शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

उत्खननामुळे नांदगाव किनाऱ्याची दुर्दशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 00:16 IST

महसूल विभागाने कडक कार्यवाही करण्याची ग्रामस्थांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कमुरुड : तालुक्यातील  नांदगाव समुद्र किनारी महसूल खात्याचा वचक नसल्याने राजरोसपणे समुद्र किनाऱ्यावरील  वाळू उपसा करणाऱ्यांची चांदी झाली असून बकळ पैसा वाळू उत्खननाने कमावला जात आहे.वाळू उत्खननाने सातत्याने  होत राहिल्याने नांदगाव समुद्र किनारी मोठे मोठे खड्डे पडले आहेत. त्याचप्रमाणे समुद्रकिनारा विद्रूप झाला आहे.  वाळूच्या सततच्या उत्खननामुळे नांदगाव समुद्र किनाऱ्यावरील ५०० मीटर पेक्षा जास्त किनाऱ्याची धूप झाली असून जवळच असणाऱ्या नारळी सुपारीच्या बागांना मोठा धोका पोहाेचत आहे. ही वाळू नांदगाव किनाऱ्यावरून पहाटे ३ च्या सुमारास काढली जाते. मुरुड पोलिसांनी पहाटे गस्त वाढवून या वाळू चोरांना पकडून कडक शासन करावे अशी मागणी सुद्धा ग्रामस्थांकडून केली जात आहे. सततच्या वाळू उपशामुळे गणपती गौड येथील स्मशानभूमीचे अस्तित्व सुद्धा धोक्यात आले आहे. वाळू काढल्याने संरक्षक भिंती सुद्धा पडत आहेत. वाळूच्या अवैध उत्खननामुळे नागरिक  त्रस्त असून महसूल खात्याने कार्यवाही करण्याची मागणी होत आहे.  समुद्र किनाऱ्यावरील  वाळू ही  बांधकामासाठी वापरली जात असल्याने असंख्य लोक या वाळूचा उपयोग करीत असतात. त्यातच वाळू अगदी जवळ मिळत असल्याने वाळू उत्खनन राजरोसपणे करीत आहेत. समुद्र किनाऱ्यावरील वाळू काढल्याने काही ठिकाणचा भराव सुद्धा ढासळला आहे. ही वाळू बैलगाड्यांतून अथवा टेम्पोने वाहतूक केली जात आहे.सातत्याने समुद्रावरील वाळू काढल्याने काही ठिकाणच्या नारळ -सुपारीच्या बागायत जमिनीला सुद्धा धोका पोहचला आहे. महसूल खात्याने लक्ष देऊन वाळू उत्खनन रोखावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. याबाबत माजी सरपंच विद्याधर चोरघे यांनी नांदगाव समुद्र किनारी सातत्याने वाळू उपसा झाल्याने जागो जागी खड्डे पडले आहेत. गोविंद प्रधान यांच्या मालकीच्या बागायत जमिनीतील सुमारे शंभरच्यावर नारळाची झाडे पडली आहेत. तर गणेश चोरघे यांच्या बागायत जमिनीतील ३० पेक्षा जास्त नारळाची झाडे पडली आहेत. सततच्या वाळू उपशामुळे नांदगाव समुद्र किनारा खड्डेमय झाला आहे. महसूल खात्याने तातडीने लक्ष्य देऊन वाळू नेणाऱ्यांवर कठोर कार्यवाही करावी अशी मागणी केली आहे. असेच वाळू उत्खनन सुरु राहिले तर बागायत जमिनी नामशेष होणार आहेत. महसूल खात्याने सजग होऊन अशा लोकांवर कडक कार्यवाही करावी अशी मागणी यावेळी त्यांनी केली आहे.

वाळू चोरणाऱ्यांवर महसूल खात्याचे लक्ष असून आम्ही तपासणी पथक सुद्धा तैनात केले आहेत. आतापर्यंत काही लोकांना पकडून त्यांच्याकडून दंड सुद्धा वसूल करण्यात आलेला आहे. नांदगाव बाबतची समस्या निराकरण करण्यासाठी गस्त वाढवून लवकरच वाळू चोरणाऱ्यांवर कार्यवाही केली जाईल.- गमन गावित, तहसीलदार, मुरुड