शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

पोलादपूरची ४६ गावे, १२३ वाड्यांमध्ये टंचाई?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 00:25 IST

कोकण हा जलसमृद्ध परिसर असला, तरी गेल्या काही वर्षांत कोकणातही जानेवारीनंतर टँकर फिरतात हे वास्तव आहे.

पोलादपूर : कोकण हा जलसमृद्ध परिसर असला, तरी गेल्या काही वर्षांत कोकणातही जानेवारीनंतर टँकर फिरतात हे वास्तव आहे. अगदी यंदाही नुकतेच जे टंचाईग्रस्त तालुके जाहीर झालेत, त्यात रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्याचा समावेश आहे. तालुक्याचे जलवैभव टिकवून ठेवण्यासाठी तातडीने प्रयत्न करण्याची गरज आहे. यंदा पोलादपूर तालुक्यात १ एप्रिल २०२० ते ३० जून २०२० या कालावधीत पाणीटंचाई कृती आराखड्यामध्ये ४६ गावे आणि १२३ वाड्यांचा समावेश करण्यात आला आहे.गत वर्षी एप्रिल ते जूनपर्यंत टंचाई निवारण कृती आराखड्यात २३ गावे आणि १६३ वाड्यांचा समावेश होता. मात्र, यंदा टंचाई आराखड्यात गावांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे. पोलादपूर तालुक्यात ग्रामीण भागात महिला आणि ग्रामस्थांचे पाणीटंचाईमुळे अतोनात हाल होणार आहेत. यंदाच्या पाणीटंचाई कृती आराखड्यात टँकर आणि बैलगाडीद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी ४६ गावे आणि १२३ वाड्यांची मागणी निश्चित करण्यात आली असून, १६९ ठिकाणी उपाययोजना करण्यासाठी ४२.२५ लाखांची तरतूद टंचाई आराखड्यात करण्यात आली आहे. दरम्यान, उद्भवणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी तालुका प्रशासन सज्ज असल्याचे पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले आहे.गेल्या वर्षी २३ गावे, ११८ वाड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याचा भीषण दुष्काळ पडला होता. यात दुर्गम, अतिदुर्गम भागातील गावपाड्यांची संख्या अधिक असून, महिलांना हंडाभर पाण्यासाठी रणरणत्या उन्हात रानोमाळ भटकावे लागत आहे.मागील दहा वर्षांत गाववाड्यांवर विंधन विहिरी, विहिरींची दुरुस्ती, साठवण टाकी, नळ पाणीपुरवठा योजना, छोटे तलाव आदी विकासकामांवर ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद रायगड यांच्यामार्फत कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. मात्र, पाणी प्रश्न सुटला नाही.।पाणीटंचाईने त्रस्त गावेटंचाईग्रस्त ४६ गावांमध्ये चांभारगणी बु. व खुर्द, किनेश्वर, निवे, ताम्हाणे, आड, कुंभळवणे, कुडपण खुर्द व बुद्रुक, तुटवली, क्षेत्रफळ, कोतवाल खुर्द व बु., तामसडे, बोरघर, काटेतळी, वाकण गावठाण, पितळवाडी, नानेघोळ, ओंबळी गावठाण, गोवले, खोपड, बोरज, कापडे खुर्द, कातळी बंगला, महाळुंगे, महालगुर, गोलदारा आदीचा समावेश आहे. तर तालुक्यातील १२३ वाड्यांमधील २० हजार ५४ लोकसंख्येला भासणारी तीव्र स्वरूपाची पाणीटंचाई निवारण करण्याचे आव्हान उभे आहे.