शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

पोलादपूरची ४६ गावे, १२३ वाड्यांमध्ये टंचाई?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 00:25 IST

कोकण हा जलसमृद्ध परिसर असला, तरी गेल्या काही वर्षांत कोकणातही जानेवारीनंतर टँकर फिरतात हे वास्तव आहे.

पोलादपूर : कोकण हा जलसमृद्ध परिसर असला, तरी गेल्या काही वर्षांत कोकणातही जानेवारीनंतर टँकर फिरतात हे वास्तव आहे. अगदी यंदाही नुकतेच जे टंचाईग्रस्त तालुके जाहीर झालेत, त्यात रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्याचा समावेश आहे. तालुक्याचे जलवैभव टिकवून ठेवण्यासाठी तातडीने प्रयत्न करण्याची गरज आहे. यंदा पोलादपूर तालुक्यात १ एप्रिल २०२० ते ३० जून २०२० या कालावधीत पाणीटंचाई कृती आराखड्यामध्ये ४६ गावे आणि १२३ वाड्यांचा समावेश करण्यात आला आहे.गत वर्षी एप्रिल ते जूनपर्यंत टंचाई निवारण कृती आराखड्यात २३ गावे आणि १६३ वाड्यांचा समावेश होता. मात्र, यंदा टंचाई आराखड्यात गावांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे. पोलादपूर तालुक्यात ग्रामीण भागात महिला आणि ग्रामस्थांचे पाणीटंचाईमुळे अतोनात हाल होणार आहेत. यंदाच्या पाणीटंचाई कृती आराखड्यात टँकर आणि बैलगाडीद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी ४६ गावे आणि १२३ वाड्यांची मागणी निश्चित करण्यात आली असून, १६९ ठिकाणी उपाययोजना करण्यासाठी ४२.२५ लाखांची तरतूद टंचाई आराखड्यात करण्यात आली आहे. दरम्यान, उद्भवणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी तालुका प्रशासन सज्ज असल्याचे पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले आहे.गेल्या वर्षी २३ गावे, ११८ वाड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याचा भीषण दुष्काळ पडला होता. यात दुर्गम, अतिदुर्गम भागातील गावपाड्यांची संख्या अधिक असून, महिलांना हंडाभर पाण्यासाठी रणरणत्या उन्हात रानोमाळ भटकावे लागत आहे.मागील दहा वर्षांत गाववाड्यांवर विंधन विहिरी, विहिरींची दुरुस्ती, साठवण टाकी, नळ पाणीपुरवठा योजना, छोटे तलाव आदी विकासकामांवर ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद रायगड यांच्यामार्फत कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. मात्र, पाणी प्रश्न सुटला नाही.।पाणीटंचाईने त्रस्त गावेटंचाईग्रस्त ४६ गावांमध्ये चांभारगणी बु. व खुर्द, किनेश्वर, निवे, ताम्हाणे, आड, कुंभळवणे, कुडपण खुर्द व बुद्रुक, तुटवली, क्षेत्रफळ, कोतवाल खुर्द व बु., तामसडे, बोरघर, काटेतळी, वाकण गावठाण, पितळवाडी, नानेघोळ, ओंबळी गावठाण, गोवले, खोपड, बोरज, कापडे खुर्द, कातळी बंगला, महाळुंगे, महालगुर, गोलदारा आदीचा समावेश आहे. तर तालुक्यातील १२३ वाड्यांमधील २० हजार ५४ लोकसंख्येला भासणारी तीव्र स्वरूपाची पाणीटंचाई निवारण करण्याचे आव्हान उभे आहे.