शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

‘गंदगीमुक्त भारत’ मोहिमेत सहभागी व्हा; किरण पाटील यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 01:45 IST

 ८ ते १५ ऑगस्टदरम्यान विविध उपक्रम

अलिबाग : नागरिकांमध्ये स्वच्छता व आरोग्याबाबत सकारात्मक दृष्टीने प्रभावी जनजागृती व्हावी, या उद्देशाने केंद्र सरकारच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्या वतीने ८ आॅगस्ट ते १५ आॅगस्ट या कालावधीत ‘गंदगीमुक्त भारत’ मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानामध्ये जास्तीतजास्त लोकांनी सहभागी होऊन ही मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.याच विषयाच्या अनुषंगाने डॉ.किरण पाटील यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी (पंचायत, आरोग्य, शिक्षण, गट समन्वयक व समूह समन्वयक) यांच्याशी संवाद साधला. ते म्हणाले, प्रभावी संवाद हा अभियानाचा आत्मा आहे. स्वच्छता ही लोकचळवळ बनवावी, शौचालयाचा नियमित वापर, घनकचरा सांडपाणी व्यवस्थापन, प्लास्टीकबंदी याद्वारे पर्यावरण स्वच्छ ठेवण्यास मदत होणार आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या परिस्थितीत प्रभावी स्वच्छता केल्यास कोरोना नियंत्रण येण्यास मदत होईल, असा विश्वास डॉ. किरण पाटील यांनी व्यक्त केला.लोकप्रतिनिधींनी यात उत्स्फूर्त सहभाग घ्यावा, असे आवाहन करतानाच, स्वच्छतेत नावीन्यपूर्ण उपक्र म राबविणाऱ्या स्वयंसेवी संस्था, व्यक्ती, एनएसएस व नेहरू युवा केंद्र आदींचे या स्वच्छता उपक्र मासाठी योगदान महत्त्वाचे ठरणार असून, हे अभियान गावस्तरावर सरपंच व ग्रामसेवक यांनी मोठ्या प्रमाणावर पुढाकार घेऊन यशस्वी करावे, असेही डॉ.किरण पाटील म्हणाले. टोल फ्री क्र मांक १८००१८००४०४ वर स्वच्छाग्रही व नागरिकांनी प्रतिसाद नोंदवावा, तसेच ग्रामपंचायत स्तरावर १५ आॅगस्ट रोजी ग्रामस्थांना कोविड १९च्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर ठेवून स्वच्छतेची शपथ व इतर उपक्र म राबविण्याचे आवाहन डॉ.किरण पाटील यांनी केले आहे.अभियानांतर्गत उपक्रम : या अभियानांतर्गत ९ आॅगस्ट रोजी ग्रामस्तरावर सिंगल युज प्लास्टीकचे संकलन व वर्गीकरण, १० आॅगस्ट रोजी ग्रामपंचायत व सार्वजनिक परिसरातील इमारतीमध्ये श्रमदान मोहीम राबविणे, ११ आॅगस्ट रोजी गावातील भिंतीवर स्वच्छता संदेश रंगविणे, १२ आॅगस्ट रोजी वृक्षारोपणाचे उपक्रम राबविणे, १३ आॅगस्ट रोजी ‘गंदगीमुक्त माझे गाव’ या विषयावर आॅनलाइन चित्रकला स्पर्धा (इयता सहावी ते आठवी), तसेच याच विषयावर निबंध स्पर्धा (इयता नववी ते बारावी), १४ आॅगस्ट रोजी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये स्वच्छता व निर्जंतुकीकरण करणे, १५ आॅगस्ट रोजी ओडीएफ प्लस कार्यक्र माची घोषणा करणे हे उपक्रम राबविण्यात यावेत.