शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
7
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
8
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
9
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
10
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
11
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
12
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
13
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

दासगावमध्ये पांजीचा उत्सव

By admin | Updated: May 14, 2017 22:49 IST

मुंबई-पुण्यासारख्या मोठ्या शहरापासून सुरू झालेली फ्लॅटची संस्कृती आता ग्रामीण भागात देखील पसरली आहे. चार भिंती आणि बंद दरवाजे अशा ब्लॉकमध्ये माणसाचे

लोकमत न्यूज नेटवर्कदासगाव : मुंबई-पुण्यासारख्या मोठ्या शहरापासून सुरू झालेली फ्लॅटची संस्कृती आता ग्रामीण भागात देखील पसरली आहे. चार भिंती आणि बंद दरवाजे अशा ब्लॉकमध्ये माणसाचे आयुष्य देखील ब्लॉक झाले आहे, अशी परिस्थिती असली तरी वैयक्तिक विचार सोडून सर्वांना एकत्र आणणारा पांजीचा उत्सव ग्रामीण भागात साजरा होतो. गावातल्या मूळ घरात संपूर्ण भावकी एकत्र येवून गावकीच्या साक्षीने तीन दिवसांचा हा पांजीचा उत्सव साजरा करतात. दासगाव येथील निवाते कुटुंबीयांनी नुकतीच पांजी साजरी केली. इतर सणांसोबतच पांजीच्या या निमित्ताने दासगावमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.पांजी हा उत्सव मूळचा धार्मिक उत्सव आहे. एखाद्या आडनावाचे कुटुंब कोणते दैवत मानते त्यानुसार पांजीच्या या उत्सवात थोडाफार बदल होतो. मात्र देवांची घडणावळ, नवीन देव्हारा, मिरवणूक, अभिषेक, देवांची स्थापना आणि शेवटी गोंधळाचा कार्यक्रम असा साधारणपणे तीन दिवस चालणारा हा उत्सव असतो. यामध्ये दोन दिवस गोड जेवण तर तिसरा म्हणजे शेवटचा गोंधळाचा दिवस हा तिखट जेवणाचा असतो. साधारणपणे तीन वर्षांनी प्रत्येक घराण्यात पांजीचा हा उत्सव साजरा केला जातो. घरातील बुजुर्ग मंडळी याची तयारी करतात आणि नातलग किमान एकतरी कुटुंब प्रतिनिधी पांजीच्या या उत्सवाला हजेरी लावतात. लग्नकार्य अगर दु:खी प्रसंगामध्ये येणं जमलं नाही तरी पांजीचा उत्सव कोणतीही सहसा सोडत नाही. त्यामुळे पांजीच्या या उत्सवाला धार्मिक स्वरूप असले तरी नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने दूरवर गेलेल्या माणसांना गावी परत आणणारा पांजीचा उत्सव आहे.१० ते १२ मे असे तीन दिवस दासगावमध्ये निवाते कुटुंबियांची पांजी साजरी झाली. १० मे रोजी निवाते कुटुंबियांच्या कुलदैवताचे कांदले घडवून आणण्यात आले. किशोर जाधव यांच्या घरी पूजापाठ करून त्यांची एक भव्य मिरवणूक काढून भोईवाडा येथे निवाते कुटुंबियांच्या मंदिरामध्ये विधिवत स्थापना करण्यात आली. दुसऱ्या दिवशी पूजा विधी आणि महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रत तर शेवट तिसऱ्या दिवशी तुळजाभवानी मातेचा गोंधळ करण्यात आला.हिंदू धर्मातील सर्वच घराण्यांमध्ये पांजीची प्रथा आहे. ही प्रथा कशी आणि कधी सुरू झाली, याची माहिती उपलब्ध नाही. मात्र देवीदेवता आणि घराण्याची माहिती देणाऱ्या या भाटाच्या मार्गदर्शनाखाली पांजीचा विधी पार पाडतात.