शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

पेण अर्बन बँक घोटाळा खटला ईडी न्यायालयाकडे वर्ग; अलिबागच्या विशेष न्यायालयाचा निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 09:25 IST

अलिबागच्या विशेष न्यायालयाचा निकाल, ठेवीदारांना दिलासा मिळणार

- आविष्कार देसाईरायगड : पेण अर्बन बँक घोटाळा प्रकरणाचा खटला ईडी न्यायालयाकडे वर्ग करण्याचे आदेश अलिबागच्या विशेष न्यायालयाने दिले आहेत; परंतु या निर्णयाने ठेवीदारांना मालमत्ता विकून पैसे मिळण्यातील प्रक्रिया लांबली आहे. या निर्णयाने ठेवीदारांचे हित जपले जाणार नसल्याने ईडीने यातून बाजूला व्हावे, असे आवाहन पेण अर्बन बँक संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष नरेन जाधव यांनी ‘लाेकमत’शी बाेलताना केले. याचा अर्थ गुन्हेगारांना रान मोकळे करणे असा नाही, तर त्यांनाही कठोर शिक्षा झालीच पाहिजे, याकडेही जाधव यांनी लक्ष वेधले.

सप्टेंबर २०१० मध्ये पेण अर्बन बँकेचा सुमारे ७५८ काेटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आला होता. या प्रकरणात राजकीय दबावामुळे सुरुवातीला गुन्हा दाखल होत नव्हता. त्यामुळे ठेवीदार आणि खातेदार यांच्यात प्रखर असंतोष हाेता. अखेर ठेवीदारांनी उपोषणाचे हत्यार उपसल्यानंतर २०११ मध्ये सहकार विभागातर्फे गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. त्यानंतर बँकेच्या आजी-माजी संचालक, ऑडिटर अशा ४३ जणांना अटक करण्यात आली हाेती. ईडीने या बँकेच्या अनेक मालमत्ता जप्त करून त्यावर बोजा चढवला होता. 

काय आहे न्यायालयाचे म्हणणे

अलिबागच्या न्यायालयातील खटला मुंबईतील ईडी न्यायालयाकडे वर्ग करावा, असा अर्ज ईडीने केला होता. त्यावर शुक्रवारी सुनावणी होऊन न्यायालयाने खटला वर्ग करण्याचा निर्णय दिला. हा निर्णय खातेदार-ठेवीदार यांच्या हिताचा नाही. अलिबागच्या न्यायालयातच हा खटला चालणे गरजेचे हाेते. खातेदार-ठेवीदार यांच्या पैशातून खरेदी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे ५९८ काेटी रुपये वसूल करून खातेदार-ठेवीदार यांचे पैसे परत करा, असा निर्णय उच्च न्यायालयाने २०१६-१७ साली एमपीआयडी ॲक्टअन्वये दिला हाेता; परंतु ईडीने त्याला सर्वाेच्च न्यायालयात आव्हान दिले.

ठेवीदार आणि खातेदार यांच्या घामाचे पैसे त्यांना मिळालेच पाहिजेत. यासाठी ईडीने यातून बाजूला हाेणे गरेजेचे आहे; परंतु यातील गुन्हेगारांना कठोर शिक्षा झालीच पाहीजे. उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार वसुलीसाठी नेमलेल्या विशेष कृती समितीने आपले काम याेग्य प्रकारे केल्यास खातेदार आणि ठेवीदार यांना पैसे मिळतील, अन्यथा यात असाच वेळ खर्च हाेईल.  -    नरेन जाधव, कार्याध्यक्ष, पेण अर्बन बँक संघर्ष समिती

टॅग्स :Raigadरायगड