शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
2
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
3
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
4
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
5
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
6
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
7
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
8
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
9
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
10
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
11
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
12
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
13
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
14
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
15
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
16
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
17
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
18
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
19
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
20
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार

रायगडमध्ये शेकाप-राष्ट्रवादी

By admin | Updated: February 24, 2017 05:55 IST

अत्यंत अतितटीच्या झालेल्या रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्ष

जयंत धुळप / अलिबागअत्यंत अतितटीच्या झालेल्या रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्ष (शेकाप) आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी यश मिळविता आले आहे. ५९ पैकी २३ शेकापने, तर १२ राष्ट्रवादी काँग्रेसने काबीज केल्या आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागा २० वरुन १२ वर आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला एक शल्य लागून राहिले आहे. त्याच वेळी शेकापच्या मागील १९ जागांमध्ये वाढ होऊन त्यांना २३ जागी यश मिळाल्याने शेकाप मात्र सुखावला आहे. शिवसेनेच्या मागील १५ जागांमध्ये वाढ होवून १८ झाल्याने शिवसेनेमध्ये मात्र आनंदोत्सवच आहे.काँग्रेसच्या जागा ७ वरून ३ वर आल्याने, काही ठिकाणी सेनेबरोबर आघाडी करूनदेखील काँग्रेसला यश संपादन करता आले नाही. भाजपाची एक जागा रायगड जिल्हा परिषदेत होती, त्यात वाढ होऊन या वेळी तीन जागी भाजपाने यश संपादन केले आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे आणि शेकाप सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी आघाडी करण्याचा निर्णय घेतला आणि त्याच क्षणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या निष्ठावान कार्यकर्त्यामध्ये मोठी नाराजीची लाट पसरली. आणि लाटेचे उधाणात रूपांतर होऊन जिल्ह्यातील दिग्गज नेते आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीला रामराम करून सेनेत प्रवेश केला. त्याचा फायदा सेनेला झाला. तोटा मात्र, राष्ट्रवादीला सोसावा लागला. काँग्रेसच्या मागील ७ जागांवरून काँग्रेस ३ जागांवर घसरल्याने, काही ठिकाणी सेनेबरोबर आघाडी करूनही काँग्रेसला अपयशच पत्करावे लागले आहे. भाजपाने मात्र प्रगती केली आहे. केवळ एक जागा होती, तेथे तिन जागी विजय संपादन केला आहे.केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या विकास कामांची पोच पावती मतदारांनी दिल्याचा दावा सेनेने केला आहे. युती तुटल्यावर शिवसैनिकांमध्ये निर्माण झालेली चीडदेखील सेनेच्या यशाचे मोठे गमक मानले जात आहे.