शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

१५ वर्षांपूर्वीच प्लॅस्टिक बंदीसाठी पाटील यांचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 01:56 IST

रायगड जिल्ह्यातील पहिल्या महिला बेकरी उद्योजिका विद्या पाटील यांनी बेकरी व्यवसायांत अनेक मानदंड प्रस्थापित करीत असतानाच आपले पर्यावरणप्रेम देखील अगदी कसोशीने पाळले आहे.

जयंत धुळपअलिबाग : रायगड जिल्ह्यातील पहिल्या महिला बेकरी उद्योजिका विद्या पाटील यांनी बेकरी व्यवसायांत अनेक मानदंड प्रस्थापित करीत असतानाच आपले पर्यावरणप्रेम देखील अगदी कसोशीने पाळले आहे. २००२च्या सुमारास प्लॅस्टिक कॅरिबॅगची पर्यावरणीय समस्या उग्ररूप धारण करून जगासमोर उभी राहिल्यावर, आपल्यापासूनच या समस्येला आळा घालण्याचा निर्णय घेवून विद्या पाटील यांनी २००२ पासून आपल्या मयूर बेकरीत कोणताही माल कोणत्याही ग्राहकाने खरेदी केल्यावर प्लॅस्टिक कॅरिबॅग देणे बंद केले आणि पर्यावरण संवर्धनाचा एक आगळा दृष्टिकोन १५ वर्षांपूर्वी सर्वांसमोर ठेवला आणि आज तो अत्यावश्यक बनला आहे.प्लॅस्टिक कॅरिबॅग देणे बंद केल्यावर काही काळ ग्राहकांकडून नाराजीचा सूर ऐकावा लागला, परंतु माझा माझ्या प्रत्येक ग्राहकाशी मुळात संवाद होता आणि ज्यांच्याशी नव्हता त्यांच्याशी मी तो जाणीवपूर्वक निर्माण केला. कॅरिबॅग वापराचे धोके त्यांच्या लक्षात आणून दिले.कॅरिबॅगच्या धोक्यांच्या बाबत एक पत्रक तयार करुन ते मी माझ्याकडे येणाºया प्रत्येक ग्राहकास देवून त्यांच्यात हा विचार रुजवला. ते पत्रक मोठे करुन माझ्या बेकरीत देखील लावले. कालांतराने माझे ग्राहक माझ्याशी सहमत झाले आणि स्वत:ची कापडी पिशवी घेवून बेकरीत खरेदीला येवू लागले, असा परिवर्तनाचा अनुभव विद्या पाटील यांनी सांगितला. काही वेळेस मोठी आॅर्डर असायची त्यावेळी मी त्या ग्राहकाला, माझ्याकडे आलेल्या कच्चा मालाच्या पुठ्ठ्याचे खोके देत असे. बेकरीत कॅरिबॅग ठेवतच नसल्याने देण्याचा प्रश्नच शिल्लक राहात नसे, असेही त्यांनी सांगितले.कॅरिबॅगची पर्यावरण समस्या ही अत्यंत गंभीर बनली आहे. तिला आळा घालण्याचे काम ती कॅरिबॅग घेणाºया ग्राहकापेक्षा, ती देणाºया व्यावसायिकानेच पुढाकार घेणे आवश्यक आहे. कॅरिबॅग दिली नाही म्हणून आपला व्यवसाय कमी होईल अशी काही वेळेस भीती व्यावसायिकास वाटते. परंतु आपल्याकडे येणाºया ग्राहकाशी काही क्षणांचा वेळ काढून जर व्यावसायिकाने संवाद साधला तर तो कॅरिबॅगचा हट्ट ग्राहक धरत नाही आणि आपल्या व्यवसायावर परिणाम देखील होत नाही, असे पाटील यांनी सांगितले.प्लॅस्टिक न वापरण्याच्या मानसिकतेचे वृद्धीकरणअमेरिका आणि सिंगापूरमध्ये खरेदी केलेल्या प्रत्येक वस्तूबरोबर स्वतंत्र कॅरिबॅग देण्यात येत असल्याचे तेथे पाहिल्याचे त्यांनी सांगितले.त्यामुळे तेथे करिबॅगचा वापर अधिक आहे. प्लॅस्टिकची विल्हेवाट लावणारी यंत्रणा तेथे आहे मात्र त्यावर सरकारी निधी मोठ्या प्रमाणात खर्च होतो. आपल्याकडे ते शक्य नाही.भारतात प्लॅस्टिक वापरायचे नाही, अशी अंगभूत मानसिकता मोठ्या प्रमाणात आजही आहे, ती मानसिकता वाढविण्याकरिता प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.तरुणाईने कॅरिबॅग मुक्ती प्रबोधन उपक्रमांत येणे गरजेचेमोठे मॉल्स, डिपार्टमेंटल स्टोअर्स आणि मोठी दुकाने येथे प्लॅस्टिक कॅरीबॅक वापर टाळण्यासाठी ग्राहक जागृतीचे उपक्रम करता येवू शकतात.महाविद्यालयीन विद्यार्थी विशेषत: एनएसएस वा एनसीसीचे विद्यार्थी, युवा स्वयंसेवी संस्था कार्यकर्ते, यांनी कॅरिबॅग मुक्ती प्रबोधन उपक्रमांतर्गत ग्राहकांशी या बाबत संवाद साधल्यास, बदल नक्की दिसून येईल असा विश्वास विद्यातार्इंनी अखेरीस व्यक्त केला.

टॅग्स :Raigadरायगड