शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
4
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
5
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले
6
निलेश साबळेनेच मला बाईचं कॅरेक्टर करायला सांगितलं होतं, भाऊ कदमचा खुलासा
7
भूपतीचा शस्त्रसंधीचा प्रस्ताव, जगन म्हणतो शस्त्र ठेवणार नाही ! माओवादी संघटनेतील वाद चव्हाट्यावर
8
१०० वर्षांनी शुभ योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: ६ मूलांकांचे ग्रहण सुटेल; पैसा-लाभ-वरदान!
9
अमेरिकेत करिअरचे दार उघडणारा H-1B व्हिसा काय आहे? कोणाला मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
10
पुढच्या आठवड्यात येणार IPO चा पाऊस, २२ आयपीओंमध्ये मिळणार गुंतवणूकीची संधी; कोणत्या आहेत कंपन्या?
11
हृदयस्पर्शी! "आई-वडिलांना सोडून मुलगी गेली लंडनला"; ८० वर्षांचे आजोबा ट्रेनमध्ये विकतात पदार्थ
12
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
13
GST Rate Cut: ५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
14
Hanuman Temple: 'या' मंदिरात हनुमान निद्रावस्थेत, तरीही केवळ दर्शनाने पूर्ण होते भक्तांची प्रत्येक इच्छा 
15
Vivo Y50i: झटक्यात चार्ज होणार आणि दिर्घकाळ चालणार; विवोचा बजेट स्मार्टफोन बाजारात!
16
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
17
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
18
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
19
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
20
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क

१५ वर्षांपूर्वीच प्लॅस्टिक बंदीसाठी पाटील यांचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 01:56 IST

रायगड जिल्ह्यातील पहिल्या महिला बेकरी उद्योजिका विद्या पाटील यांनी बेकरी व्यवसायांत अनेक मानदंड प्रस्थापित करीत असतानाच आपले पर्यावरणप्रेम देखील अगदी कसोशीने पाळले आहे.

जयंत धुळपअलिबाग : रायगड जिल्ह्यातील पहिल्या महिला बेकरी उद्योजिका विद्या पाटील यांनी बेकरी व्यवसायांत अनेक मानदंड प्रस्थापित करीत असतानाच आपले पर्यावरणप्रेम देखील अगदी कसोशीने पाळले आहे. २००२च्या सुमारास प्लॅस्टिक कॅरिबॅगची पर्यावरणीय समस्या उग्ररूप धारण करून जगासमोर उभी राहिल्यावर, आपल्यापासूनच या समस्येला आळा घालण्याचा निर्णय घेवून विद्या पाटील यांनी २००२ पासून आपल्या मयूर बेकरीत कोणताही माल कोणत्याही ग्राहकाने खरेदी केल्यावर प्लॅस्टिक कॅरिबॅग देणे बंद केले आणि पर्यावरण संवर्धनाचा एक आगळा दृष्टिकोन १५ वर्षांपूर्वी सर्वांसमोर ठेवला आणि आज तो अत्यावश्यक बनला आहे.प्लॅस्टिक कॅरिबॅग देणे बंद केल्यावर काही काळ ग्राहकांकडून नाराजीचा सूर ऐकावा लागला, परंतु माझा माझ्या प्रत्येक ग्राहकाशी मुळात संवाद होता आणि ज्यांच्याशी नव्हता त्यांच्याशी मी तो जाणीवपूर्वक निर्माण केला. कॅरिबॅग वापराचे धोके त्यांच्या लक्षात आणून दिले.कॅरिबॅगच्या धोक्यांच्या बाबत एक पत्रक तयार करुन ते मी माझ्याकडे येणाºया प्रत्येक ग्राहकास देवून त्यांच्यात हा विचार रुजवला. ते पत्रक मोठे करुन माझ्या बेकरीत देखील लावले. कालांतराने माझे ग्राहक माझ्याशी सहमत झाले आणि स्वत:ची कापडी पिशवी घेवून बेकरीत खरेदीला येवू लागले, असा परिवर्तनाचा अनुभव विद्या पाटील यांनी सांगितला. काही वेळेस मोठी आॅर्डर असायची त्यावेळी मी त्या ग्राहकाला, माझ्याकडे आलेल्या कच्चा मालाच्या पुठ्ठ्याचे खोके देत असे. बेकरीत कॅरिबॅग ठेवतच नसल्याने देण्याचा प्रश्नच शिल्लक राहात नसे, असेही त्यांनी सांगितले.कॅरिबॅगची पर्यावरण समस्या ही अत्यंत गंभीर बनली आहे. तिला आळा घालण्याचे काम ती कॅरिबॅग घेणाºया ग्राहकापेक्षा, ती देणाºया व्यावसायिकानेच पुढाकार घेणे आवश्यक आहे. कॅरिबॅग दिली नाही म्हणून आपला व्यवसाय कमी होईल अशी काही वेळेस भीती व्यावसायिकास वाटते. परंतु आपल्याकडे येणाºया ग्राहकाशी काही क्षणांचा वेळ काढून जर व्यावसायिकाने संवाद साधला तर तो कॅरिबॅगचा हट्ट ग्राहक धरत नाही आणि आपल्या व्यवसायावर परिणाम देखील होत नाही, असे पाटील यांनी सांगितले.प्लॅस्टिक न वापरण्याच्या मानसिकतेचे वृद्धीकरणअमेरिका आणि सिंगापूरमध्ये खरेदी केलेल्या प्रत्येक वस्तूबरोबर स्वतंत्र कॅरिबॅग देण्यात येत असल्याचे तेथे पाहिल्याचे त्यांनी सांगितले.त्यामुळे तेथे करिबॅगचा वापर अधिक आहे. प्लॅस्टिकची विल्हेवाट लावणारी यंत्रणा तेथे आहे मात्र त्यावर सरकारी निधी मोठ्या प्रमाणात खर्च होतो. आपल्याकडे ते शक्य नाही.भारतात प्लॅस्टिक वापरायचे नाही, अशी अंगभूत मानसिकता मोठ्या प्रमाणात आजही आहे, ती मानसिकता वाढविण्याकरिता प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.तरुणाईने कॅरिबॅग मुक्ती प्रबोधन उपक्रमांत येणे गरजेचेमोठे मॉल्स, डिपार्टमेंटल स्टोअर्स आणि मोठी दुकाने येथे प्लॅस्टिक कॅरीबॅक वापर टाळण्यासाठी ग्राहक जागृतीचे उपक्रम करता येवू शकतात.महाविद्यालयीन विद्यार्थी विशेषत: एनएसएस वा एनसीसीचे विद्यार्थी, युवा स्वयंसेवी संस्था कार्यकर्ते, यांनी कॅरिबॅग मुक्ती प्रबोधन उपक्रमांतर्गत ग्राहकांशी या बाबत संवाद साधल्यास, बदल नक्की दिसून येईल असा विश्वास विद्यातार्इंनी अखेरीस व्यक्त केला.

टॅग्स :Raigadरायगड