शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

टोळ-आंबेत राज्यमार्गाची दुर्दशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 02:31 IST

मुंबई-गोवा महामार्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याला जोडणारा सर्वात जवळचा मार्ग म्हणजे टोळ-आंबेत राज्यमार्ग. डोंगराळ भागातून जाणाºया या मार्गाची गेल्या काही दिवसांपासून दुरवस्था झाली आहे.

दासगाव : मुंबई-गोवा महामार्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याला जोडणारा सर्वात जवळचा मार्ग म्हणजे टोळ-आंबेत राज्यमार्ग. डोंगराळ भागातून जाणाºया या मार्गाची गेल्या काही दिवसांपासून दुरवस्था झाली आहे. खड्डे पडून चाळण झालेल्या या रस्त्यावरून जाताना प्रवासी आणि वाहन चालकांचे हाल होत आहेत. मुख्य वर्दळीपासून थोडा दूर असल्याने याची अधिक दखल घेतली जात नाही. गणपती सणापूर्वी या रस्त्याची दुरुस्ती न केल्यास आंबेत, मंडणगड, दापोलीकडे जाणाºया गणेशभक्तांचे मोठ्या प्रमाणात हाल होणार आहेत.ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांचा कोकण म्हणून उल्लेख होत असला तरी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये कोकणाचे खरे दर्शन होते. ठाणे आणि रायगड हे दोन जिल्हे बºयाच अंशी मुंबईमध्ये समाविष्ट झाले आहेत. यामुळे कोकण म्हणून ठाणे, रायगडच्या रस्त्यावरील खड्ड्यांच्या समस्या मांडल्या जात असल्या तरी त्या केवळ मुख्य रस्त्यापुरत्या मर्यादित आहेत. मुंबई-गोवा महामार्गावरून कोकणात जाणारे अनेक मार्ग आहेत. हे सर्वच मार्ग डोंगराळ भागातून वेडीवाकडी वळणे घेत कोकणात जातात.गणेशोत्सव काळात रस्त्याची दुरुस्ती, पोलीस बंदोबस्त याचा केंद्रबिंदू मुंबई-गोवा महामार्ग असला तरी कोकणात जाणाºया जोडरस्त्याकडे गांभीर्याने बघण्याची गरज निर्माण झाली आहे. कोकणातील मंडणगड, दापोली, केळशी, खेड, हर्णे यासह असंख्य छोट्या-मोठ्या गावांना टोळ-आंबेत राज्यमार्ग जोडतो. पावसाळा सुरू झाल्यापासून या भागात पडणारा जोरदार पाऊस आणि वजनी गाड्यांची वाहतूक यामुळे टोळ -आंबेत या रस्त्याची पार दुरवस्था झालीआहे.मुंबई-गोवा महामार्गावर महाड तालुक्याच्या टोळ गावापासून हा मार्ग सुरू होतो. कोकणचे भाग्यविधाते बॅ. ए. आर. अंतुले यांनी काळ नदीवर पूल बांधून हा मार्ग सुरू केला. पूर्वी ही वाहतूक गोरेगाव अगर महाड, रेवतळे मार्गे होत होती. टोळ-आंबेत मार्गामुळे केवळ १२ किमीमध्ये रत्नागिरी जिल्हा जोडला गेला. या रस्त्याची दुरवस्था झाल्याने स्थानिकांसह प्रवासी त्रस्त झाले असून येथून प्रवास करणे जिकीरीचे झाले आहे.