शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
2
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
3
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
4
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
5
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
6
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
7
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
8
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
9
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
10
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
11
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
12
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
13
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
14
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
15
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
16
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
17
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
18
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
19
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
20
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

अलिबागमध्ये शेकापचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2017 02:52 IST

राज्य सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी आहे. त्यातील जाचक अटींमुळे अनेक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार आहेत

अलिबाग : राज्य सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी आहे. त्यातील जाचक अटींमुळे अनेक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार आहेत, असे येथील आ. सुभाष पाटील यांनी सांगितले. विविध मागण्यांसाठी शेकापच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी मोर्चा काढला. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.सरकारने कर्जमाफीची घोषणा करून शेतकºयांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. दरवर्षी हमीभाव भात खरेदीला सरकारकडून डिसेंबरमध्ये मंजुरी मिळते. त्यामुळे दलालांकडून शेतकºयांची लूट होते. शेतकºयांना त्याचा योग्य मोबदला मिळत नाही. शेतकºयांच्या हितासाठी हमी भाव भात खरेदी १ आॅक्टोबर २०१७ पासून सुुरू करण्यात यावी, अशीही मागणी पाटील यांनी केली. अलिबाग, पेण, पनवेल, उरण या तालुक्यातील खारलॅण्ड विभागाने गेल्या पाच वर्षात बंधारे न बांधल्याने उधाणामुळे भातशेती नापीक झाली आहे. शेतांमध्ये कांदळवन तयार होत असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. खारलॅण्ड शेतीचे योग्य संवर्धन करण्यासाठी पर्यावरणाच्या जाचक अटी रद्द करून बंधारे बांधण्यासाठी निधीची तरतूद करावी. तसेच जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात कारखान्यातील सांडपाणी नद्यांमध्ये सोडले जात आहे. त्यामुळे सावित्री, कुंडलिका, पाताळगंगा, नावडे या नद्या प्रदूषित होऊ लागल्या आहेत. मासेमारी व बागायती शेती व्यवसायावर गदा येण्याची भीती त्यांनी व्यक्त केली.प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारखान्यांवर कारवाई करून मच्छी व्यवसाय व बागायती शेतीचे रक्षण करावे, एमएमआरडीएने घोषित केलेला औद्योगिक क्षेत्र आराखडा रद्द करण्यात यावा अशा अनेक मागण्यांसाठी शेकापच्यावतीने शेतकरी भवन येथून मोर्चा काढला.>जिल्हाधिकाºयांना निवेदनमोर्चात रायगड जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते, महिला सहभागी झाल्या होत्या. यावेळी जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. याप्रसंगी माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील, शेकापचे जिल्हा चिटणीस अ‍ॅड. आस्वाद पाटील आदी उपस्थित होते.