शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
4
महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
5
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकमा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
6
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
7
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
8
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
9
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
10
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
11
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
12
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
13
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
14
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
15
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
16
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
17
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
18
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
19
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
20
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं

कनकेश्वरच्या पर्वतराजीत पाणपोई केंद्र; कडकउन्हात पक्षी-प्राण्यांसाठी झाली सोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 00:40 IST

समाजामधील तेढ वाढून समाजमने दुभंगली जात आहेत. जातीपातीचे राजकारण करून आपापसातील तंटे-बखेडे वाढत असल्याचे आपल्याला दिसून येते. समाजामधून माणुसकीच हरवत असल्याने सामाजिक स्वास्थ्य बिघडत आहे असे, असतानाच दुसरीकडे अद्यापही माणुसकी शिल्लक आहे याचे दर्शन अलिबाग तालुक्यात पहायला मिळत आहे.

- आविष्कार देसाईअलिबाग : समाजामधील तेढ वाढून समाजमने दुभंगली जात आहेत. जातीपातीचे राजकारण करून आपापसातील तंटे-बखेडे वाढत असल्याचे आपल्याला दिसून येते. समाजामधून माणुसकीच हरवत असल्याने सामाजिक स्वास्थ्य बिघडत आहे असे, असतानाच दुसरीकडे अद्यापही माणुसकी शिल्लक आहे याचे दर्शन अलिबाग तालुक्यात पहायला मिळत आहे. कडक उन्हाच्या झळांमुळे पक्षी-प्राणीही त्रासले आहेत. या कालावधीत त्यांची तहान भागविण्यासाठी कनकेश्वर येथील पर्वतराजीत २५ ठिकाणी पाणपोई केंद्र निर्माण करण्यात आले आहेत. माणसातील माणुसकीचे दर्शन चोरोंड-मुशेत येथील वंदे मातरम् ग्रुप आणि मांडव्याच्या लायन्स क्लबने घडवून सर्वांनाच आदर्श घालून दिला आहे.सध्या पारा हळूहळू वर चढत असल्याने वातावरणामध्ये कमालीची उष्णता वाढली आहे. दुपारी तर प्रचंड उन्हाच्या झळांमुळे अंगाची लाहीलाही होत आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये तर रायगड-भिरा येथील तापमान तब्बल ४७ अंशावर पोचले होते. यंदाही तापमानात कमालीची वाढ होणार असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. त्यांनी दिलेल्या इशाऱ्याची प्रचिती आता प्रत्येकालाच येताना दिसत आहे.वाढत्या तापमानाचा तडाखा हा मानवाला बसत आहे, त्याचप्रमाणे निसर्गातील पशू-पक्षी, प्राणी, वनस्पती झाडे हेही त्याच्या कचाट्यातून सुटलेले नाहीत. त्यामध्ये फरक एवढाच की, त्यांना आपल्या भावना व्यक्त करता येत नाहीत. परंतु त्यांच्या भावनांची कदर, त्यांना होणाºया त्रासाची दखल अलिबाग तालुक्यातील चोरोंडे-मुशेत येथील वंदे मातरम् ग्रुपने घेतली आहे. या तरुणांच्या संघटनेचे नितीन अधिकारी यांनी मुक्या प्राण्यांसाठी पाणपोईची संकल्पना मांडली. त्यानंतर लगेचच मांडवा लायन्स क्लबचे अध्यक्ष सुबोध राऊत यांनी ती उचलून धरली. राऊत यांच्या मदतीने कनकेश्वर पर्वराजीमध्ये २५ पाणपोई निर्माण करण्याचा निर्धार केला आणि त्या दिशेने त्यांनी संयुक्तरीत्या कामही सुरु केले.कडाक्याच्या उन्हामध्ये पाणतळ, तलाव, डोह, नद्या, ओहळ हे आता आटत चालले आहेत. त्यामुळे काहीच दिवसांमध्ये पक्ष्यांना पिण्यासाठी पाणी मिळणे अवघड होणार आहे. यासाठी कनकेश्वर पर्वतराजी परिसरातील २५ ठिकाणांचा शोध घेण्यात आला जेणेकरुन त्या ठिकाणी पाणपोई उभारणे शक्य होईल, असे वंदे मातरम् ग्रुपचे चंद्रशेखर सुर्वे यांनी सांगितले.तहानलेल्या मुक्या पशू-पक्ष्यांना पाणी दिल्याचे समाधान शब्दामध्ये वर्णन करणे कठीण आहे. पक्षी पाणी पिऊन आकाशामध्ये उंच भरारी घेतात तेव्हाच कळते की, ते समाधानी झाले आहेत, त्यांची तहान भागली आहे. हे सर्व त्यांच्या चेहºयावर दिसत नसले तरी, त्यांच्या कृतीतून आपल्याला दिसून येते असे नितीन अधिकारी यांनी सांंगितले. प्रत्येकाला अशा ठिकाणी येऊन मुक्या पशू-पक्ष्यांसाठी काम करता येत नसेल तर, त्यांनी आपल्या घराच्या बाहेर, खिडकीमध्ये वºहांड्यात एखाद्या स्वच्छ भांड्यामध्ये पाणी ठेवावे. असे केल्याने त्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होईल.- पक्ष्यांना सहज पाणी उपलब्ध होऊन त्यांना ते पिता यावे यासाठी विशिष्ट बाटलीमध्ये पाणी टाकून त्यातील पाणी बाटलीच्या खाली असणाºया झाकणामध्ये कसे येईल याची रचना करण्यात आली. त्यानंतर तशा २५ पेक्षा अधिक पाणपोई बनवण्यात आल्या. कनकेश्वर पर्वतराजीमध्ये विविध जातींचे छोटेमोठे दुर्मीळ पक्षी आहेत. त्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आल्याचे मांडवा लायन्स क्लबचे अध्यक्ष सुबोध राऊत यांनी स्पष्ट केले. पक्ष्यांसाठी उभारण्यात आलेल्या पाणपोईमधील पाणी संपले की त्यामध्ये पुन्हा भरण्याची व्यवस्था आहे. पाणी भरल्यानंतर तेथे खाद्यही ठेवले जाते.

टॅग्स :Raigadरायगड