शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
"...तर रशियाही अणु चाचण्या करेल";व्लादिमीर पुतीन यांची थेट अमेरिकेला धमकी
4
boAt मध्ये मोठी खांदेपालट! गौरव नय्यर नवे CEO; बदलामुळे वार्षिक पॅकेज चर्चेत, किती मिळणार पगार?
5
"हनिमूनच्या रात्री उशिरापर्यंत ते..."; ७५ वर्षीय नवऱ्याच्या मृत्यूवर काय म्हणाली ३५ वर्षांची नवरी?
6
२०२७ पर्यंत ५ राशींना साडेसाती, प्रदोषात ‘हे’ करावे; पंचक कायमचे टळेल, शनि शुभ-कल्याण करेल!
7
पाकिस्तानातील पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, ९ जणांचा मृत्यू, ४ पोलिस गंभीर जखमी
8
नेत्याच्या बिल्डर मित्राला ५ तास दालनाबाहेर बसवले; शंकर पाटोळे लाचेच्या रकमेवर ठाम राहिले, कारवाईसाठी मागितले होते ६० लाख रुपये
9
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
10
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
11
हृदयस्पर्शी! "हॅलो अंकल, आईने मला मारलं, प्लीज लवकर या..."; लेकाने थेट पोलिसांना केला फोन
12
मराठीत आदर मिळतो जो हिंदीत नाही... 'घरत गणपती' फेम निकिता दत्ताची प्रतिक्रिया चर्चेत
13
पाकव्याप्त काश्मीरमध्ये सैन्याची थट्टा; फक्त १० रुपयांत गणवेश-हेल्मेट विक्रीला, व्हिडीओ व्हायरल
14
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?
15
केएल राहुलचा 'डबल' धमाका! विराट कोहली आणि रोहित शर्माचा कसोटीतील मोठा विक्रम मोडला
16
तुम्हीही टोल भरताय? मग जाणून घ्या, देशात 'या' लोकांना नियमानुसार मिळते टोलमधून थेट सूट!
17
World Smile Day: ज्याला मिम मटेरिअल समजता, त्याने नुसतं हसून कमावले ३ मिलियन डॉलर!
18
हात पकडून जोरात ओढले..; तीन वर्षीय चिमुकलाने वाचवला आईचा जीव; पाहा धक्कादायक Video
19
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
20
भारतीय कंपनी आणतेय ७००० mah बॅटरीवाला प्रिमिअम फोन, ‘Pixel’ सारखा कॅमेरा डिझाइन; पण किंमत नसेल स्वस्त...

टोळ-आंबेत राज्यमार्गाची दुर्दशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 02:31 IST

मुंबई-गोवा महामार्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याला जोडणारा सर्वात जवळचा मार्ग म्हणजे टोळ-आंबेत राज्यमार्ग. डोंगराळ भागातून जाणाºया या मार्गाची गेल्या काही दिवसांपासून दुरवस्था झाली आहे.

दासगाव : मुंबई-गोवा महामार्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याला जोडणारा सर्वात जवळचा मार्ग म्हणजे टोळ-आंबेत राज्यमार्ग. डोंगराळ भागातून जाणाºया या मार्गाची गेल्या काही दिवसांपासून दुरवस्था झाली आहे. खड्डे पडून चाळण झालेल्या या रस्त्यावरून जाताना प्रवासी आणि वाहन चालकांचे हाल होत आहेत. मुख्य वर्दळीपासून थोडा दूर असल्याने याची अधिक दखल घेतली जात नाही. गणपती सणापूर्वी या रस्त्याची दुरुस्ती न केल्यास आंबेत, मंडणगड, दापोलीकडे जाणाºया गणेशभक्तांचे मोठ्या प्रमाणात हाल होणार आहेत.ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांचा कोकण म्हणून उल्लेख होत असला तरी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये कोकणाचे खरे दर्शन होते. ठाणे आणि रायगड हे दोन जिल्हे बºयाच अंशी मुंबईमध्ये समाविष्ट झाले आहेत. यामुळे कोकण म्हणून ठाणे, रायगडच्या रस्त्यावरील खड्ड्यांच्या समस्या मांडल्या जात असल्या तरी त्या केवळ मुख्य रस्त्यापुरत्या मर्यादित आहेत. मुंबई-गोवा महामार्गावरून कोकणात जाणारे अनेक मार्ग आहेत. हे सर्वच मार्ग डोंगराळ भागातून वेडीवाकडी वळणे घेत कोकणात जातात.गणेशोत्सव काळात रस्त्याची दुरुस्ती, पोलीस बंदोबस्त याचा केंद्रबिंदू मुंबई-गोवा महामार्ग असला तरी कोकणात जाणाºया जोडरस्त्याकडे गांभीर्याने बघण्याची गरज निर्माण झाली आहे. कोकणातील मंडणगड, दापोली, केळशी, खेड, हर्णे यासह असंख्य छोट्या-मोठ्या गावांना टोळ-आंबेत राज्यमार्ग जोडतो. पावसाळा सुरू झाल्यापासून या भागात पडणारा जोरदार पाऊस आणि वजनी गाड्यांची वाहतूक यामुळे टोळ -आंबेत या रस्त्याची पार दुरवस्था झालीआहे.मुंबई-गोवा महामार्गावर महाड तालुक्याच्या टोळ गावापासून हा मार्ग सुरू होतो. कोकणचे भाग्यविधाते बॅ. ए. आर. अंतुले यांनी काळ नदीवर पूल बांधून हा मार्ग सुरू केला. पूर्वी ही वाहतूक गोरेगाव अगर महाड, रेवतळे मार्गे होत होती. टोळ-आंबेत मार्गामुळे केवळ १२ किमीमध्ये रत्नागिरी जिल्हा जोडला गेला. या रस्त्याची दुरवस्था झाल्याने स्थानिकांसह प्रवासी त्रस्त झाले असून येथून प्रवास करणे जिकीरीचे झाले आहे.