शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

दासगावमध्ये पांजीचा उत्सव

By admin | Updated: May 14, 2017 22:49 IST

मुंबई-पुण्यासारख्या मोठ्या शहरापासून सुरू झालेली फ्लॅटची संस्कृती आता ग्रामीण भागात देखील पसरली आहे. चार भिंती आणि बंद दरवाजे अशा ब्लॉकमध्ये माणसाचे

लोकमत न्यूज नेटवर्कदासगाव : मुंबई-पुण्यासारख्या मोठ्या शहरापासून सुरू झालेली फ्लॅटची संस्कृती आता ग्रामीण भागात देखील पसरली आहे. चार भिंती आणि बंद दरवाजे अशा ब्लॉकमध्ये माणसाचे आयुष्य देखील ब्लॉक झाले आहे, अशी परिस्थिती असली तरी वैयक्तिक विचार सोडून सर्वांना एकत्र आणणारा पांजीचा उत्सव ग्रामीण भागात साजरा होतो. गावातल्या मूळ घरात संपूर्ण भावकी एकत्र येवून गावकीच्या साक्षीने तीन दिवसांचा हा पांजीचा उत्सव साजरा करतात. दासगाव येथील निवाते कुटुंबीयांनी नुकतीच पांजी साजरी केली. इतर सणांसोबतच पांजीच्या या निमित्ताने दासगावमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.पांजी हा उत्सव मूळचा धार्मिक उत्सव आहे. एखाद्या आडनावाचे कुटुंब कोणते दैवत मानते त्यानुसार पांजीच्या या उत्सवात थोडाफार बदल होतो. मात्र देवांची घडणावळ, नवीन देव्हारा, मिरवणूक, अभिषेक, देवांची स्थापना आणि शेवटी गोंधळाचा कार्यक्रम असा साधारणपणे तीन दिवस चालणारा हा उत्सव असतो. यामध्ये दोन दिवस गोड जेवण तर तिसरा म्हणजे शेवटचा गोंधळाचा दिवस हा तिखट जेवणाचा असतो. साधारणपणे तीन वर्षांनी प्रत्येक घराण्यात पांजीचा हा उत्सव साजरा केला जातो. घरातील बुजुर्ग मंडळी याची तयारी करतात आणि नातलग किमान एकतरी कुटुंब प्रतिनिधी पांजीच्या या उत्सवाला हजेरी लावतात. लग्नकार्य अगर दु:खी प्रसंगामध्ये येणं जमलं नाही तरी पांजीचा उत्सव कोणतीही सहसा सोडत नाही. त्यामुळे पांजीच्या या उत्सवाला धार्मिक स्वरूप असले तरी नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने दूरवर गेलेल्या माणसांना गावी परत आणणारा पांजीचा उत्सव आहे.१० ते १२ मे असे तीन दिवस दासगावमध्ये निवाते कुटुंबियांची पांजी साजरी झाली. १० मे रोजी निवाते कुटुंबियांच्या कुलदैवताचे कांदले घडवून आणण्यात आले. किशोर जाधव यांच्या घरी पूजापाठ करून त्यांची एक भव्य मिरवणूक काढून भोईवाडा येथे निवाते कुटुंबियांच्या मंदिरामध्ये विधिवत स्थापना करण्यात आली. दुसऱ्या दिवशी पूजा विधी आणि महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रत तर शेवट तिसऱ्या दिवशी तुळजाभवानी मातेचा गोंधळ करण्यात आला.हिंदू धर्मातील सर्वच घराण्यांमध्ये पांजीची प्रथा आहे. ही प्रथा कशी आणि कधी सुरू झाली, याची माहिती उपलब्ध नाही. मात्र देवीदेवता आणि घराण्याची माहिती देणाऱ्या या भाटाच्या मार्गदर्शनाखाली पांजीचा विधी पार पाडतात.