शहरं
Join us  
Trending Stories
1
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
2
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
3
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
4
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
5
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
6
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
7
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
8
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
9
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
10
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
11
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
12
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
13
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
14
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
15
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
16
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
17
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
18
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
19
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
20
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल

अलिबागमध्ये शेकापचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2017 02:52 IST

राज्य सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी आहे. त्यातील जाचक अटींमुळे अनेक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार आहेत

अलिबाग : राज्य सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी आहे. त्यातील जाचक अटींमुळे अनेक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार आहेत, असे येथील आ. सुभाष पाटील यांनी सांगितले. विविध मागण्यांसाठी शेकापच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी मोर्चा काढला. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.सरकारने कर्जमाफीची घोषणा करून शेतकºयांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. दरवर्षी हमीभाव भात खरेदीला सरकारकडून डिसेंबरमध्ये मंजुरी मिळते. त्यामुळे दलालांकडून शेतकºयांची लूट होते. शेतकºयांना त्याचा योग्य मोबदला मिळत नाही. शेतकºयांच्या हितासाठी हमी भाव भात खरेदी १ आॅक्टोबर २०१७ पासून सुुरू करण्यात यावी, अशीही मागणी पाटील यांनी केली. अलिबाग, पेण, पनवेल, उरण या तालुक्यातील खारलॅण्ड विभागाने गेल्या पाच वर्षात बंधारे न बांधल्याने उधाणामुळे भातशेती नापीक झाली आहे. शेतांमध्ये कांदळवन तयार होत असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. खारलॅण्ड शेतीचे योग्य संवर्धन करण्यासाठी पर्यावरणाच्या जाचक अटी रद्द करून बंधारे बांधण्यासाठी निधीची तरतूद करावी. तसेच जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात कारखान्यातील सांडपाणी नद्यांमध्ये सोडले जात आहे. त्यामुळे सावित्री, कुंडलिका, पाताळगंगा, नावडे या नद्या प्रदूषित होऊ लागल्या आहेत. मासेमारी व बागायती शेती व्यवसायावर गदा येण्याची भीती त्यांनी व्यक्त केली.प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारखान्यांवर कारवाई करून मच्छी व्यवसाय व बागायती शेतीचे रक्षण करावे, एमएमआरडीएने घोषित केलेला औद्योगिक क्षेत्र आराखडा रद्द करण्यात यावा अशा अनेक मागण्यांसाठी शेकापच्यावतीने शेतकरी भवन येथून मोर्चा काढला.>जिल्हाधिकाºयांना निवेदनमोर्चात रायगड जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते, महिला सहभागी झाल्या होत्या. यावेळी जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. याप्रसंगी माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील, शेकापचे जिल्हा चिटणीस अ‍ॅड. आस्वाद पाटील आदी उपस्थित होते.