शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

खड्डे भरण्याचे काम रखडले

By admin | Updated: July 25, 2016 03:03 IST

नेरळ-कळंब रस्त्यावरील नेरळ ते अवसरेदरम्यान रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने हा प्रवास धोकादायक बनला आहे. त्यामुळे वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.

नेरळ : नेरळ-कळंब रस्त्यावरील नेरळ ते अवसरेदरम्यान रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने हा प्रवास धोकादायक बनला आहे. त्यामुळे वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे लवकरात लवकर भरावेत, अशी मागणी प्रवासी व वाहनचालकांकडून केली जात होती. चार दिवसांपूर्वी या रस्त्यांवर खड्डे भरण्याचे काम बांधकाम खात्याने हाती घेतले होते. परंतु काम मध्येच रखडल्याने खड्ड्यांच्या प्रमाणात वाढ होऊन छोटे मोठे अपघातही वाढले आहेत.नेरळ - कळंब हा महत्त्वाचा जिल्हामार्ग असून, या रस्त्यावरून वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू असते. गेल्या अनेक महिन्यांपासून या मार्गावरील नेरळ ते अवसरेदरम्यान सुमारे सात किमीच्या अंतरावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. परंतु या रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले आहे. नेरळ -कळंब हा सुमारे १२ किमीचा रस्ता असून, नेरळ ते अवसरे या भागाचे दोन वर्षांपूर्वी डांबरीकरण करण्यात आले होते. परंतु सध्या या रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. याच रस्त्यावरील नेरळ साई मंदिर परिसरात चार दिवसांपूर्वी खड्डे भरले आणि उखडलेली अशी परिस्थिती आहे. तसेच धोमोते, दहीवली, बिरदोले, अवसरे अशा ठिकाणी रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. त्याचा त्रास वाहनचालक व प्रवाशांना होत आहे. त्यामुळे चांगल्या प्रकारे रस्त्यावर पडलेले खड्डे भरावे, अशी मागणी प्रवासी व वाहनचालकांकडून केली जात आहे. (वार्ताहर)