शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

Panvel: पनवेलच्या तहसिलदारांचे निलंबन करा, उपोषणकर्त्या पळस्पे ग्रामस्थांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी 

By वैभव गायकर | Updated: August 26, 2023 16:22 IST

Panvel: पळस्पे गावासभोवताली असलेले गोडाऊन तसेच बांधकाम प्रकल्पांमुळे याठिकाणी भातशेती धोक्यात आली आहे.

- वैभव गायकर पनवेल - पळस्पे गावासभोवताली असलेले गोडाऊन तसेच बांधकाम प्रकल्पांमुळे याठिकाणी भातशेती धोक्यात आली आहे.आवश्यक असलेला 9 मीटरचा रस्ता देखील हे बांधकाम व्यावसायिक तसेच गोदाम मालक शेतकऱ्यांना देत नसल्याने मागील पाच दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या पळस्पे ग्रामस्थांनी पनवेलचे तहसीलदार विजय पाटील यांच्या निलंबनाची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

 गावाभोवती असलेली जेडब्ल्यूसी कंपनीअरिहंत गृहप्रकल्प या प्रकल्पामुळे शेतीला धोका निर्माण होत आहे.गोदामाच्या दूषित सांडपाण्यामुळे ग्रामस्थांना त्रास होत आहे.तसेच ग्रामस्थांच्या वहिवाटीचा रस्ता अडवला गेला असताना तहसीलदार चुकीचा अहवाल देऊन ग्रामस्थांचा उपोषणच दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप उपोषणकर्त्या दमयंती भगत यांनी केला आहे.एकीकडे गोदामांच्या दूषित पाण्यामुळे भातशेती नष्ट होत चालली असताना तहसीलदार विजय पाटील या प्रकरणात संबंधितांना क्लीन चिट देत असल्याचा आरोपही शेकापचे नेते अनिल ढवळे यांनी केला आहे.12 ग्रामस्थ उपोषणाला बसत असताना प्रशासनाची भूमिका बिल्डर धार्जिणी असल्याचा आरोप ढवळे यांनी केला आहे.

सल्ला देण्याऐवजी कारवाई का नाही ?पळस्पे मधील पाण्याचे प्रदूषण,रस्त्याची अडवणूक हे सर्व प्रकरण डोळ्या देखत असताना तहसीलदार विजय पाटील स्थळ पाहणी करून  मामलेदार कोर्टात कमल 1906 कायद्याप्रमाणे दावा दाखल करण्याचा सल्ला ग्रामस्थांना देतात मात्र स्वतः सुमोटो म्हणुन याबाबत काहीच कारवाई करीत नसल्याने सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच याबाबत दखल घेऊन कारवाई करण्याची मागणी 32 ग्रामस्थांनी सह्यांची पत्र मुख्यमंत्र्यांना दिले आहे.

टॅग्स :panvelपनवेल