शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

पालीत नागरिक पितायेत गढूळ पाणी

By admin | Updated: September 11, 2015 23:23 IST

अनेक वर्षांपासून पालीतील नागरिकांची शुध्द पाण्याची मागणी असताना आजतागायत कोणत्याही राजकर्त्यांनी ही मागणी पूर्ण न केल्याने पालीतील नागरिकांच्या नशिबी गढूळच

पाली : अनेक वर्षांपासून पालीतील नागरिकांची शुध्द पाण्याची मागणी असताना आजतागायत कोणत्याही राजकर्त्यांनी ही मागणी पूर्ण न केल्याने पालीतील नागरिकांच्या नशिबी गढूळच पाणी पिण्याची वेळ आली आहे.पाली ग्रामपंचायत सुधागड तालुक्यात श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून गणली जाते. पाली शहराचे मोठ्या प्रमाणात नागरीकरण होत असताना शहरातील नागरिकांना थेट अंबा नदीतून जॅकवेलद्वारे पाणी उचलून ते पाणी टाकीत साठवून नागरिकांना पिण्यासाठी पुरविले जात आहे. हे थेट नदीतून पाणी उचलून पुरवठा केल्याने पालीकरांना निरनिराळ्या आजारांचा सामना करावा लागत आहे. वरुणराजाच्या बऱ्याच दिवसांच्या उघडिपीनंतर पुन्हा एकदा पावसाने दमदार हजेरी लावल्याने उकाड्याने हैराण झालेले नागरिक जरी सुखावले असतील तरी याच पावसाचे पाणी नदीपात्रात आल्याने नदीचे पाणी गढूळ झाले आहे. हेच पाणी नागरिकांना नाईलाजाने प्यावे लागत असल्याने रोगराईला सामोरे जावे लागते की काय अशी भीती सर्वसामान्य नागरिक व्यक्त करीत आहेत. पालीतील नागरिकांना शुध्द पाणी मिळण्याची व्यवस्था पाणी पुरवठा विभागासह लोकप्रतिनिधींनी करावी, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)