शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये १४ अणुशास्त्रज्ञ ठार, इराण अणुकार्यक्रम पुन्हा सुरू करणार
2
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
3
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
4
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
5
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
6
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
7
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
8
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
9
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
10
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
11
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
12
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
13
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
14
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
15
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
16
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
17
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
18
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
19
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!

पालीत नागरिक पितायेत गढूळ पाणी

By admin | Updated: September 11, 2015 23:23 IST

अनेक वर्षांपासून पालीतील नागरिकांची शुध्द पाण्याची मागणी असताना आजतागायत कोणत्याही राजकर्त्यांनी ही मागणी पूर्ण न केल्याने पालीतील नागरिकांच्या नशिबी गढूळच

पाली : अनेक वर्षांपासून पालीतील नागरिकांची शुध्द पाण्याची मागणी असताना आजतागायत कोणत्याही राजकर्त्यांनी ही मागणी पूर्ण न केल्याने पालीतील नागरिकांच्या नशिबी गढूळच पाणी पिण्याची वेळ आली आहे.पाली ग्रामपंचायत सुधागड तालुक्यात श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून गणली जाते. पाली शहराचे मोठ्या प्रमाणात नागरीकरण होत असताना शहरातील नागरिकांना थेट अंबा नदीतून जॅकवेलद्वारे पाणी उचलून ते पाणी टाकीत साठवून नागरिकांना पिण्यासाठी पुरविले जात आहे. हे थेट नदीतून पाणी उचलून पुरवठा केल्याने पालीकरांना निरनिराळ्या आजारांचा सामना करावा लागत आहे. वरुणराजाच्या बऱ्याच दिवसांच्या उघडिपीनंतर पुन्हा एकदा पावसाने दमदार हजेरी लावल्याने उकाड्याने हैराण झालेले नागरिक जरी सुखावले असतील तरी याच पावसाचे पाणी नदीपात्रात आल्याने नदीचे पाणी गढूळ झाले आहे. हेच पाणी नागरिकांना नाईलाजाने प्यावे लागत असल्याने रोगराईला सामोरे जावे लागते की काय अशी भीती सर्वसामान्य नागरिक व्यक्त करीत आहेत. पालीतील नागरिकांना शुध्द पाणी मिळण्याची व्यवस्था पाणी पुरवठा विभागासह लोकप्रतिनिधींनी करावी, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)