रहो”; ‘ऑपरेशन सिंदूर’वर शहीद नरवाल कुटुंबाने व्यक्त केला आनंद
8
"आम्ही मुस्लिमांना घर देत नाही", अली गोनी अन् जास्मीनला मुंबईत घर शोधताना आल्या अडचणी
9
आता तरी एकता दाखवा; काँग्रेसच्या प्रदेश पदाधिकाऱ्याने एअर स्ट्राईकला म्हटले 'टुच्चेपणा'
10
Operation Sindoor: 'जय हिंद', राहुल गांधींची पाकिस्तानातील एअर स्ट्राईकनंतर पहिली पोस्ट; काय म्हणाले? 
11
Operation Sindoor: जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
12
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय सैन्य अलर्ट; 'कारगिलचा हिरो' पुन्हा सीमेवर सज्ज
13
Operation Sindoor : "जय हिंद की सेना...!", 'ऑपरेशन सिंदूर'वर रितेश देशमुखचं रात्री ३ वाजून २ मिनिटांनी ट्विट
14
Operation Sindoor : "अब मिट्टी में मिल जाओगे...", भारतीय सैन्याच्या 'ऑपरेशन सिंदूर'चं देवोलिनानं केलं कौतुक
15
'ऑपरेशन सिंदूर'अंतर्गत पाकमधील 'या' ९ ठिकाणी एअर स्ट्राईक; २६/११, पुलवामाशी होता संबंध
16
"पाकपुरस्कृत दहशतवाद संपूर्ण संपेपर्यंत अशाच पद्धतीनं कारवाई होणार, हा संदेश देण्यात आपण यशस्वी"
17
Operation Sindoor: एअर स्ट्राईकनंतर भारताची पहिली प्रतिक्रिया; पाकिस्तानशी लढणे आमचा हेतू नाही, पण...
18
Operation Sindoor : भारतीय सैन्याचं 'ऑपरेशन सिंदूर'; पाकिस्तानच्या हद्दीत १०० किमी आत घुसून मारलं, ९ ठिकाणे कोणती?
19
Operation Sindoor: "आज तोच विश्वास सार्थ ठरवत, भारतीय हवाई दलाने...", शरद पवारांनी लष्करांचं केलं अभिनंदन
20
Mumbai Rains: ढगांच्या गडगडाटासह कांदिवली, बोरिवली भागात मुसळधार पाऊस; चाकरमान्यांची तारांबळ

पोलादपूरची ४६ गावे, १२३ वाड्यांमध्ये टंचाई?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 00:25 IST

कोकण हा जलसमृद्ध परिसर असला, तरी गेल्या काही वर्षांत कोकणातही जानेवारीनंतर टँकर फिरतात हे वास्तव आहे.

पोलादपूर : कोकण हा जलसमृद्ध परिसर असला, तरी गेल्या काही वर्षांत कोकणातही जानेवारीनंतर टँकर फिरतात हे वास्तव आहे. अगदी यंदाही नुकतेच जे टंचाईग्रस्त तालुके जाहीर झालेत, त्यात रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्याचा समावेश आहे. तालुक्याचे जलवैभव टिकवून ठेवण्यासाठी तातडीने प्रयत्न करण्याची गरज आहे. यंदा पोलादपूर तालुक्यात १ एप्रिल २०२० ते ३० जून २०२० या कालावधीत पाणीटंचाई कृती आराखड्यामध्ये ४६ गावे आणि १२३ वाड्यांचा समावेश करण्यात आला आहे.गत वर्षी एप्रिल ते जूनपर्यंत टंचाई निवारण कृती आराखड्यात २३ गावे आणि १६३ वाड्यांचा समावेश होता. मात्र, यंदा टंचाई आराखड्यात गावांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे. पोलादपूर तालुक्यात ग्रामीण भागात महिला आणि ग्रामस्थांचे पाणीटंचाईमुळे अतोनात हाल होणार आहेत. यंदाच्या पाणीटंचाई कृती आराखड्यात टँकर आणि बैलगाडीद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी ४६ गावे आणि १२३ वाड्यांची मागणी निश्चित करण्यात आली असून, १६९ ठिकाणी उपाययोजना करण्यासाठी ४२.२५ लाखांची तरतूद टंचाई आराखड्यात करण्यात आली आहे. दरम्यान, उद्भवणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी तालुका प्रशासन सज्ज असल्याचे पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले आहे.गेल्या वर्षी २३ गावे, ११८ वाड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याचा भीषण दुष्काळ पडला होता. यात दुर्गम, अतिदुर्गम भागातील गावपाड्यांची संख्या अधिक असून, महिलांना हंडाभर पाण्यासाठी रणरणत्या उन्हात रानोमाळ भटकावे लागत आहे.मागील दहा वर्षांत गाववाड्यांवर विंधन विहिरी, विहिरींची दुरुस्ती, साठवण टाकी, नळ पाणीपुरवठा योजना, छोटे तलाव आदी विकासकामांवर ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद रायगड यांच्यामार्फत कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. मात्र, पाणी प्रश्न सुटला नाही.।पाणीटंचाईने त्रस्त गावेटंचाईग्रस्त ४६ गावांमध्ये चांभारगणी बु. व खुर्द, किनेश्वर, निवे, ताम्हाणे, आड, कुंभळवणे, कुडपण खुर्द व बुद्रुक, तुटवली, क्षेत्रफळ, कोतवाल खुर्द व बु., तामसडे, बोरघर, काटेतळी, वाकण गावठाण, पितळवाडी, नानेघोळ, ओंबळी गावठाण, गोवले, खोपड, बोरज, कापडे खुर्द, कातळी बंगला, महाळुंगे, महालगुर, गोलदारा आदीचा समावेश आहे. तर तालुक्यातील १२३ वाड्यांमधील २० हजार ५४ लोकसंख्येला भासणारी तीव्र स्वरूपाची पाणीटंचाई निवारण करण्याचे आव्हान उभे आहे.