शहरं
Join us  
Trending Stories
1
‘हा तर मणिपूरच्या लोकांचा अपमान आहे’, PM मोदींच्या दौऱ्यावर काँग्रेसची बोचरी टीका
2
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
3
ह्युंदाईचे जीएसटी कपातीचे दर आले! नियॉस ७३,८०८, ऑरा ७८...; पहा कितीने कमी झाली क्रेटा...
4
'बीडमध्ये पोलिसांना आपले आडनाव लावता येत नसेल तर...', धनंजय मुंडेंनी व्यक्त केली खंत
5
चित्रकूट पर्वतावर पुजेसाठी जमलले! ५० जणांवर अचानक वीज कोसळली; ओडिशात धक्कादायक घटना
6
संसदेच्या आवारात भाजपची दोन दिवसांची कार्यशाळा; PM मोदी शेवटच्या रांगेत बसले...
7
एका शेअरने बदललं गुंतवणूकदारांचे नशीब! १ लाखाची गुंतवणूक ५ वर्षांत झाली ३४ लाखांहून अधिक
8
Travel : परदेशात जायचंय? 'हे' देश आहेत भारतीयांसाठी व्हिसा फ्री, ४० हजारात होईल एका देशाची ट्रिप!
9
विसर्जनाचं कंत्राट गुजरातला दिलं, कोळी बांधवांचा लालबाग मंडळावर गंभीर आरोप
10
अवघे पाऊणशे वयमान! सत्तरीत जग फिरण्याचं स्वप्न; ३५ देशांची सोलो ट्रिप, कोण आहे 'ट्रॅव्हल अम्मा'?
11
पितृपक्ष २०२५: कधी आहे सर्वपित्री अमावास्या? खंडग्रास सूर्यग्रहण लागणार; पाहा, काही मान्यता
12
'...तरच गाझा युद्ध थांबेल'; शांतता चर्चेत नवा ट्विस्ट, इस्त्रायलच्या परराष्ट्र मंत्र्यांचे मोठे विधान!
13
जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा राजीनामा देण्याच्या तयारीत! का घेतला मोठा निर्णय?
14
पितृपक्ष २०२५: १५ दिवस स्वामी सेवेने पितृदोष मुक्तता; १ मंत्र रामबाण, दत्तगुरु कल्याण करतील
15
एडटेक कंपनी 'फिजिक्स वाला'चा ३८२० कोटींचा आयपीओ; सेबीकडे दस्तऐवज दाखल, कुठे करणार गुंतवणूक?
16
पितृपक्ष संकष्ट चतुर्थी २०२५: मृत्यू पंचकाचे विघ्न दूर होणार, गणपती शुभ करणार; ५ गोष्टी करा!
17
कॅन्सरचे रुग्ण बरे होणार? रशियाच्या लसीने सर्व अडथळे पार केले; एका मंजुरीनंतर रुग्णांना मिळणार
18
Tanya Mittal : एका रात्रीत सर्व सोनं, ३ आयफोन विकायची आली वेळ; तान्या मित्तलचा मोठा खुलासा, म्हणाली...
19
लाल समुद्रात इंटरनेटची केबल तुटली; भारत-पाकिस्तानसह आशियातील अनेक देशांना फटका
20
टिंडरवरच्या मैत्रिणीला भेटायला गेला अन् तरुणासोबत मोठा गेम झाला! पोस्ट लिहीत म्हणाला...

भिसे खिंडीतील रस्त्यावरील संरक्षक कठडे तुटले

By admin | Updated: May 23, 2016 03:06 IST

रायगड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावरील नागोठणे आणि रोहा या दोन शहरांना जोडणाऱ्या भिसे खिंडीतील रस्त्यावरील तुटलेले संरक्षक कठडे

मुरुड / बोर्ली-मांडला : रायगड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावरील नागोठणे आणि रोहा या दोन शहरांना जोडणाऱ्या भिसे खिंडीतील रस्त्यावरील तुटलेले संरक्षक कठडे आणि धोकादायक वळणावरील वाढलेल्या झुडपामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असून याकडे लक्ष देण्याची मागणी प्रवासी आणि वाहनचालकांकडून केली जात आहे.भिसे खिंडीतील रस्ता हा नेहमीच रहदारीचा असून हा रस्ता डोंगरामधून गेलेला आहे. वाहन चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यास किंवा इतर कारणांनी अपघात झाला तर मोठी भयानक परिस्थिती निर्माण होईल. या खिंडीतील अनेक ठिकाणी असलेले संरक्षक कठडे तुटलेल्या अवस्थेत असून खिंडीतील रस्ता हा नागमोडी वळणाचा आहे. याच्या बाजूला असणारी वृक्षांची वाढलेली झुडपे ही रस्त्यावर आली आहेत. वाढलेल्या झुडपांमुळे वाहनचालकांना वाहन चालविणे धोक्याचे बनले आहे. काही दिवसांनी पावसाचे आगमन होणार असून त्यावेळी ही झुडपे आणखी मोठ्या प्रमाणात वाढतील, तरी संबंधित विभागाने वाढलेली झुडपे तोडून टाकावी आणि तुटलेल्या संरक्षक कठड्याची दुरु स्ती करावी अशी मागणी जोर धरत आहे. रोहा हे तालुक्याचे ठिकाण तसेच नागोठणे हे राष्ट्रीय महामार्गावरील रायगड जिल्ह्यातील महत्त्वाचे ठिकाण आहे. त्यामुळे नागोठणे विभागातील नागरिक हे शासकीय कामानिमित्त येत असतात. त्यांना रोहा येथे येण्यासाठी भिसे खिंडीतून यावे लागते किंवा नागोठणे -कोलाड नाका मार्गे रोहा असा वळसा घालून यावे लागत आहे. त्याचप्रमाणे नागोठणे येथे अभियांत्रिकी महाविद्यालय, रिलायन्ससारखे औद्योगिक प्रकल्प, अनेक उद्योग व्यवसाय असल्याने या भिसे खिंडीतून नागरिकांची कामधंद्यानिमित्त दिवस-रात्र ये-जा सुरू असते.या मार्गावर सतत वाहनांची वर्दळ असते. खिंडीतील धोकादायक नागमोडी वळणावरील तुटलेल्या अवस्थेतील संरक्षक कठडे आणि वृक्षांची वाढलेली झुडपे यामुळे ये- जा करणाऱ्या वाहन चालकांसहित नवीन वाहनचालक यांनाही समोरून येणारे वाहन बहुतांशी दिसत नाही. त्यामुळे अपघात होऊन जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. संरक्षक कठडा तुटलेल्या ठिकाणी अपघात झाला तर वाहन हे थेट खोल दरीत कोसळण्याची भीती आहे. तरी संबंधित विभागाने याकडे वेळीच लक्ष देवून सहकार्य करण्याची मागणी प्रवाशांसहित वाहन चालकांकडून होत आहे. (वार्ताहर)