शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

‘गंदगीमुक्त भारत’ मोहिमेत सहभागी व्हा; किरण पाटील यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 01:45 IST

 ८ ते १५ ऑगस्टदरम्यान विविध उपक्रम

अलिबाग : नागरिकांमध्ये स्वच्छता व आरोग्याबाबत सकारात्मक दृष्टीने प्रभावी जनजागृती व्हावी, या उद्देशाने केंद्र सरकारच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्या वतीने ८ आॅगस्ट ते १५ आॅगस्ट या कालावधीत ‘गंदगीमुक्त भारत’ मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानामध्ये जास्तीतजास्त लोकांनी सहभागी होऊन ही मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.याच विषयाच्या अनुषंगाने डॉ.किरण पाटील यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी (पंचायत, आरोग्य, शिक्षण, गट समन्वयक व समूह समन्वयक) यांच्याशी संवाद साधला. ते म्हणाले, प्रभावी संवाद हा अभियानाचा आत्मा आहे. स्वच्छता ही लोकचळवळ बनवावी, शौचालयाचा नियमित वापर, घनकचरा सांडपाणी व्यवस्थापन, प्लास्टीकबंदी याद्वारे पर्यावरण स्वच्छ ठेवण्यास मदत होणार आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या परिस्थितीत प्रभावी स्वच्छता केल्यास कोरोना नियंत्रण येण्यास मदत होईल, असा विश्वास डॉ. किरण पाटील यांनी व्यक्त केला.लोकप्रतिनिधींनी यात उत्स्फूर्त सहभाग घ्यावा, असे आवाहन करतानाच, स्वच्छतेत नावीन्यपूर्ण उपक्र म राबविणाऱ्या स्वयंसेवी संस्था, व्यक्ती, एनएसएस व नेहरू युवा केंद्र आदींचे या स्वच्छता उपक्र मासाठी योगदान महत्त्वाचे ठरणार असून, हे अभियान गावस्तरावर सरपंच व ग्रामसेवक यांनी मोठ्या प्रमाणावर पुढाकार घेऊन यशस्वी करावे, असेही डॉ.किरण पाटील म्हणाले. टोल फ्री क्र मांक १८००१८००४०४ वर स्वच्छाग्रही व नागरिकांनी प्रतिसाद नोंदवावा, तसेच ग्रामपंचायत स्तरावर १५ आॅगस्ट रोजी ग्रामस्थांना कोविड १९च्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर ठेवून स्वच्छतेची शपथ व इतर उपक्र म राबविण्याचे आवाहन डॉ.किरण पाटील यांनी केले आहे.अभियानांतर्गत उपक्रम : या अभियानांतर्गत ९ आॅगस्ट रोजी ग्रामस्तरावर सिंगल युज प्लास्टीकचे संकलन व वर्गीकरण, १० आॅगस्ट रोजी ग्रामपंचायत व सार्वजनिक परिसरातील इमारतीमध्ये श्रमदान मोहीम राबविणे, ११ आॅगस्ट रोजी गावातील भिंतीवर स्वच्छता संदेश रंगविणे, १२ आॅगस्ट रोजी वृक्षारोपणाचे उपक्रम राबविणे, १३ आॅगस्ट रोजी ‘गंदगीमुक्त माझे गाव’ या विषयावर आॅनलाइन चित्रकला स्पर्धा (इयता सहावी ते आठवी), तसेच याच विषयावर निबंध स्पर्धा (इयता नववी ते बारावी), १४ आॅगस्ट रोजी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये स्वच्छता व निर्जंतुकीकरण करणे, १५ आॅगस्ट रोजी ओडीएफ प्लस कार्यक्र माची घोषणा करणे हे उपक्रम राबविण्यात यावेत.