शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

रायगडमध्ये शेकाप-राष्ट्रवादी

By admin | Updated: February 24, 2017 05:55 IST

अत्यंत अतितटीच्या झालेल्या रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्ष

जयंत धुळप / अलिबागअत्यंत अतितटीच्या झालेल्या रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्ष (शेकाप) आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी यश मिळविता आले आहे. ५९ पैकी २३ शेकापने, तर १२ राष्ट्रवादी काँग्रेसने काबीज केल्या आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागा २० वरुन १२ वर आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला एक शल्य लागून राहिले आहे. त्याच वेळी शेकापच्या मागील १९ जागांमध्ये वाढ होऊन त्यांना २३ जागी यश मिळाल्याने शेकाप मात्र सुखावला आहे. शिवसेनेच्या मागील १५ जागांमध्ये वाढ होवून १८ झाल्याने शिवसेनेमध्ये मात्र आनंदोत्सवच आहे.काँग्रेसच्या जागा ७ वरून ३ वर आल्याने, काही ठिकाणी सेनेबरोबर आघाडी करूनदेखील काँग्रेसला यश संपादन करता आले नाही. भाजपाची एक जागा रायगड जिल्हा परिषदेत होती, त्यात वाढ होऊन या वेळी तीन जागी भाजपाने यश संपादन केले आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे आणि शेकाप सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी आघाडी करण्याचा निर्णय घेतला आणि त्याच क्षणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या निष्ठावान कार्यकर्त्यामध्ये मोठी नाराजीची लाट पसरली. आणि लाटेचे उधाणात रूपांतर होऊन जिल्ह्यातील दिग्गज नेते आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीला रामराम करून सेनेत प्रवेश केला. त्याचा फायदा सेनेला झाला. तोटा मात्र, राष्ट्रवादीला सोसावा लागला. काँग्रेसच्या मागील ७ जागांवरून काँग्रेस ३ जागांवर घसरल्याने, काही ठिकाणी सेनेबरोबर आघाडी करूनही काँग्रेसला अपयशच पत्करावे लागले आहे. भाजपाने मात्र प्रगती केली आहे. केवळ एक जागा होती, तेथे तिन जागी विजय संपादन केला आहे.केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या विकास कामांची पोच पावती मतदारांनी दिल्याचा दावा सेनेने केला आहे. युती तुटल्यावर शिवसैनिकांमध्ये निर्माण झालेली चीडदेखील सेनेच्या यशाचे मोठे गमक मानले जात आहे.