शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान-सौदी अरेबियात डील, भारताची पहिली प्रतिक्रिया; "आम्ही देशहिताचं रक्षण करण्यासाठी..."
2
कर्नाटकमध्ये मतचोरीचा डाव काँग्रेसवरच उलटला, आमदार संशायाच्या भोवऱ्यात, हायकोर्टाने निकाल रद्द केला
3
दीड कोटींच्या जमिनीवर सगळ्यांचा डोळा; सावत्र भावांनी कट रचला, ८ लाख दिले तरी प्लॅन कसा फसला?
4
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
5
फक्त ५००० रुपयांच्या कर्जातून उभारले १३,५०० कोटींचे साम्राज्य! तुमच्या घरातही वापरली जाते 'ही' वस्तू
6
BAN vs AFG Live Streaming : अफगाणिस्तानसमोर मोठं चॅलेंज! लढत श्रीलंकेविरुद्ध अन् चितपट करायचंय बांगलादेशला! जाणून घ्या समीकरण
7
महामार्गावर अचानक भूस्खलन, पळाले म्हणून थोडक्यात वाचले भाजप खासदार; व्हिडीओ केला शेअर
8
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
9
पहिल्याच प्रयत्नात नीरज पोहोचला अंतिम फेरीत; जागतिक अजिंक्यपद : सचिन यादवही ठरला पात्र
10
तासाभराचं नाट्य, बहिष्काराची धमकी, ६ ईमेल आणि..., पाकिस्तान असा आला वठणीवर, त्या बैठकीत काय घडलं?
11
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
12
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
13
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
14
Share Market: US Fed च्या निर्णयानंतर देशांतर्गत शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स ३०० अंकांनी वधारला; 'या' शेअर्समध्ये तेजी
15
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!
16
१२ वर्षांच्या संसाराची काडीमोड! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट, बायकोशी असलेलं नातं मोडलं
17
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
18
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
19
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
20
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर

उधाणाने १५ ठिकाणी फुटले संरक्षक बंधारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 06:55 IST

खाडी किनारच्या गावांलगतचे संरक्षक बंधारे फुटीची समस्या सातत्याने गंभीर होत असताना, शासकीय यंत्रणा मात्र सुस्तावलेल्या अवस्थेतच आहे.

- जयंत धुळपअलिबाग : तालुक्यातील खाडी किनारच्या गावांलगतचे संरक्षक बंधारे फुटीची समस्या सातत्याने गंभीर होत असताना, शासकीय यंत्रणा मात्र सुस्तावलेल्या अवस्थेतच आहे. बुधवारी रात्री आलेल्या उधाणाच्या भरतीने अलिबाग तालुक्यातील धेरंड- शहापूर गावांच्या पूर्वेकडील समुद्र भरती संरक्षक बंधाºयांना एकूण १५ ठिकाणी मोठी भगदाडे (खांडी) पडून समुद्राचे खारे पाणी या दोन्ही गावांच्या हद्दीतील तब्बल एक हजार एकर भातशेती क्षेत्रात घुसून नुकसान झाले असल्याची माहिती मोठे शहापूर गावातील बाधित शेतकरी आत्माराम गोमा पाटील यांनी दिली आहे.मोठे शहापूर जवळच्या भंगारकोठा संरक्षक बंधाºयाच्या दुरुस्तीची कामे यापूर्वी तीन वेळा नऊ गाव शेतकरी संघटनेच्या माध्यमातून तर पाच वेळा गावकीच्या माध्यमातून श्रमदानातून करण्यात आली होती. मात्र, शासनाच्या खारलॅन्ड विभागाने या बंधाºयांची कधीही दुरुस्ती केली नाही. अखेर बुधवारी रात्री या बंधाºयास तीन ठिकाणी मोठी भगदाडे पडून खारे पाणी शेतजमिनीत घुसले असल्याचे आत्माराम पाटील यांनी सांगितले.शहापूर गावाच्या पूर्वेला असलेल्या संरक्षक बंधाºयास एकूण १२ ठिकाणी मोठी भगदाडे पडली आणि खारे पाणी भातशेतीत घुसले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी अलिबागचे प्रांताधिकारी सर्जेराव सोनावणे त्यांच्या पथकासह कांदळवनांची पाहणी करण्याकरिता येथे आले असता, येथील कमकुवत झालेले आणि फु टलेले बांध त्यांनी स्वत: पाहिले होते. फुटलेल्या बांधामुळे त्यांना पलीकच्या बाजूला जाताही आले नव्हते. याबाबत ते सरकारी अहवाल तत्काळ देतील आणि बांधांची दुरुस्ती होईल, अशी अपेक्षा आम्हा ग्रामस्थांना होती; परंतु ते घडले नाही. अखेर समुद्राच्या उधाणाने हा बांध फुटला आणि अखेर अनर्थ घडल्याची संतप्त प्रतिक्रिया पाटील यांनी दिली आहे.पेण तालुक्यात धरमतर खाडी किनारच्या फुटलेल्या बांधाच्या दुरुस्तीकरिता पेणच्या प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड यांनी अनेक बैठका घेऊन बांध बांधण्याच्या कामाला शेतकरीहित विचारात घेऊन प्राधान्य दिले आहे. मात्र, अलिबाग तालुक्यात अशी परिस्थिती दिसून येत नाही. परिणामी, ही दोन्ही गावे उधाणाच्या भरतीने उद्ध्वस्त करून मोकळी झालेली जागा कंपनीला देण्याचे कटकारस्थान येथे सुरू असल्याचा दाट संशय असल्याचा दावा आत्माराम गोमा पाटील यांनी केला आहे.संयुक्त बैठकही केली रद्दअलिबाग तालुक्यातील याच शहापूर-धेरंड या गांवांच्या हद्दीतील संरक्षक खारबांध फुटीच्या गंभीर समस्येमध्ये लक्ष घालून गावातील मानवी वसाहतींना धोका पोहोचण्याअगोदर उपाययोजनेकरिता संयुक्त बैठकीचे आयोजन करावे, अन्यथा शेतकरी जनतेला एमआयडीसीच्या कार्यालयासमोर भातशेतीतला चिखल आणून टाकण्यावाचून कोणताही पर्याय समोर दिसत नाही, असा इशारा गेल्या १२ डिसेंबर २०१७ रोजी नवीन पनवेलमधील खांदा वसाहतीतील महाराष्टÑ औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) कार्यालयातील प्रादेशिक अधिकारी गोपीनाथ ठोंबरे यांना श्रमिकमुक्ती दलाने दिल्यावर, या विषयाबाबत निर्णय घेण्याकरिता गुरुवार, १ फेब्रुवारी रोजी ठोंबरे यांनी संयुक्त बैठकीचे आयोजन केले होते.मात्र बुधवारी रात्री उशिरा ही बैठक रद्द करण्यात येत असल्याचे प्रादेशिक अधिकारी गोपीनाथ ठोंबरे यांनी कळविल्याची माहिती श्रमिक मुक्ती दलाचे जिल्हा समन्वयक राजन भगत यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे. बैठकीत शेतकºयांना नेमके काय उत्तर द्यायचे आणि बंधाºयांची दुरुस्ती कशी करायची आणि झालेल्या नुकसानीची भरपाई कशी आणि कोणी द्यायची, या प्रश्नांवरून ही बैठकच रद्द करुन आजचे मरण उद्यावर ढकलण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थ शेतकºयांची आहे.

टॅग्स :Raigadरायगड