शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
6
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
7
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
8
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
9
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
10
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
11
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
12
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
13
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
14
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
15
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
16
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
17
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
18
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
19
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
20
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका

पाली नगरपंचायत लांबणीवर, पाच रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 05:05 IST

पाच रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक : सर्वपक्षीयांसह स्थानिकही संभ्रमात

विनोद भोईरराबगाव/पाली : पाली नगरपंचायती संदर्भातील प्रक्रि या चार महिन्यांत पूर्ण करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने सरकारला सप्टेंबर महिन्यात दिले आहेत. मात्र, याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. कारण पाली ग्रामपंचायतीच्या पाच रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक लागणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. या संदर्भात मतदार यादी कार्यक्र म सुरू झाला आहे, त्यामुळे पाली ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीमध्ये कधी होणार, याबाबत नागरिकांमधून प्रश्न उपस्थित होत आहे.

मार्च ते मे २०१९ या कालावधीत सुधागड तालुक्यातील पाली, चंदरगाव, उद्धर, चिखलगाव, नांदगाव व दहिगाव येथील मुदत संपणाऱ्या, नव्याने स्थापित होणाºया ग्रामपंचायतीच्या निवडणुका व रिक्त जागांसाठी पोटनिवडणुका होणार आहेत. त्यानुसार सोमवारपासून संगणकीकृत पद्धतीने मतदार यादीचा कार्यक्र म सुरू होणार आहे.अष्टविनायकाचे क्षेत्र असलेल्या पाली ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर होण्याची प्रक्रिया मागील दोन वर्षांपासून लालफितीत अडकली होती. मात्र, पाली नगरपंचायत व्हावी, यासाठी पालीतील काही नागरिकांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. यासंदर्भात १४ सप्टेंबर रोजी मुंबई उच्च न्यायालयाने निकाल जाहीर करून आगामी चार महिन्यांत नगरपंचायत होण्याकामी प्रशासनाने आवश्यक ते प्रस्ताव व प्रक्रि या पूर्ण करावी, असे आदेश दिले आहेत. मात्र, यावर शासनाकडून अजूनही कुठलीच कार्यवाही केली नसल्याने पाली नगरपंचायत होणार की ग्रामपंचायतच राहणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.रायगड जिल्ह्यातील पालीसह अन्य सहा ग्रामपंचायतींचे रूपांतर नगरपंचायतीत होण्याची प्रक्रि या २०१५ मध्ये झाली होती. तत्कालीन सरपंच व सदस्यांनी पाली ग्रामपंचायत राहावी यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. तसेच दरम्यानच्या काळात पाली नगरपंचायत होण्याच्या प्रक्रि येत नगरपंचायतीची जाहिरात प्रसारमाध्यमात प्रसिद्ध न झाल्याच्या कारणाने नगरपंचायत प्रस्थापित होऊ शकली नव्हती, त्यामुळे पाली ग्रामपंचायत जैसे थे राहिली. जुलै २०१८ मध्ये ग्रामपंचायतीचा पाच वर्षांचा कार्यकाळ (मुदत) संपल्याने पुन्हा एकदा पाली ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची अधिसूचना जाहीर झाली. मात्र, या वेळी सर्व राजकीय पक्ष, नेते व नागरिकांनी ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकत नगरपंचायत होण्याची मागणी केली. या वेळी पाली नगरपंचायत व्हावी, यासाठी पालीतील पराग मेहता, गजानन शिंदे, अभिजीत चांदोरकर, सुधीर साखरले, संजोग शेठ व आशिक मनियार यांनी सर्व कागदपत्रांसह उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. दरम्यान, २६ सप्टेंबर २०१८ रोजी पाली ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया पार पडली.सर्वपक्षीय नेते धास्तावलेच्पाली नगरपंचायत व्हावी, यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी तब्बल दोन वेळा ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकला. उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. न्यायालयाचा निर्णयही सकारात्मक आला. मात्र, आजतागायत शासनाकडून नगरपंचायत होण्याकामी कोणतीच कार्यवाही केली जात नसल्याने सर्वपक्षीय नेते संभ्रमात आहेत.च्त्या बरोबरच अपक्षांच्या हाती ग्रामपंचायतीचा कारभार आहे. १४ व्या वित्त आयोगाचा जवळपास ७० ते ९७ लाखांचा निधी आहे आणि अशा वेळी आपल्याकडे सत्तेची चावी नाही. नगरपंचायत झालीच नाही तर पुढे काय? यामुळे तर सर्वपक्षीय नेते व उमेदवार अधिकच धास्तावले आहेत.पाली नगरपंचायती संदर्भात शासनाचे कोणतेच आदेश आलेले नाहीत. मात्र, कोर्टाचा आदेश आला आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आम्हाला कार्यवाही करावी लागते. त्यानुसार पोटनिवडणुकीसाठी जो कार्यक्र म आलाय त्यानुसार निवडणुका घेण्यात येतील. दरम्यान, शासनाकडून नगरपंचायती संदर्भात जे आदेश येतील त्यानुसार कार्यवाही केली जाईल.- बी. एन. निंबाळकर,तहसीलदार, पाली-सुधागडच्पाली ग्रामपंचायतीमध्ये १७ सदस्य व १ सरपंच अशा एकूण १८ जागा आहेत. या निवडणुकीत राजकीय पक्षांनी पुन्हा एकदा बहिष्कार टाकला. तर अपक्ष उमेदवारांनी पालीच्या विकासासाठी ही निवडणूक लढवली.च्निवडणुकीपूर्वीच ११ अपक्ष उमेदवार बिनविरोध निवडून आले. तर दोन जागांसाठी निवडणूक झाली. त्यामध्ये अपक्ष सरपंच व एक सदस्य निवडून आले.च्परिणामी, पाली ग्रामपंचायत पुन्हा प्रस्थापित झाली. तर उर्वरित पाच जागा रिक्त राहिल्या. या निवडणुकांसाठी मार्च ते मे महिन्यात पोटनिवडणुका होणार आहेत.

टॅग्स :ElectionनिवडणूकRaigadरायगड