शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे यांनी केले अमित शाह यांचे तोंडभरून कौतुक; बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेत म्हणाले...
2
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
3
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
4
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
5
"आधी माझ्या बायकोला वाचवा...."; पुरात अडकलेल्या नवऱ्याची धडपड, जिंकली लोकांची मनं
6
एकटं बसलं होतं जोडपं, पाठीमागून २ युवक आले; गर्लफ्रेंडला सोडून बॉयफ्रेंड पळाला, त्यानंतर जे घडलं...
7
तो 'सोंगाड्या'! DSP सिराजसंदर्भात नेमकं काय म्हणाला जो रुट?
8
'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम प्राजक्ता गायकवाडचा उद्या साखरपुडा, मेहंदीचा व्हिडीओ आला समोर
9
दिल्लीसह देशभरातील वीज ग्राहकांना बसणार ‘शॉक’, वीजदरात वाढ करण्यास सुप्रीम कोर्टाची मंजुरी
10
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
11
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध ऐतिहासिक विजय मिळाल्यानंतरही टीम इंडियाने सेलिब्रेशन का नाही केलं? कारण...
12
FD मध्ये पैसे गुंतवताय? 'या' ६ बँका देत आहेत सर्वाधिक व्याज, लगेच तपासा यादी!
13
देशातील विमानतळांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका; बीसीएएसकडून सुरक्षा वाढवण्याच्या सूचना
14
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
15
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
16
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
17
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
18
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या
19
लक्ष्मीकांत बेर्डेंनी का नाकारला 'नवरा माझा नवसाचा' सिनेमा?, सचिन पिळगावकर म्हणाले...
20
NSDL IPO Listing: पहिल्याच दिवशी ९०० पार गेला NSDL चा शेअर; IPO झालेला ४१ पट सबस्क्राईब

करंजा मासळी बाजार सुरू करण्याची परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2020 00:23 IST

मत्स्यव्यवसाय विभागाचे लेखी पत्र; उत्तन, वसई, वर्सोवा, मुंबईतून मासेविक्री करण्यासाठी येणाऱ्या वाहनांना बंदी

उरण : उरण परिसरातील मच्छीमारांना करंजा टर्मिनल अ‍ॅण्ड लॉजिस्टिक बंदराच्या बाजूच्या खाडीत मासळी उतरवून विक्री करण्याची लेखी परवानगी काही अटींवर मुंबई मत्स्यव्यवसाय विभागाचे प्रादेशिक उपआयुक्त महेश देवरे यांनी दिली आहे. महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीच्या शिष्टमंडळाच्या मध्यस्थीतुन उरणातील विविध मच्छीमार संस्थेचे पदाधिकारी आणि स्थानिक मच्छीमार यांच्याबरोबर बुधवारी झालेल्या बैठकीत चर्चेनंतर स्थानिक मच्छीमारांमध्ये सकारात्मक तोडगा निघाला.उरण परिसरातील मच्छीमारांना करंजा टर्मिनल अ‍ॅण्ड लॉजिस्टिक बंदराच्या बाजूच्या खाडीत मासळी उतरवून विक्री करण्याची लेखी परवानगी काही अटींवर गुरुवारी देण्यात आली. यामध्ये उत्तन, वसई, वर्सोवा, मुंबई परिसराबाहेरून मासळी विक्री करण्यासाठी येणाºया वाहनांना बंदी घातली आहे. करंजा, मोरा येथील मासेमारी नौकांवरील घाऊक व लिलाव पद्धतीने मासळी विक्रीसाठी सकाळी ५ ते ८ आणि दुपारी २ ते ८ वाजेपर्यंतची वेळ आहे. किरकोळ मासळी विक्रीसाठी गावपातळीवर निर्णय घेण्याची मुभा आहे.स्थानिक मच्छीमारांमध्येच उफाळून आलेल्या वादातून महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीच्या शिष्टमंडळाने ५ आॅक्टोबर रोजी मच्छीमारांची भेट घेतली होती. दोन दिवसांपूर्वी मुंबई मत्स्यव्यवसाय विभागाचे प्रादेशिक उपआयुक्त महेश देवरे यांच्या दालनात या वादावर तोडगा काढून बंद करण्यात आलेला मासळी बाजार पुन्हा सुरू करण्याच्या मागणीसाठी बैठक बोलावण्यात आली होती.या बैठकीत महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष लिओ कोलोसे आणि सरचिटणीस किरण कोळी, कार्याध्यक्ष रामकृष्ण तांडेल, सरचिटणीस किरण कोळी, ठाणे-पालघर जिल्हा महिला संघटक ज्योती मेहेर, उल्हास वाटकरे, करंजा मच्छीमार संस्थेचे अध्यक्ष भालचंद्र कोळी, उपाध्यक्ष नरेश कोळी, मोरा मच्छीमार संस्थेचे पदाधिकारी आणि स्थानिक मच्छीमार सहभागी झाले होते. या निर्णयामुळे परिसरातील २,५०० मच्छीमारांचा प्रश्न मिटला आहे.महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीची मध्यस्थीउरण परिसरातील मच्छीमारांना करंजा टर्मिनल अ‍ॅण्ड लॉजिस्टिक बंदराच्या बाजूच्या खाडीत मासळी उतरवून विक्री करण्यासाठी करंजा मच्छीमार संस्थेने परवानगी मागितली होती.त्याची दखल घेत रायगडचे सहायक मत्स्यव्यवसाय आयुक्त एस.आर.भारती यांनी १०० मच्छीमार बोटींसाठी काही अटीशर्तीवर मासे विक्रीस तत्काळ परवानगीही दिली होती.मात्र, सहायक मत्स्यव्यवसाय आयुक्तांनी दिलेली परवानगी बेकायदा असल्याचे सांगत उरणचे भाजपचे आमदार महेश बालदी यांच्या तक्रारीनंतर मासळी बाजार बंद करण्यात आला होता.मासळी बाजार अचानक बंद झाल्यामुळे सुमारे परिसरातील २,५०० मच्छीमारांवर उपासमारीचे संकट आले होते. मात्र, महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीच्या मध्यस्थीमुळे मच्छीमारांना दिलासा मिळाला आहे.