शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

टोळ-आंबेत राज्यमार्गाची दुर्दशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 02:31 IST

मुंबई-गोवा महामार्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याला जोडणारा सर्वात जवळचा मार्ग म्हणजे टोळ-आंबेत राज्यमार्ग. डोंगराळ भागातून जाणाºया या मार्गाची गेल्या काही दिवसांपासून दुरवस्था झाली आहे.

दासगाव : मुंबई-गोवा महामार्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याला जोडणारा सर्वात जवळचा मार्ग म्हणजे टोळ-आंबेत राज्यमार्ग. डोंगराळ भागातून जाणाºया या मार्गाची गेल्या काही दिवसांपासून दुरवस्था झाली आहे. खड्डे पडून चाळण झालेल्या या रस्त्यावरून जाताना प्रवासी आणि वाहन चालकांचे हाल होत आहेत. मुख्य वर्दळीपासून थोडा दूर असल्याने याची अधिक दखल घेतली जात नाही. गणपती सणापूर्वी या रस्त्याची दुरुस्ती न केल्यास आंबेत, मंडणगड, दापोलीकडे जाणाºया गणेशभक्तांचे मोठ्या प्रमाणात हाल होणार आहेत.ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांचा कोकण म्हणून उल्लेख होत असला तरी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये कोकणाचे खरे दर्शन होते. ठाणे आणि रायगड हे दोन जिल्हे बºयाच अंशी मुंबईमध्ये समाविष्ट झाले आहेत. यामुळे कोकण म्हणून ठाणे, रायगडच्या रस्त्यावरील खड्ड्यांच्या समस्या मांडल्या जात असल्या तरी त्या केवळ मुख्य रस्त्यापुरत्या मर्यादित आहेत. मुंबई-गोवा महामार्गावरून कोकणात जाणारे अनेक मार्ग आहेत. हे सर्वच मार्ग डोंगराळ भागातून वेडीवाकडी वळणे घेत कोकणात जातात.गणेशोत्सव काळात रस्त्याची दुरुस्ती, पोलीस बंदोबस्त याचा केंद्रबिंदू मुंबई-गोवा महामार्ग असला तरी कोकणात जाणाºया जोडरस्त्याकडे गांभीर्याने बघण्याची गरज निर्माण झाली आहे. कोकणातील मंडणगड, दापोली, केळशी, खेड, हर्णे यासह असंख्य छोट्या-मोठ्या गावांना टोळ-आंबेत राज्यमार्ग जोडतो. पावसाळा सुरू झाल्यापासून या भागात पडणारा जोरदार पाऊस आणि वजनी गाड्यांची वाहतूक यामुळे टोळ -आंबेत या रस्त्याची पार दुरवस्था झालीआहे.मुंबई-गोवा महामार्गावर महाड तालुक्याच्या टोळ गावापासून हा मार्ग सुरू होतो. कोकणचे भाग्यविधाते बॅ. ए. आर. अंतुले यांनी काळ नदीवर पूल बांधून हा मार्ग सुरू केला. पूर्वी ही वाहतूक गोरेगाव अगर महाड, रेवतळे मार्गे होत होती. टोळ-आंबेत मार्गामुळे केवळ १२ किमीमध्ये रत्नागिरी जिल्हा जोडला गेला. या रस्त्याची दुरवस्था झाल्याने स्थानिकांसह प्रवासी त्रस्त झाले असून येथून प्रवास करणे जिकीरीचे झाले आहे.