शहरं
Join us  
Trending Stories
1
या देशामध्ये राष्ट्रपतींच्या हत्येचा प्रयत्न, जमावाने कारवर फेकले दगड, केला गोळीबार
2
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
3
IPS पूरन कुमार यांच्या पत्नीचे गंभीर आरोप, हरियाणाचे DGP आणि SPविरोधात दिली तक्रार   
4
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
5
थायलंडमध्ये मसाज घेण्यासाठी जाणं होणार महाग, जाणून घ्यावा हा नियम, अन्यथा ऐनवेळी बसेल भुर्दंड   
6
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
7
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
8
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
9
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
10
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
11
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
12
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
13
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
14
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
15
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
16
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
17
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
18
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
19
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
20
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”

अलिबागमध्ये शेकापचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2017 02:52 IST

राज्य सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी आहे. त्यातील जाचक अटींमुळे अनेक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार आहेत

अलिबाग : राज्य सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी आहे. त्यातील जाचक अटींमुळे अनेक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार आहेत, असे येथील आ. सुभाष पाटील यांनी सांगितले. विविध मागण्यांसाठी शेकापच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी मोर्चा काढला. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.सरकारने कर्जमाफीची घोषणा करून शेतकºयांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. दरवर्षी हमीभाव भात खरेदीला सरकारकडून डिसेंबरमध्ये मंजुरी मिळते. त्यामुळे दलालांकडून शेतकºयांची लूट होते. शेतकºयांना त्याचा योग्य मोबदला मिळत नाही. शेतकºयांच्या हितासाठी हमी भाव भात खरेदी १ आॅक्टोबर २०१७ पासून सुुरू करण्यात यावी, अशीही मागणी पाटील यांनी केली. अलिबाग, पेण, पनवेल, उरण या तालुक्यातील खारलॅण्ड विभागाने गेल्या पाच वर्षात बंधारे न बांधल्याने उधाणामुळे भातशेती नापीक झाली आहे. शेतांमध्ये कांदळवन तयार होत असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. खारलॅण्ड शेतीचे योग्य संवर्धन करण्यासाठी पर्यावरणाच्या जाचक अटी रद्द करून बंधारे बांधण्यासाठी निधीची तरतूद करावी. तसेच जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात कारखान्यातील सांडपाणी नद्यांमध्ये सोडले जात आहे. त्यामुळे सावित्री, कुंडलिका, पाताळगंगा, नावडे या नद्या प्रदूषित होऊ लागल्या आहेत. मासेमारी व बागायती शेती व्यवसायावर गदा येण्याची भीती त्यांनी व्यक्त केली.प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारखान्यांवर कारवाई करून मच्छी व्यवसाय व बागायती शेतीचे रक्षण करावे, एमएमआरडीएने घोषित केलेला औद्योगिक क्षेत्र आराखडा रद्द करण्यात यावा अशा अनेक मागण्यांसाठी शेकापच्यावतीने शेतकरी भवन येथून मोर्चा काढला.>जिल्हाधिकाºयांना निवेदनमोर्चात रायगड जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते, महिला सहभागी झाल्या होत्या. यावेळी जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. याप्रसंगी माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील, शेकापचे जिल्हा चिटणीस अ‍ॅड. आस्वाद पाटील आदी उपस्थित होते.