शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी जागावाटपाचा तिढा कायम; मनसे नेते म्हणाले, “मातोश्रीवर जाऊन चर्चा केली, पण...”
2
एकीकडे शिंदेसेनेशी चर्चेची अंतिम फेरी अन् दुसरीकडे भाजपाची ‘नमो भारत, नमो ठाणे’ बॅनरबाजी
3
बांग्लादेशातील हिंसेची आग लंडनपर्यंत..; खालिस्तान समर्थक भारतीयांच्या आंदोलनात घुसले, तणावाचे वातावरण
4
ठाकरे बंधूंकडून मुंबईत शरद पवारांना १५ जागांचा प्रस्ताव? अपेक्षित प्रतिसाद नसल्याने कोंडी!
5
बांगलादेशात आता हिंदूंचा नवा आवाज! नवी पार्टी रिंगणात; ९१ जागांवर लढणार निवडणूक
6
सोलापूर हादरलं! इच्छुक तृतीयपंथी उमेदवाराची निर्घृण हत्या; ४० तोळे सोनं घेऊन तिघे फरार
7
Video - श्रीमंतीचा माज, खिडकीला लटकून स्टंटबाजी...; तरुणांची हुल्लडबाजी, लोकांच्या जीवाशी खेळ
8
प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या सूनेला खंडणीच्या आरोपाखाली अटक, पोलिसांनी रंगेहाथ पकडलं
9
नेत्यांच्या पायाशी बसणारा मुख्यमंत्री, पंतप्रधान बनला; काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्या पोस्टने खळबळ
10
इतिहास विसरू नका... तुमचा जन्म आमच्यामुळे
11
Dipu Chandra Das : "ते राक्षस बनले..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येचं प्रत्यक्षदर्शीने सांगितलं खळबळजनक 'सत्य'
12
मनसेला मुंबईत मोठा धक्का! प्रभारी, पदाधिकारी, शाखाध्यक्षांचा जय महाराष्ट्र; शिंदेसेनेत सामील
13
इस्त्रायलचा एक निर्णय आणि जगाचे दोन भाग! सोमालीलँडवरून आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी उलथापालथ
14
नांदेडमधील चौघांच्या मृत्यूचे गूढ उकलले; आई-वडिलांना संपवून मुलांची आत्महत्या 
15
बाजार सुस्त, पण SIP मस्त! दरमहा १०,००० रुपयांच्या एसआयपीने व्हाल कोट्यधीश; वाचा सोपं गणित
16
दोन पत्नींच्या कचाट्यात सापडला बेरोजगार पती! स्वतःच्याच मृत्यूचा रचला बनाव; १९ दिवसांनी दिल्लीत जे घडलं...
17
सत्तार म्हणाले, दानवेंनी आज पहिल्यांदा चांगले काम केले; दानवे म्हणाले, सत्तारांनी चांगले काम केल्याचे आठवत नाही!
18
साप्ताहिक राशीभविष्य: २०२६ची सुरुवात दमदार, नोकरी-गुंतवणुकीत लाभ; नफा-फायदा, भरघोस भरभराट!
19
पोटात ७ टूथब्रश अन् २ लोखंडी पाने! रिपोर्ट पाहून डॉक्टरही चक्रावले; जयपूरमध्ये तरुणावर थरारक शस्त्रक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

उत्खननामुळे नांदगाव किनाऱ्याची दुर्दशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 00:16 IST

महसूल विभागाने कडक कार्यवाही करण्याची ग्रामस्थांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कमुरुड : तालुक्यातील  नांदगाव समुद्र किनारी महसूल खात्याचा वचक नसल्याने राजरोसपणे समुद्र किनाऱ्यावरील  वाळू उपसा करणाऱ्यांची चांदी झाली असून बकळ पैसा वाळू उत्खननाने कमावला जात आहे.वाळू उत्खननाने सातत्याने  होत राहिल्याने नांदगाव समुद्र किनारी मोठे मोठे खड्डे पडले आहेत. त्याचप्रमाणे समुद्रकिनारा विद्रूप झाला आहे.  वाळूच्या सततच्या उत्खननामुळे नांदगाव समुद्र किनाऱ्यावरील ५०० मीटर पेक्षा जास्त किनाऱ्याची धूप झाली असून जवळच असणाऱ्या नारळी सुपारीच्या बागांना मोठा धोका पोहाेचत आहे. ही वाळू नांदगाव किनाऱ्यावरून पहाटे ३ च्या सुमारास काढली जाते. मुरुड पोलिसांनी पहाटे गस्त वाढवून या वाळू चोरांना पकडून कडक शासन करावे अशी मागणी सुद्धा ग्रामस्थांकडून केली जात आहे. सततच्या वाळू उपशामुळे गणपती गौड येथील स्मशानभूमीचे अस्तित्व सुद्धा धोक्यात आले आहे. वाळू काढल्याने संरक्षक भिंती सुद्धा पडत आहेत. वाळूच्या अवैध उत्खननामुळे नागरिक  त्रस्त असून महसूल खात्याने कार्यवाही करण्याची मागणी होत आहे.  समुद्र किनाऱ्यावरील  वाळू ही  बांधकामासाठी वापरली जात असल्याने असंख्य लोक या वाळूचा उपयोग करीत असतात. त्यातच वाळू अगदी जवळ मिळत असल्याने वाळू उत्खनन राजरोसपणे करीत आहेत. समुद्र किनाऱ्यावरील वाळू काढल्याने काही ठिकाणचा भराव सुद्धा ढासळला आहे. ही वाळू बैलगाड्यांतून अथवा टेम्पोने वाहतूक केली जात आहे.सातत्याने समुद्रावरील वाळू काढल्याने काही ठिकाणच्या नारळ -सुपारीच्या बागायत जमिनीला सुद्धा धोका पोहचला आहे. महसूल खात्याने लक्ष देऊन वाळू उत्खनन रोखावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. याबाबत माजी सरपंच विद्याधर चोरघे यांनी नांदगाव समुद्र किनारी सातत्याने वाळू उपसा झाल्याने जागो जागी खड्डे पडले आहेत. गोविंद प्रधान यांच्या मालकीच्या बागायत जमिनीतील सुमारे शंभरच्यावर नारळाची झाडे पडली आहेत. तर गणेश चोरघे यांच्या बागायत जमिनीतील ३० पेक्षा जास्त नारळाची झाडे पडली आहेत. सततच्या वाळू उपशामुळे नांदगाव समुद्र किनारा खड्डेमय झाला आहे. महसूल खात्याने तातडीने लक्ष्य देऊन वाळू नेणाऱ्यांवर कठोर कार्यवाही करावी अशी मागणी केली आहे. असेच वाळू उत्खनन सुरु राहिले तर बागायत जमिनी नामशेष होणार आहेत. महसूल खात्याने सजग होऊन अशा लोकांवर कडक कार्यवाही करावी अशी मागणी यावेळी त्यांनी केली आहे.

वाळू चोरणाऱ्यांवर महसूल खात्याचे लक्ष असून आम्ही तपासणी पथक सुद्धा तैनात केले आहेत. आतापर्यंत काही लोकांना पकडून त्यांच्याकडून दंड सुद्धा वसूल करण्यात आलेला आहे. नांदगाव बाबतची समस्या निराकरण करण्यासाठी गस्त वाढवून लवकरच वाळू चोरणाऱ्यांवर कार्यवाही केली जाईल.- गमन गावित, तहसीलदार, मुरुड